शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

रिडींग न घेताच ग्राहकांना वीज बिल

By admin | Updated: November 9, 2014 22:30 IST

वारंवार विनंत्या करूनही आपल्या तक्रारीची कोणत्याही प्रकारे दखल न घेता चुकीचे अवास्तव आलेले विजेचे बिल भरण्यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आपणावर दबाव आणत आहेत.

आयुधनिर्माणी (भद्रावती) : वारंवार विनंत्या करूनही आपल्या तक्रारीची कोणत्याही प्रकारे दखल न घेता चुकीचे अवास्तव आलेले विजेचे बिल भरण्यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आपणावर दबाव आणत आहेत. त्यामुळे माझे कुटुंबीय धास्तावलेले असून माझी मनस्थिती खराब झाल्यास विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार असतील, असे सांगत वीज कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रदीप अजाबराव मत्ते या वीज ग्राहकाने दिला आहे.पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले, २०११ पासून वीज वितरण कंपनीकडून आपल्याला सरासरी वीज बिल यायचे. बील नियमीत भरले जात मात्र त्यानंतर बिल येणेच बंद झाले. याबाबत चौकशी केली असता आपणाकडून जास्तीचे पैसे कंपनीकडे भरले असल्यामुळे बिल आले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र तरीही नादुरुस्त मिटर बदलविण्याकरिता कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली नाही. त्यानंतर जानेवारी २०१४ मध्ये ११ हजार बिल पाठविण्यात आले. सहायक अभियंत्याने तुमचे मीटर सुरू असून ते बदलविण्याची गरज नाही, असे सांगितले. मात्र पुन्हा लगेच मीटर बदलविले. त्यानंतर फेब्रुवारी २०१४ मध्ये २३ हजार रुपयाचे बिल आकारण्यात आले. त्यानंतर पुन्हा १२ हजार व १५ हजार बिल पाठविले. बिल भरा अन्यथा वीज कापली जाईल असा इशारा दिल्याचे मत्ते यांनी सांगितले. वीज वितरणच्या इशाऱ्यामुळे आपल्या उदरनिर्वाहाचा आधार असलेल्या व्यवसायाचा हातठेला विकूण पाच हजार रुपये भरले. त्यामुळे आपली परिस्थिती आणखीनच बिघडली, असे मत्ते यांचे म्हणणे आहे. वीज कंपनी अधिकाऱ्यांच्या अन्यायामुळे आपल्या कुटुंबाला मानसिक व आर्थिक त्रास होत असून या प्रकरणाची चौकशी करून आपल्या परिवारास न्याय मिळवून द्यावा अन्यथा वीज कंपनी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मत्ते यांनी दिला आहे. (वार्ताहर)