शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १७ सदस्यीय ९ ग्रामपंचायतीत होणार निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:37 IST

चंद्रपूर : जिल्ह्यात असलेल्या एकूण ग्रामपंचायतीपैकी तब्बल ६२९ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. ...

चंद्रपूर : जिल्ह्यात असलेल्या एकूण ग्रामपंचायतीपैकी तब्बल ६२९ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात १७ सदस्य संख्या असलेल्या ९ ग्रामपंचायती आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गजांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतूनच राजकीय पक्षांचे जिल्ह्यात अस्तीत्व टिकून राहणार आहे.

सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये चिमूर तालुक्यातील शंकरपूर, भिसी, नेरी या तीन ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर नागभीड तालुक्यातील तळोधी, बल्लारपूर तालुक्यात विसापूर, वरोरा तालुक्यातील माजरी, तसेच चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर, उर्जानगर आणि घुग्घुस या मोठ्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. विशेष म्हणजे, घुग्घुस ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या वादात सापडली असून येथील नागरिकांनी शहरातील नगरपरिषदेचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने यासाठी पुढाकार घेत नागरिकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. मात्र ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायची नाही, या मुद्यावर येथील नागरिक ठाम आहे. दरम्यान, विविध मार्गाने आंदोलनही सुरु करण्यात आले आहे.

जिल्ह्यात १७ सदस्य संख्या असलेल्या प्रमुख आणि राजकीय दृष्टी संवेदनशील अशा या ग्रामपंचायती असल्याने प्रमुख राजकीय पक्षांसह इतर लहान पक्षांनीही आपआपले उमेदवार पॅनल बनवून उभे केले आहे. विशेष म्हणजे, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतूनच राजकीय पक्षांची भविष्यातील रणनीती ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण याकडे लक्ष ठेवून आहे.

---

६२९

निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती

---

सर्वात मोठ्या ग्रामपंचायती

शंकरपूर, भिसी, नेरी, तळोधी, विसापूर,माजरी, घुग्घुस, दुर्गापूर, उर्जानगर

----

सर्वात लहान ग्रामपंचायती

जिल्ह्यात सात सदस्यीय ग्रामपंचयी असून काही ग्रामपंचायतीमध्ये गट ग्रामपंचायत आहे.

----

एकूण सदस्य संख्या

१७

-----

घुग्घुस ग्रामपंचायतीची निवडणूक अधांतरी

राज्य सरकारने घुग्घुस ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा देण्याची अधिसुचना काढली आहे. मात्र ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर येथेही ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे येथे आंदोलन केले जात आहे. दरम्यान याकडे जिल्ह्यातील नागिरकांचे लक्ष लागले आहे.