शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

जिल्ह्यात १७ सदस्यीय ९ ग्रामपंचायतीत होणार निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:37 IST

चंद्रपूर : जिल्ह्यात असलेल्या एकूण ग्रामपंचायतीपैकी तब्बल ६२९ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. ...

चंद्रपूर : जिल्ह्यात असलेल्या एकूण ग्रामपंचायतीपैकी तब्बल ६२९ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात १७ सदस्य संख्या असलेल्या ९ ग्रामपंचायती आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गजांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतूनच राजकीय पक्षांचे जिल्ह्यात अस्तीत्व टिकून राहणार आहे.

सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये चिमूर तालुक्यातील शंकरपूर, भिसी, नेरी या तीन ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर नागभीड तालुक्यातील तळोधी, बल्लारपूर तालुक्यात विसापूर, वरोरा तालुक्यातील माजरी, तसेच चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर, उर्जानगर आणि घुग्घुस या मोठ्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. विशेष म्हणजे, घुग्घुस ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या वादात सापडली असून येथील नागरिकांनी शहरातील नगरपरिषदेचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने यासाठी पुढाकार घेत नागरिकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. मात्र ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायची नाही, या मुद्यावर येथील नागरिक ठाम आहे. दरम्यान, विविध मार्गाने आंदोलनही सुरु करण्यात आले आहे.

जिल्ह्यात १७ सदस्य संख्या असलेल्या प्रमुख आणि राजकीय दृष्टी संवेदनशील अशा या ग्रामपंचायती असल्याने प्रमुख राजकीय पक्षांसह इतर लहान पक्षांनीही आपआपले उमेदवार पॅनल बनवून उभे केले आहे. विशेष म्हणजे, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतूनच राजकीय पक्षांची भविष्यातील रणनीती ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण याकडे लक्ष ठेवून आहे.

---

६२९

निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती

---

सर्वात मोठ्या ग्रामपंचायती

शंकरपूर, भिसी, नेरी, तळोधी, विसापूर,माजरी, घुग्घुस, दुर्गापूर, उर्जानगर

----

सर्वात लहान ग्रामपंचायती

जिल्ह्यात सात सदस्यीय ग्रामपंचयी असून काही ग्रामपंचायतीमध्ये गट ग्रामपंचायत आहे.

----

एकूण सदस्य संख्या

१७

-----

घुग्घुस ग्रामपंचायतीची निवडणूक अधांतरी

राज्य सरकारने घुग्घुस ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा देण्याची अधिसुचना काढली आहे. मात्र ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर येथेही ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे येथे आंदोलन केले जात आहे. दरम्यान याकडे जिल्ह्यातील नागिरकांचे लक्ष लागले आहे.