शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

शेतकऱ्यांच्या अनुदानावर निवडणुकीने अवकळा

By admin | Updated: August 3, 2015 00:41 IST

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामाला जुंपली आहे.

बळीराजा हवालदिल : रबी, गारपीट अनुदान वाटपाचे काम कर्मचाऱ्यांअभावी ठप्पखडसंगी: जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामाला जुंपली आहे. या निवडणुकीमुळे रब्बी, गारपीट अनुदान वाटप प्रक्रीया रखडली आहे. पावसाने फिरवलेली पाठ आणि अनुदान मिळण्यास होत असलेला विलंब यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदील झाला आहे.मागील हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने २०१४-१५ या वर्षातील खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील अनेक गावामधील पैसेवारी कमी आली. शासनाने राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला. त्यामुळे दुष्काळ जाहीर केलेल्या गावात टंचाई उपाययोजना राबविण्याबरोबरच नुकसानी पोटी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यांपैकी खरीप हंगामातील काही प्रमाणात अनुदान वाटप झाले आहे.विदर्भात रब्बीचे पीक हाती येत असतानाच गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने जिल्हा प्रशासनाकडे अनुदान वर्ग केले आहे. अनुदान वाटपास सुरुवात होत नाही, तोच या अनुदान वाटपात तिढा निर्माण झाला होता. अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच अनुदान असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. याबाबत तोडगा निघेपर्यंत रब्बी हंगामातील अनुदान रखडले होते. काही प्रमाणात अनुदान वाटप होत नाही. तोच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यामुळे मागील महिन्यापासून निवडणुकीच्या कामात कर्मचारी गुंतले आहेत.निवडणुकीच्या कामासाठी महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. अनुदान वाटपात तहसीलदार आणि गावपातळीवरील तलाठी यांची भूमिका महत्वाची आहे. मात्र ४ जुलैपासून महसूल कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने रब्बी हंगामातील अनुदान वाटप प्रक्रिया रखडली आहे. शासनाकडे सन २०१२-१३ या वर्षातील रब्बीचे अनुदान शासनाकडे प्रलंबित होते. दोन वर्षानंतर नुकतेच हे अनुदान प्रशासनाकडे उपलब्ध झाले.रब्बीची वाटप प्रक्रिया सुरु होती. गारपीट अनुदानाच्या वाटपाची जुळवाजुळव सुरु होती, २०१२-१३ या वर्षातील रब्बी अनुदानाच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या नावाच्या यादीची शोधाशोध सुरू असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आणि अनुदान वाटपावर अवकळा पसरली. त्यामुळे दुष्काळात होरपळत असलेल्या बाधित शेतकऱ्यांवर आता पावसासोबत अनुदानाची वाट पाहण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)