लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिवाळी काही दिवसांवर आली आहे. गांधी चौक परिसरात दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठ सजल्या आहे. मात्र निवडणुकीच्या धामधुमीत ग्राहक दुकानाकडे फिरकत नसल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.मतदानामुळे मागच्या आठवड्यात सर्वत्र प्रचार आणि रॅली यांचेच वातावरण दिसत होते. त्यामुळे दिवाळी आता फक्त पाच दिवसांवर येवून ठेपली असली तरीही बाजारातील धावपळ आणि उलाढाल बघायला मिळत नाही. नोकरदारांचे पगारही लवकर होण्याची शक्यता कमी असल्याने तसेच खासगी क्षेत्रात मंदीचे ढग असल्याने बोनसचाही ठिकाणा नसल्याने दिवाळी खरेदीसाठी नागरिकांनी हात आखडता घेतला आहे. वास्तविक, दिवाळी येण्यापूर्वीच १५ ते २० दिवस बाजारपेठा दिवाळीच्या सामानांनी, लाईटसने, कपड्यांनी फुलून जातात. यंदा मात्र कमालीची मंदी असल्याचे तालुक्यातील सर्व व्यापारी आता खुलेआम बोलू लागले आहेत. एकतर बाजारात असलेली अभूतपूर्व मंदी आणि दिवाळीच्या तोंडावर आलेली निवडणूक यामुळे बाजारात एक प्रकारची मरगळ आल्याचे जाणवते आहे. २४ ऑक्टोबरला निकाल लागल्यानंतर मात्र बाजारात गर्दी होईल, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे.
निवडणुकीमुळे दिवाळीच्या खरेदीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST
मतदानामुळे मागच्या आठवड्यात सर्वत्र प्रचार आणि रॅली यांचेच वातावरण दिसत होते. त्यामुळे दिवाळी आता फक्त पाच दिवसांवर येवून ठेपली असली तरीही बाजारातील धावपळ आणि उलाढाल बघायला मिळत नाही. नोकरदारांचे पगारही लवकर होण्याची शक्यता कमी असल्याने तसेच खासगी क्षेत्रात मंदीचे ढग असल्याने बोनसचाही ठिकाणा नसल्याने दिवाळी खरेदीसाठी नागरिकांनी हात आखडता घेतला आहे.
निवडणुकीमुळे दिवाळीच्या खरेदीवर परिणाम
ठळक मुद्देबाजारपेठा सजल्या : ऑनलाईन खरेदीचा फटका