शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १७ सदस्यीय ९ ग्रामपंचायतीत होणार निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:37 IST

चंद्रपूर : जिल्ह्यात असलेल्या एकूण ग्रामपंचायतीपैकी तब्बल ६२९ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. ...

चंद्रपूर : जिल्ह्यात असलेल्या एकूण ग्रामपंचायतीपैकी तब्बल ६२९ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात १७ सदस्य संख्या असलेल्या ९ ग्रामपंचायती आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गजांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतूनच राजकीय पक्षांचे जिल्ह्यात अस्तीत्व टिकून राहणार आहे.

सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये चिमूर तालुक्यातील शंकरपूर, भिसी, नेरी या तीन ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर नागभीड तालुक्यातील तळोधी, बल्लारपूर तालुक्यात विसापूर, वरोरा तालुक्यातील माजरी, तसेच चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर, उर्जानगर आणि घुग्घुस या मोठ्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. विशेष म्हणजे, घुग्घुस ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या वादात सापडली असून येथील नागरिकांनी शहरातील नगरपरिषदेचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने यासाठी पुढाकार घेत नागरिकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. मात्र ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायची नाही, या मुद्यावर येथील नागरिक ठाम आहे. दरम्यान, विविध मार्गाने आंदोलनही सुरु करण्यात आले आहे.

जिल्ह्यात १७ सदस्य संख्या असलेल्या प्रमुख आणि राजकीय दृष्टी संवेदनशील अशा या ग्रामपंचायती असल्याने प्रमुख राजकीय पक्षांसह इतर लहान पक्षांनीही आपआपले उमेदवार पॅनल बनवून उभे केले आहे. विशेष म्हणजे, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतूनच राजकीय पक्षांची भविष्यातील रणनीती ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण याकडे लक्ष ठेवून आहे.

---

६२९

निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती

---

सर्वात मोठ्या ग्रामपंचायती

शंकरपूर, भिसी, नेरी, तळोधी, विसापूर,माजरी, घुग्घुस, दुर्गापूर, उर्जानगर

----

सर्वात लहान ग्रामपंचायती

जिल्ह्यात सात सदस्यीय ग्रामपंचयी असून काही ग्रामपंचायतीमध्ये गट ग्रामपंचायत आहे.

----

एकूण सदस्य संख्या

१७

-----

घुग्घुस ग्रामपंचायतीची निवडणूक अधांतरी

राज्य सरकारने घुग्घुस ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा देण्याची अधिसुचना काढली आहे. मात्र ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर येथेही ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे येथे आंदोलन केले जात आहे. दरम्यान याकडे जिल्ह्यातील नागिरकांचे लक्ष लागले आहे.