शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सावरगावात ८४ वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:15 IST

गावातील वादविवाद विकोपाला जाऊ नयेत, यासाठी शासन एक गाव एक गणपती या संकल्पनेला गेल्या काही वर्षापासून प्रोत्साहन देत आहे.

ठळक मुद्देएकोप्याचे वातावरण : दहा दिवस राजकारण ठेवले जाते बाजूला

संजय अगडे ।लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (बा.) : गावातील वादविवाद विकोपाला जाऊ नयेत, यासाठी शासन एक गाव एक गणपती या संकल्पनेला गेल्या काही वर्षापासून प्रोत्साहन देत आहे. मात्र अप्पर तळोधी (बा.) तालुक्यातील सावरगाव येथे ही संकल्पना ८४ वर्षापासून राबविण्यात येत आहे. राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशिल अशी ओळख असलेल्या या गावात असा उपक्रम राबविला जात असल्याने कौतुक केले जात आहे.सार्वजनिक गणपती मंडळ असे या सावरगावच्या गणेश मंडळाचे नाव आहे. १९३२ साली या मंडळाची स्थापना करण्यात आली. १९३२ ते २०१७ या ८४ वर्षांच्या कालावधीत मंडळाचे केवळ तीन अध्यक्ष झाले. हे आणखी एक आश्चर्यच म्हणावे लागेल. पहिले अध्यक्ष लक्ष्मण पांडुरंग बोरकर हे होते. त्यानंतर रामकृष्ण चिरकुटा सहारे हे अध्यक्ष झाले तर आता मोरेश्वर कुकसू ठिकरे या मंडळाचे अध्यक्ष आहेत.खरे तर सावरगावची ओळख राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील गाव म्हणून आहे. पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील राजकारणाची चर्चा संपूर्ण तालुक्यात केली जात असते. निवडणूक कोणतीही असो, निवडणूक आली की ‘दोन धु्रवावर दोघे आपण’ अशी या गावाची विभागणी होऊन जाते. सावरगावची ग्रामसभा तर अनेकदा वादाचा विषय होत असते. अनेकदा हे वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचत असतात. तसेच तंटामुक्तीच्या माध्यमातून अनेक वाद मिटविले जाते. राजकीयदृष्ट्या सावरगावची अशी पार्श्वभूमी असली तरी गणपती उत्सवाच्या वेळी मात्र संपूर्ण सावरगाव एक होवून जाते. संपूर्ण गावाचा उत्सव होवून जातो. राजकीय मतभेद कितीही असोत, पण यावेळी मतभेदाना मुळीच थारा नसतो. गणेशोत्सवातील दहा दिवस एकोप्याचे वातावरण राहते. कोण कोणत्या पक्षाचा, याचा विचारही नसतो. शेवटचे दोन दिवस तर गावात स्वयंस्फूर्तीने बंद पाळला जातो. या दोन दिवसात कोणीही कामावर किंवा शेतावर जात नाही. शेवटच्या दिवशी गावात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. केवळ गावकरीच नाही तर आजुबाजुच्या परिसरातील नागरिकही या महाप्रसादाचा लाभ घेत असतात.सावरगावचे हे गणेश मंडळ केवळ उत्सवापुरतेच मर्यादित नाही. या मंडळाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे गावात करण्यात आली आहेत. या मंडळाच्या मिळकतीतून गावात श्री गुरुदेव मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. एका स्वयंपाकगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. १० हजार लोकसंख्येच्या स्वयंपाकासाठी पुरतील एवढी भांडीकुंडी खरेदी करण्यात आली आहेत. आणि नुकतेच चार लाख रुपये किमतीचे एक प्रशस्त घरही विकत घेण्यात आले आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने एक स्वयंपूर्ण गाव या मंडळाने निर्माण केले