शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

Corona Virus in Chandrapur; चंद्रपूर वीज केंद्राची वीज निर्मिती शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 20:59 IST

लॉकडाऊनचा चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राला जबर फटका बसला आहे. सातपैकी दोन संचावर सुरू असलेली वीज निर्मितीही आता बंद झाली आहे. विजेची मागणीच नसल्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठा २९२० मेगावॅट क्षमतेच्या या केंद्राची शून्यावर आली आहे.

ठळक मुद्देकोरोना लॉकडाऊनचा फटकाकोळसा व पाणी मुबलक असताना बंदची पहिलीच वेळ

अजिंक्य वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोळसा व पाणी मुबलक असताना कोरानामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राला जबर फटका बसला आहे. सातपैकी दोन संचावर सुरू असलेली वीज निर्मितीही आता बंद झाली आहे. विजेची मागणीच नसल्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठा २९२० मेगावॅट क्षमतेच्या या केंद्राची शून्यावर आली आहे.महाऔष्णिक वीज केंद्रात कोळसा आणि पाण्याचा सहाय्याने विजेची निर्मिती होते. पूर्वी अपूरा कोळसा व पाण्याने वीज निर्मिती प्रभावित होवून वीज केंद्र बंद पडल्याच्या नोंदी आहेत. कोळसा व पाण्याचा अभावाचे संकट वीज केंद्रावर नेहमी घोंघावत असते. मात्र हल्ली वीज केंद्रापुढे विजेच्या मागणीचे भलेमोठे संकट वीज केंद्रापुढे ठाकले आहे. कोरोना या साथीच्या विषाणूंची साखळी तोडण्याकरिता भारतासह महाराष्ट्रात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे विजेवर चालणारे यंत्र, संयंत्र व साऱ्या यंत्रणा बंद पङल्या आहेत. परिणामी विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एकूणच याचा जबर फटका चंद्रपूर वीज केंद्राला बसला आहे.अशी आली वीज निर्मिती शून्यावर२६ मार्चला २१० मेगावॅटचे दोन तर ५०० मेगावॅटचा एक संच बंद करण्यात आला. त्या पाठोपाठ २७ मार्चला ५०० मेगावॅटचा एक, २९ मार्चला एक, ५ एप्रिलला एक व आज एक असे चंद्रपूर वीज केंद्राच्या सातही संचासमवेत अख्खे चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्र आजच्या घडीला बंद झाले आहे.वीज केंद्राला कोट्यवधीचा फटकाचंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची २९२० मेगॉवट वीज निर्मितीची क्षमता आहे. मात्र या वीज केंद्राची वीज निर्मिती शून्यावर आली आहे. २०१० मध्ये पाण्याअभावी संच बंद करावे लागले होते. त्यावेळेस नाममात्र एक संच सुरू होता. त्यामुळे वीज केंद्राला कोट्यवधीचा फटका बसणार आहे. विजेच्या मागणीत घट होवून अख्खे वीज केंद्र बंद पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

टॅग्स :electricityवीज