शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

तीन तालुक्यात अडकली कारव्हाची वीज सेवा

By admin | Updated: June 20, 2015 02:04 IST

सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीतील कारव्हा गाव गेल्या १५ दिवसांपासून अंधारात आहे.

न्याय कोण देणार ? : १५ दिवसांपासून गाव अंधारात वासेरा : सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीतील कारव्हा गाव गेल्या १५ दिवसांपासून अंधारात आहे. येथे चिचपल्ली उपस्टेशनवरून वीज पुरवठा केला जातो. भद्रावती तालुक्यातील राणतळोधी-कोळसा या मार्गावर विद्युत तारेवर झाड कोसळल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून गावाचा विद्युत पुरवठा बंद आहे.कारव्हा हे गाव ६०० लोकसंख्येचे गाव असून जंगलव्याप्त परिसर असल्याने वाघाची दहशत असते. त्यामुळे नागरिकांना केव्हाही श्वापदांचा धोका असतो. विद्युत पुरवठा बंद असल्याने अंधारातच नागरिकांना रात्र काढावे लागत आहे. कारव्हा येथील विद्युत ही चिचपल्ली-कोळसा-राणतळोधी मार्गे कारव्हा अशी असून चिचपल्ली हे चंद्रपूर तालुक्यात येते. तर राणतळोधी हे गाव भद्रावती तालुक्यात तर कारव्हा सिंदेवाही तालुक्यात येते. चिचपल्ली ते कारव्हा मार्गात कुठेही विद्युतमध्ये बिघाड झाल्यास त्या भागातील विद्युत विभागाशी संपर्क करावा लागतो. चिचपल्ली ते कोळसा मार्गात बिघाड झाल्यास चिचपल्ली विभागाचे अधिकारी दुरुस्त करतात तर कोळसा ते राणतळोधी मार्गात बिघाड झाल्यास भद्रावतीचे अधिकारी दुरुस्त करतात. राणतळोधी ते कारव्हा भागात बिघाड झाल्यास सिंदेवाहीचे अधिकारी दुरुस्त करतात. त्यामुळे कुठे बिघाड झाला, आणि दुरूस्ती कोण करणार हा प्रश्न नागरिकांना नेहमी अडचणीचा ठरत आहे. कारव्हा येथील नागरिकांशी चर्चा केली असता, गेल्या १५ दिवसांपासून विद्युत नसल्याने त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले. रात्री गावात बिबट घुसत असून जीवीत हाणी होण्याची शक्यता दर्शवली. तीन तालुक्यात गावाची विद्युत अडकली असल्याने न्याय कुणाला मागायचा असा प्रश्न तयार झाल्याचे मत मांडले. विजेअभावी १५ दिवसांपासून नळ योजना बंद असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)