शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

जिल्ह्यात १७ सदस्यीय ९ ग्रामपंचायतीत होणार निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:37 IST

चंद्रपूर : जिल्ह्यात असलेल्या एकूण ग्रामपंचायतीपैकी तब्बल ६२९ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. ...

चंद्रपूर : जिल्ह्यात असलेल्या एकूण ग्रामपंचायतीपैकी तब्बल ६२९ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात १७ सदस्य संख्या असलेल्या ९ ग्रामपंचायती आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गजांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतूनच राजकीय पक्षांचे जिल्ह्यात अस्तीत्व टिकून राहणार आहे.

सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये चिमूर तालुक्यातील शंकरपूर, भिसी, नेरी या तीन ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर नागभीड तालुक्यातील तळोधी, बल्लारपूर तालुक्यात विसापूर, वरोरा तालुक्यातील माजरी, तसेच चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर, उर्जानगर आणि घुग्घुस या मोठ्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. विशेष म्हणजे, घुग्घुस ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या वादात सापडली असून येथील नागरिकांनी शहरातील नगरपरिषदेचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने यासाठी पुढाकार घेत नागरिकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. मात्र ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायची नाही, या मुद्यावर येथील नागरिक ठाम आहे. दरम्यान, विविध मार्गाने आंदोलनही सुरु करण्यात आले आहे.

जिल्ह्यात १७ सदस्य संख्या असलेल्या प्रमुख आणि राजकीय दृष्टी संवेदनशील अशा या ग्रामपंचायती असल्याने प्रमुख राजकीय पक्षांसह इतर लहान पक्षांनीही आपआपले उमेदवार पॅनल बनवून उभे केले आहे. विशेष म्हणजे, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतूनच राजकीय पक्षांची भविष्यातील रणनीती ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण याकडे लक्ष ठेवून आहे.

---

६२९

निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती

---

सर्वात मोठ्या ग्रामपंचायती

शंकरपूर, भिसी, नेरी, तळोधी, विसापूर,माजरी, घुग्घुस, दुर्गापूर, उर्जानगर

----

सर्वात लहान ग्रामपंचायती

जिल्ह्यात सात सदस्यीय ग्रामपंचयी असून काही ग्रामपंचायतीमध्ये गट ग्रामपंचायत आहे.

----

एकूण सदस्य संख्या

१७

-----

घुग्घुस ग्रामपंचायतीची निवडणूक अधांतरी

राज्य सरकारने घुग्घुस ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा देण्याची अधिसुचना काढली आहे. मात्र ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर येथेही ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे येथे आंदोलन केले जात आहे. दरम्यान याकडे जिल्ह्यातील नागिरकांचे लक्ष लागले आहे.