शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वृद्ध मातेचा पाच वर्षांपासून फुटपाथवरच संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 14:28 IST

राजुरा-चुनाळा मार्गावरील बसस्थानकानजिक असलेल्या वळणावर चक्क फुटपाथवर झोपडी थाटून या वृध्द माऊलीचा संसार अनेकांच्या काळजाला चिरे पडणारा आहे.

ठळक मुद्देरुखमाबाई शासनदरबारी उपेक्षितच गरिबीमुळे आयुष्यच पांगले

रवींद्र ठमकेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जन्मत:च दारिद्र. हाती पैसा नाही. हातावर आणून पानावर खाऊन जगणे असे नशिब. जिथे पोटापाण्याचा प्रश्न मिटत नाही, तिथे हक्काचे घर म्हणजे दिवास्वप्नच. राजुरा-चुनाळा मार्गावरील बसस्थानकानजिक असलेल्या वळणावर चक्क फुटपाथवर झोपडी थाटून या वृध्द माऊलीचा संसार अनेकांच्या काळजाला चिरे पडणारा आहे. शासनदरबारी कायम उपेक्षितच असल्याने या वृध्द माऊलीचा फुटपाथवरील संसार पाच वर्षांपासून तिथेच आहे.राजुरा येथील रूखमाबाई नत्थु श्रीनाथ (७०) व राजाराम नत्थु श्रीनाथ (४५) या मायलेकांची व्यथा अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. रुखमाबाई श्रीनाथ ही वृध्द माऊली गेल्या अनेक वर्षांपासून राजुरा शहरात वास्तव्य करते. चणे, फुटाणे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. पूर्वी ही वृध्द महिला कुटुंबाचा उदरनिर्वाह करून कमीतकमी किराया असलेल्या घरात राहायची. त्यानंतर मुलाचे लग्न झाले, मात्र काही दिवसातच मुलाची पत्नी कायमची माहेरी निघून गेली. कामधंदा नसल्याने चणे-फुटाणे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. जवळ पैसा नसल्याने किराया द्यायला पैसे नव्हते. त्यामुळे हतबल झालेल्या मायलेकांनी राजुरा बसस्थानक परिसरात असलेल्या टर्र्नींग पॉर्इंटवर चुनाळा मार्गावर गेल्या पाच वर्षांपूर्वी फुटपाथवर झोपडी थाटली. रुखमाबाईजवळ कमावून ठेवलेली कोणतीही तुटपुंजी मिळकत नाही. मागील आठवडयात आलेल्या वादळी पावसाने या वृध्द मातेची फुटपाथवर थाटलेली झोपडी डोळ्यादेखत अक्षरश: उडून गेली. एका पोत्यात मावणारे तिचे संसाराचे जीवन उपयोगी साहित्य आभाळाखाली आले. रुखमाबाईला राशनचे अन्नधान्य मिळते, हीच तेवढी शासनाची मदत. लॉकडाऊन झाल्याने चणे-फुटाणे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या मायलेकरांचा व्यवसाय कायम बुडाला. हाती पैसा नसल्याने कधी उपाशी रहावे लागल्याची व्यथा रुखमाबाईने ‘लोकमत’जवळ सांगितली. एकीकडे स्मार्ट सिटीचे स्वप्न शासनाकडून नागरिकांना दाखविले जात असतानाच दुसरीकडे वृध्द मातेसह तिचा मुलगा गेल्या पाच वर्षांपासून फुटपाथवर तुटक्याफुटक्या झोपडीत दिवस काढत आहे. आयुष्याच्या सायंकाळीही या वृध्द माऊलीचा जगण्याचा संघर्ष अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे. समाजात शासन आणि अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहे. या वृध्द मातेलाच आज ममत्वाची गरज आहे. त्यासाठी कोण पुढे येईल, हा प्रश्न आहे.

टॅग्स :Socialसामाजिक