शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
4
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
5
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
6
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
7
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
8
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
9
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
10
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
11
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
12
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
13
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
14
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
15
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
16
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
17
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
18
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
19
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
20
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!

विद्युतसेवकांना आदेश नाही; अप्रशिक्षितांकडून कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:44 IST

करंजी येथील चंद्रजित गव्हारे हे पथदिव्यांचे काम करताना विद्यूत प्रवाहाने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. सावली तालूक्यातही अशीच घटना घडल्याने गावात तणाव निर्माण झाला. गावागावात विद्युत सेवक नेमण्यात आले.

ठळक मुद्देसरपंचांचे सीईओंना साकडे : पथदिवे विद्युत कंपनीकडे सोपवावे

लोकमत न्यूज नेटवर्कआक्सापूर: करंजी येथील चंद्रजित गव्हारे हे पथदिव्यांचे काम करताना विद्यूत प्रवाहाने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. सावली तालूक्यातही अशीच घटना घडल्याने गावात तणाव निर्माण झाला. गावागावात विद्युत सेवक नेमण्यात आले. पण महावितरण कंपनीने त्यांना आदेशपत्र दिले नाही. अप्रशिक्षितांकडून ही कामे केली जात आहेत. या घटनांत वाढ होऊ शकते. संभाव्य धोका लक्षात घेता पथदिव्याची ही जबाबदारी विद्युत कंपनीकडे देण्याची मागणी गोंडपिपरी तालूका सरपंच संघटनेने जि. प. च्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.जिल्ह्यात करंजी व व्याहाळ गावात पथदिव्यांचे काम करताना दोघांचा मृत्यू झाला. कुटुंंबीयांनी मदतीच्या मागणीसाठी चक्क तीन तास मृतदेह ग्रामपंचायतीमध्ये ठेवला. गावात प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली होती. राजकीय विरोधातून सरपंच व सचिवांना विनाकारण धारेवर धरण्यात आले. एवढेच नाही, तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील करण्यात आली. खरे तर मजुरांनी स्वत:च्या जबाबदारीवर काम करू असे स्वाक्षरीसह करारनामा लिहून दिला होता. पथादिव्यांची देखभाल करण्याची जबाबदारी पूर्वी विद्युत कंपनीकडे होती. पण त्यांनी जबाबदारी नाकारल्याने या कामासाठी गावागावांत विद्युत सहायकांची निवड करून ही यादी कंपनीकडे पाठविण्यात आली. अद्यापही त्यांना आदेश देण्यात आले नाहीत. त्यामुळे अप्रशिक्षितांच्या भरवशावर ही कामे सूरू आहेत.यामुळे त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. या मुद्याला विरोधक राजकीय स्वरूप देत असल्याने गावातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला.या सर्व घटना लक्षात घेवून प्रशासनाने तातडीने पथदिव्यांची जबाबदारी विद्यूत कंपनीकडे सोपवावी व ग्रामपंचायतीची यापासून मुक्तता करावी, अशी मागणी तालूका सरपंच संघटनेने निवेदनातून केली आहे.यावेळी तालूकाध्यक्ष हंसराज रागीट, करंजीच्या सरपंच ज्योती चिचघरे, बोरगाव च्या सरपंच अमावश्या निमसरकार, आक्सापूरच्या सरपंच अल्का पिपरे, विठ्ठलवाडा येथील सरपंच नितीन काकडे, प्रेमीला मडावी, फुला शेरकी, व गोंडपिपरी तालुक्यातील सरपंचांनी केली आहे. पथदिवे दुरूस्ती करताना ज्या युवकांचा जीव गेला. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत दिली पाहिजे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.