शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

विद्युतसेवकांना आदेश नाही; अप्रशिक्षितांकडून कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:44 IST

करंजी येथील चंद्रजित गव्हारे हे पथदिव्यांचे काम करताना विद्यूत प्रवाहाने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. सावली तालूक्यातही अशीच घटना घडल्याने गावात तणाव निर्माण झाला. गावागावात विद्युत सेवक नेमण्यात आले.

ठळक मुद्देसरपंचांचे सीईओंना साकडे : पथदिवे विद्युत कंपनीकडे सोपवावे

लोकमत न्यूज नेटवर्कआक्सापूर: करंजी येथील चंद्रजित गव्हारे हे पथदिव्यांचे काम करताना विद्यूत प्रवाहाने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. सावली तालूक्यातही अशीच घटना घडल्याने गावात तणाव निर्माण झाला. गावागावात विद्युत सेवक नेमण्यात आले. पण महावितरण कंपनीने त्यांना आदेशपत्र दिले नाही. अप्रशिक्षितांकडून ही कामे केली जात आहेत. या घटनांत वाढ होऊ शकते. संभाव्य धोका लक्षात घेता पथदिव्याची ही जबाबदारी विद्युत कंपनीकडे देण्याची मागणी गोंडपिपरी तालूका सरपंच संघटनेने जि. प. च्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.जिल्ह्यात करंजी व व्याहाळ गावात पथदिव्यांचे काम करताना दोघांचा मृत्यू झाला. कुटुंंबीयांनी मदतीच्या मागणीसाठी चक्क तीन तास मृतदेह ग्रामपंचायतीमध्ये ठेवला. गावात प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली होती. राजकीय विरोधातून सरपंच व सचिवांना विनाकारण धारेवर धरण्यात आले. एवढेच नाही, तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील करण्यात आली. खरे तर मजुरांनी स्वत:च्या जबाबदारीवर काम करू असे स्वाक्षरीसह करारनामा लिहून दिला होता. पथादिव्यांची देखभाल करण्याची जबाबदारी पूर्वी विद्युत कंपनीकडे होती. पण त्यांनी जबाबदारी नाकारल्याने या कामासाठी गावागावांत विद्युत सहायकांची निवड करून ही यादी कंपनीकडे पाठविण्यात आली. अद्यापही त्यांना आदेश देण्यात आले नाहीत. त्यामुळे अप्रशिक्षितांच्या भरवशावर ही कामे सूरू आहेत.यामुळे त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. या मुद्याला विरोधक राजकीय स्वरूप देत असल्याने गावातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला.या सर्व घटना लक्षात घेवून प्रशासनाने तातडीने पथदिव्यांची जबाबदारी विद्यूत कंपनीकडे सोपवावी व ग्रामपंचायतीची यापासून मुक्तता करावी, अशी मागणी तालूका सरपंच संघटनेने निवेदनातून केली आहे.यावेळी तालूकाध्यक्ष हंसराज रागीट, करंजीच्या सरपंच ज्योती चिचघरे, बोरगाव च्या सरपंच अमावश्या निमसरकार, आक्सापूरच्या सरपंच अल्का पिपरे, विठ्ठलवाडा येथील सरपंच नितीन काकडे, प्रेमीला मडावी, फुला शेरकी, व गोंडपिपरी तालुक्यातील सरपंचांनी केली आहे. पथदिवे दुरूस्ती करताना ज्या युवकांचा जीव गेला. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत दिली पाहिजे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.