शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रिडींग न घेताच ग्राहकांना वीज बिल

By admin | Updated: November 9, 2014 22:30 IST

वारंवार विनंत्या करूनही आपल्या तक्रारीची कोणत्याही प्रकारे दखल न घेता चुकीचे अवास्तव आलेले विजेचे बिल भरण्यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आपणावर दबाव आणत आहेत.

आयुधनिर्माणी (भद्रावती) : वारंवार विनंत्या करूनही आपल्या तक्रारीची कोणत्याही प्रकारे दखल न घेता चुकीचे अवास्तव आलेले विजेचे बिल भरण्यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आपणावर दबाव आणत आहेत. त्यामुळे माझे कुटुंबीय धास्तावलेले असून माझी मनस्थिती खराब झाल्यास विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार असतील, असे सांगत वीज कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रदीप अजाबराव मत्ते या वीज ग्राहकाने दिला आहे.पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले, २०११ पासून वीज वितरण कंपनीकडून आपल्याला सरासरी वीज बिल यायचे. बील नियमीत भरले जात मात्र त्यानंतर बिल येणेच बंद झाले. याबाबत चौकशी केली असता आपणाकडून जास्तीचे पैसे कंपनीकडे भरले असल्यामुळे बिल आले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र तरीही नादुरुस्त मिटर बदलविण्याकरिता कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली नाही. त्यानंतर जानेवारी २०१४ मध्ये ११ हजार बिल पाठविण्यात आले. सहायक अभियंत्याने तुमचे मीटर सुरू असून ते बदलविण्याची गरज नाही, असे सांगितले. मात्र पुन्हा लगेच मीटर बदलविले. त्यानंतर फेब्रुवारी २०१४ मध्ये २३ हजार रुपयाचे बिल आकारण्यात आले. त्यानंतर पुन्हा १२ हजार व १५ हजार बिल पाठविले. बिल भरा अन्यथा वीज कापली जाईल असा इशारा दिल्याचे मत्ते यांनी सांगितले. वीज वितरणच्या इशाऱ्यामुळे आपल्या उदरनिर्वाहाचा आधार असलेल्या व्यवसायाचा हातठेला विकूण पाच हजार रुपये भरले. त्यामुळे आपली परिस्थिती आणखीनच बिघडली, असे मत्ते यांचे म्हणणे आहे. वीज कंपनी अधिकाऱ्यांच्या अन्यायामुळे आपल्या कुटुंबाला मानसिक व आर्थिक त्रास होत असून या प्रकरणाची चौकशी करून आपल्या परिवारास न्याय मिळवून द्यावा अन्यथा वीज कंपनी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मत्ते यांनी दिला आहे. (वार्ताहर)