शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सर्वांना आता निवडणुकीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST

उंबरठयावर आलेल्या विधानसभा निवडणुकांचे वेध आता राजकारणी, प्रशासन यंत्रणा आणि राजकीय कार्यकर्त्यांना लागलेले आहेत. जिल्ह्यात पूरस्थितीमुळे एका बाजूला ओला दुष्काळ, तर दुसरीकडे कमी पावसाअभावी दुष्काळ, अशी अवस्था आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या अपुऱ्या पावसामुळे शेतीची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी करावे काय? : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून प्रशासन निवडणुकीत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विधानसभा निवडणुकांचे वेध आता सर्वांना लागले आहे. यामुळे जिल्ह्याचे वातावरण ढवळून निघालेले आहे. असे असताना शेतकरी मात्र मोठया अडचणीच्या स्थितीत आहे. पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली आले होते. त्यांना त्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करून शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. मात्र प्रशासन आता निवडणुकीच्या कामात गुंतले असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.उंबरठयावर आलेल्या विधानसभा निवडणुकांचे वेध आता राजकारणी, प्रशासन यंत्रणा आणि राजकीय कार्यकर्त्यांना लागलेले आहेत. जिल्ह्यात पूरस्थितीमुळे एका बाजूला ओला दुष्काळ, तर दुसरीकडे कमी पावसाअभावी दुष्काळ, अशी अवस्था आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या अपुऱ्या पावसामुळे शेतीची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. शेतात दोन वर्षांपासून पिके मनासारखी झालेली नसल्यामुळे शेतकºयांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. पीक आणि इतर कर्ज पुन्हा थकीत असल्याने शेतकऱ्यांच्या मागे वसुलीचा दणका सुरू होईल. दुष्काळी अवस्थेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. गणशोत्सव काळात पाऊस उसंत घेईल, या आशेवर शेतकरी होते; परंतु आतापर्यंत तरी जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाची उघड झाप सुरूच आहे. आता नवरात्रीत पाऊस जाईल या आशेवर शेतकरी आहेत. त्या वेळीही पाऊस न गेल्यास कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना अतिशय अडचणीची अवस्था निर्माण झाली आहे. शेती-शेतकरी अडचणीत आला आहे. अशावेळी निवडणुकांचे बिगुल वाजू लागल्याने आता हे सर्व प्रश्न मागे पडल्यासारखे झाले असून आता निवडणुकांच्या चर्चेत लोक, तर डावपेचात राजकारणी रंगू लागले आहेत. आता प्रत्येक समस्येला नेत्यांकडे एकच उत्तर ‘निवडणुकी नंतर पाहू’असे झाले आहे.ग्रामीण भागातही चर्चा रंगू लागल्याग्रामीण भागातील वातावरणात राजकारणाचे रंग भरू लागले आहे. शेतकरी सोडून इतर मंडळी विधानसभा निवडणुकीचे वेध घेऊ लागले आहेत. मतदार याद्या आणि निवडणुकांच्या इतर कामात प्रशासन आतापासूनच गुंतले गेल्याने ओला दुष्काळ उपाययोजनांचे काय होणार, हो मोठा प्रश्न आहे. निवडणुकीच्या कामाबरोबरच दुष्काळ निवारणाच्या कामाकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.पोलीसही लागले तयारीलानिवडणुकांचा ज्वर जसा वाढू लागला तसे कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. निवडणुकीचे वातावरण यावेळी अत्यंत चुरशीचे असल्याने गावोगावी राजकीय गट चांगलेच सक्रिय झाल्याने कुठेही, केव्हाही तणाव निर्माण होऊ शकतो, अशी स्थिती आहे. पोलिसांनी याचा अंदाज घेऊन आतापासूनच तयारी सुरू केली आहे. निवडणुकांची चाहूल लागताच ‘सोशल मीडिया’वरील वाचाळवीर चेकाळले आहेत, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची कसरत पोलिसांना करावी लागणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा