शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

विधानसभेसाठी मतदारयादीचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:05 IST

काही महिन्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासाठी आयोगाने जाहीर केला आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय स्तरावर तयारी सुुरू : जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघ, नाव नोंदविण्याची प्रशासनाची विनंती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काही महिन्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासाठी आयोगाने जाहीर केला आहे.यामध्ये १५ ते ३० जुलैपर्यंत मतदान नोंदणी संदर्भात दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून अंतिम यादी १९ आॅगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.नाव नोंदणीपासून वंचित मतदारांसाठी आयोगाने १ जानेवारी या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांचा दुसरा पुनर्निरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये १५ ते ३० जुलैपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहे. यानंतर २०, २१, २७ व २८ जुलै रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.पर्यवेक्षकाद्वारे ५ आॅगस्टला तपासणी, १३ आॅगस्टला दावे निकाली काढणे, १६ आॅगस्टला उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याद्वारे मतदार याद्यांची विशेष तपासणी व १९ आॅगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, राजकीय पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. एवढेच नाही तर विधानसभेसाठी इच्छुकांनी आपला जनसंपर्क वाढविला असून विविध कार्यक्रमांद्वारे गावागावांत भेटीगाठी सुरू केल्या आहेत.व्हीआयपी अन् दिव्यांगाची नावे चिन्हाकिंतमतदार यादीत खासदार, आमदार यांच्यासह कला, पत्रकारिता, क्रीडा, न्यायपालिका व इतर क्षेत्रातील मान्यवरांची नावे चुकीने वगळली जावू नये, यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना आयोगाने सूचना दिल्या आहेत.दिव्यांग असल्याबाबत नमुना ६ मध्ये माहिती उपलब्ध असल्याने डेटाबेसमध्ये चिन्हांकित करावी व दिव्यांगत्वाबाबतची माहिती उघड करू नये. अपंग मतदाराला सामावून घेण्यासाठी शासकीय विभाग,संस्थाना सहभागी करावे,असेही आयोगाने म्हटले आहे.राजकीय पक्षांसोबत बैठकप्रारूप मतदार यादी प्रकाशित करण्यापूर्वी डीईओद्वारे राजकीय पक्षांसोबत स्वतंत्रणे बैठक घेण्यात येणार आहेत. त्यांना कार्यक्रमाची माहिती दिली जाणार आहे. यासाठीचे लेखी पत्र त्यांना दिले जाणार आहे. तसेच मतदार नोंदणी अधिकाºयांनी दावे व हरकतीची यादी सर्व राजकीय पक्षांना दर आठवड्यास उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यादी प्रसिद्ध झाल्यावर राजकीय पक्षांना दोन प्रती विनामूल्य देण्यात याव्या, असे आयोगाचे आदेश आहेत.विधानसभा निवडणुकीमध्ये कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी १५ ते ३० जुलै दरम्यान नेमून दिलेले मतदान केंद्र, तहसील कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करावा. तसेच मतदार यादीत नाव असल्याबाबत खात्री करून घ्यावी. छायाचित्र मतदार यादीत अद्यावत करण्याकरिता आवश्यक ते सहकार्य करावे.- डॉ.कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी, चंद्रपूर