शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

विधानसभेसाठी मतदारयादीचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:05 IST

काही महिन्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासाठी आयोगाने जाहीर केला आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय स्तरावर तयारी सुुरू : जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघ, नाव नोंदविण्याची प्रशासनाची विनंती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काही महिन्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासाठी आयोगाने जाहीर केला आहे.यामध्ये १५ ते ३० जुलैपर्यंत मतदान नोंदणी संदर्भात दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून अंतिम यादी १९ आॅगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.नाव नोंदणीपासून वंचित मतदारांसाठी आयोगाने १ जानेवारी या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांचा दुसरा पुनर्निरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये १५ ते ३० जुलैपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहे. यानंतर २०, २१, २७ व २८ जुलै रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.पर्यवेक्षकाद्वारे ५ आॅगस्टला तपासणी, १३ आॅगस्टला दावे निकाली काढणे, १६ आॅगस्टला उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याद्वारे मतदार याद्यांची विशेष तपासणी व १९ आॅगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, राजकीय पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. एवढेच नाही तर विधानसभेसाठी इच्छुकांनी आपला जनसंपर्क वाढविला असून विविध कार्यक्रमांद्वारे गावागावांत भेटीगाठी सुरू केल्या आहेत.व्हीआयपी अन् दिव्यांगाची नावे चिन्हाकिंतमतदार यादीत खासदार, आमदार यांच्यासह कला, पत्रकारिता, क्रीडा, न्यायपालिका व इतर क्षेत्रातील मान्यवरांची नावे चुकीने वगळली जावू नये, यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना आयोगाने सूचना दिल्या आहेत.दिव्यांग असल्याबाबत नमुना ६ मध्ये माहिती उपलब्ध असल्याने डेटाबेसमध्ये चिन्हांकित करावी व दिव्यांगत्वाबाबतची माहिती उघड करू नये. अपंग मतदाराला सामावून घेण्यासाठी शासकीय विभाग,संस्थाना सहभागी करावे,असेही आयोगाने म्हटले आहे.राजकीय पक्षांसोबत बैठकप्रारूप मतदार यादी प्रकाशित करण्यापूर्वी डीईओद्वारे राजकीय पक्षांसोबत स्वतंत्रणे बैठक घेण्यात येणार आहेत. त्यांना कार्यक्रमाची माहिती दिली जाणार आहे. यासाठीचे लेखी पत्र त्यांना दिले जाणार आहे. तसेच मतदार नोंदणी अधिकाºयांनी दावे व हरकतीची यादी सर्व राजकीय पक्षांना दर आठवड्यास उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यादी प्रसिद्ध झाल्यावर राजकीय पक्षांना दोन प्रती विनामूल्य देण्यात याव्या, असे आयोगाचे आदेश आहेत.विधानसभा निवडणुकीमध्ये कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी १५ ते ३० जुलै दरम्यान नेमून दिलेले मतदान केंद्र, तहसील कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करावा. तसेच मतदार यादीत नाव असल्याबाबत खात्री करून घ्यावी. छायाचित्र मतदार यादीत अद्यावत करण्याकरिता आवश्यक ते सहकार्य करावे.- डॉ.कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी, चंद्रपूर