शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिका निवडणूक प्रक्रियेत, तरीही विनयभंगाच्या तक्रारीचा आरोप

By admin | Updated: May 21, 2017 00:37 IST

शालिनी कुळाराम चौधरी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक तक्रारीत नमूद तारखेला ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्रावर होते.

जयदास सांगोडे : तक्रारी निरर्थक असल्याचे विभागीय उपायुक्तांचे पत्रलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शालिनी कुळाराम चौधरी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक तक्रारीत नमूद तारखेला ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्रावर होते. तसेच त्या दोन्ही दिवशी शाळेला सुटी होती. तेव्हा त्या शिक्षिकेचा विनयभंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे. ती तक्रार बिनबुडाची व खोटी आहे, असा दावा शिक्षक जयदास सांगोडे यांनी केला आहे.सांगोडे यांनी म्हटले की, १६ आॅगस्ट २०११ रोजी या शिक्षिकेने मी मुख्याध्यापक असताना कार्यालयात बोलावून विनयभंग व शरीरसुखाची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्या दिवशी शाळेत तक्रारकर्त्या शिक्षिकेसह दोन शिक्षिका व दोन पुरूष शिक्षक उपस्थित होते. त्याच तक्रारकर्ती शिक्षिकेने २ जानेवारी २०१२ रोजी जयदास सांगोडे उत्तम मुख्याध्यापक असल्याचे बयाण दिले आहे. विभागीय उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यांनी ४ मार्च रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यामध्ये शालिनी चौधरी यांनी पुन्हा सादर केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने फेरचौकशी न करता वारंवार त्याच मुद्याला अनुसरून निरर्थक तक्रार करीत असल्यास त्यांना ताकीद देण्यात यावी, असे फुटाणे यांनी कळविले आहे.या शिक्षिकेने शाळेतील सर्व शिक्षिकांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन २० आॅक्टोबर २०१५ रोजी बदली करण्याची मागणी केली होती. त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीची चौकशी समितीमार्फत १ मार्च २०१६ रोजी करण्यात आली. ती तक्रार निरर्थक व खोटी असल्याचे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १८ जून २०१६ रोजी म्हटले आहे. केवळ द्वेषभावनेतून तक्रार केल्याचा आरोप सांगोडे यांनी केला आहे.