शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

तीन तालुक्यात अडकली कारव्हाची वीज सेवा

By admin | Updated: June 20, 2015 02:04 IST

सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीतील कारव्हा गाव गेल्या १५ दिवसांपासून अंधारात आहे.

न्याय कोण देणार ? : १५ दिवसांपासून गाव अंधारात वासेरा : सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीतील कारव्हा गाव गेल्या १५ दिवसांपासून अंधारात आहे. येथे चिचपल्ली उपस्टेशनवरून वीज पुरवठा केला जातो. भद्रावती तालुक्यातील राणतळोधी-कोळसा या मार्गावर विद्युत तारेवर झाड कोसळल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून गावाचा विद्युत पुरवठा बंद आहे.कारव्हा हे गाव ६०० लोकसंख्येचे गाव असून जंगलव्याप्त परिसर असल्याने वाघाची दहशत असते. त्यामुळे नागरिकांना केव्हाही श्वापदांचा धोका असतो. विद्युत पुरवठा बंद असल्याने अंधारातच नागरिकांना रात्र काढावे लागत आहे. कारव्हा येथील विद्युत ही चिचपल्ली-कोळसा-राणतळोधी मार्गे कारव्हा अशी असून चिचपल्ली हे चंद्रपूर तालुक्यात येते. तर राणतळोधी हे गाव भद्रावती तालुक्यात तर कारव्हा सिंदेवाही तालुक्यात येते. चिचपल्ली ते कारव्हा मार्गात कुठेही विद्युतमध्ये बिघाड झाल्यास त्या भागातील विद्युत विभागाशी संपर्क करावा लागतो. चिचपल्ली ते कोळसा मार्गात बिघाड झाल्यास चिचपल्ली विभागाचे अधिकारी दुरुस्त करतात तर कोळसा ते राणतळोधी मार्गात बिघाड झाल्यास भद्रावतीचे अधिकारी दुरुस्त करतात. राणतळोधी ते कारव्हा भागात बिघाड झाल्यास सिंदेवाहीचे अधिकारी दुरुस्त करतात. त्यामुळे कुठे बिघाड झाला, आणि दुरूस्ती कोण करणार हा प्रश्न नागरिकांना नेहमी अडचणीचा ठरत आहे. कारव्हा येथील नागरिकांशी चर्चा केली असता, गेल्या १५ दिवसांपासून विद्युत नसल्याने त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले. रात्री गावात बिबट घुसत असून जीवीत हाणी होण्याची शक्यता दर्शवली. तीन तालुक्यात गावाची विद्युत अडकली असल्याने न्याय कुणाला मागायचा असा प्रश्न तयार झाल्याचे मत मांडले. विजेअभावी १५ दिवसांपासून नळ योजना बंद असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)