शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रिडींग न घेताच ग्राहकांना वीज बिल

By admin | Updated: November 9, 2014 22:30 IST

वारंवार विनंत्या करूनही आपल्या तक्रारीची कोणत्याही प्रकारे दखल न घेता चुकीचे अवास्तव आलेले विजेचे बिल भरण्यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आपणावर दबाव आणत आहेत.

आयुधनिर्माणी (भद्रावती) : वारंवार विनंत्या करूनही आपल्या तक्रारीची कोणत्याही प्रकारे दखल न घेता चुकीचे अवास्तव आलेले विजेचे बिल भरण्यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आपणावर दबाव आणत आहेत. त्यामुळे माझे कुटुंबीय धास्तावलेले असून माझी मनस्थिती खराब झाल्यास विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार असतील, असे सांगत वीज कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रदीप अजाबराव मत्ते या वीज ग्राहकाने दिला आहे.पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले, २०११ पासून वीज वितरण कंपनीकडून आपल्याला सरासरी वीज बिल यायचे. बील नियमीत भरले जात मात्र त्यानंतर बिल येणेच बंद झाले. याबाबत चौकशी केली असता आपणाकडून जास्तीचे पैसे कंपनीकडे भरले असल्यामुळे बिल आले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र तरीही नादुरुस्त मिटर बदलविण्याकरिता कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली नाही. त्यानंतर जानेवारी २०१४ मध्ये ११ हजार बिल पाठविण्यात आले. सहायक अभियंत्याने तुमचे मीटर सुरू असून ते बदलविण्याची गरज नाही, असे सांगितले. मात्र पुन्हा लगेच मीटर बदलविले. त्यानंतर फेब्रुवारी २०१४ मध्ये २३ हजार रुपयाचे बिल आकारण्यात आले. त्यानंतर पुन्हा १२ हजार व १५ हजार बिल पाठविले. बिल भरा अन्यथा वीज कापली जाईल असा इशारा दिल्याचे मत्ते यांनी सांगितले. वीज वितरणच्या इशाऱ्यामुळे आपल्या उदरनिर्वाहाचा आधार असलेल्या व्यवसायाचा हातठेला विकूण पाच हजार रुपये भरले. त्यामुळे आपली परिस्थिती आणखीनच बिघडली, असे मत्ते यांचे म्हणणे आहे. वीज कंपनी अधिकाऱ्यांच्या अन्यायामुळे आपल्या कुटुंबाला मानसिक व आर्थिक त्रास होत असून या प्रकरणाची चौकशी करून आपल्या परिवारास न्याय मिळवून द्यावा अन्यथा वीज कंपनी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मत्ते यांनी दिला आहे. (वार्ताहर)