शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या अनुदानावर निवडणुकीने अवकळा

By admin | Updated: August 3, 2015 00:41 IST

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामाला जुंपली आहे.

बळीराजा हवालदिल : रबी, गारपीट अनुदान वाटपाचे काम कर्मचाऱ्यांअभावी ठप्पखडसंगी: जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामाला जुंपली आहे. या निवडणुकीमुळे रब्बी, गारपीट अनुदान वाटप प्रक्रीया रखडली आहे. पावसाने फिरवलेली पाठ आणि अनुदान मिळण्यास होत असलेला विलंब यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदील झाला आहे.मागील हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने २०१४-१५ या वर्षातील खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील अनेक गावामधील पैसेवारी कमी आली. शासनाने राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला. त्यामुळे दुष्काळ जाहीर केलेल्या गावात टंचाई उपाययोजना राबविण्याबरोबरच नुकसानी पोटी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यांपैकी खरीप हंगामातील काही प्रमाणात अनुदान वाटप झाले आहे.विदर्भात रब्बीचे पीक हाती येत असतानाच गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने जिल्हा प्रशासनाकडे अनुदान वर्ग केले आहे. अनुदान वाटपास सुरुवात होत नाही, तोच या अनुदान वाटपात तिढा निर्माण झाला होता. अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच अनुदान असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. याबाबत तोडगा निघेपर्यंत रब्बी हंगामातील अनुदान रखडले होते. काही प्रमाणात अनुदान वाटप होत नाही. तोच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यामुळे मागील महिन्यापासून निवडणुकीच्या कामात कर्मचारी गुंतले आहेत.निवडणुकीच्या कामासाठी महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. अनुदान वाटपात तहसीलदार आणि गावपातळीवरील तलाठी यांची भूमिका महत्वाची आहे. मात्र ४ जुलैपासून महसूल कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने रब्बी हंगामातील अनुदान वाटप प्रक्रिया रखडली आहे. शासनाकडे सन २०१२-१३ या वर्षातील रब्बीचे अनुदान शासनाकडे प्रलंबित होते. दोन वर्षानंतर नुकतेच हे अनुदान प्रशासनाकडे उपलब्ध झाले.रब्बीची वाटप प्रक्रिया सुरु होती. गारपीट अनुदानाच्या वाटपाची जुळवाजुळव सुरु होती, २०१२-१३ या वर्षातील रब्बी अनुदानाच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या नावाच्या यादीची शोधाशोध सुरू असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आणि अनुदान वाटपावर अवकळा पसरली. त्यामुळे दुष्काळात होरपळत असलेल्या बाधित शेतकऱ्यांवर आता पावसासोबत अनुदानाची वाट पाहण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)