शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

सावरगावात ८४ वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:15 IST

गावातील वादविवाद विकोपाला जाऊ नयेत, यासाठी शासन एक गाव एक गणपती या संकल्पनेला गेल्या काही वर्षापासून प्रोत्साहन देत आहे.

ठळक मुद्देएकोप्याचे वातावरण : दहा दिवस राजकारण ठेवले जाते बाजूला

संजय अगडे ।लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (बा.) : गावातील वादविवाद विकोपाला जाऊ नयेत, यासाठी शासन एक गाव एक गणपती या संकल्पनेला गेल्या काही वर्षापासून प्रोत्साहन देत आहे. मात्र अप्पर तळोधी (बा.) तालुक्यातील सावरगाव येथे ही संकल्पना ८४ वर्षापासून राबविण्यात येत आहे. राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशिल अशी ओळख असलेल्या या गावात असा उपक्रम राबविला जात असल्याने कौतुक केले जात आहे.सार्वजनिक गणपती मंडळ असे या सावरगावच्या गणेश मंडळाचे नाव आहे. १९३२ साली या मंडळाची स्थापना करण्यात आली. १९३२ ते २०१७ या ८४ वर्षांच्या कालावधीत मंडळाचे केवळ तीन अध्यक्ष झाले. हे आणखी एक आश्चर्यच म्हणावे लागेल. पहिले अध्यक्ष लक्ष्मण पांडुरंग बोरकर हे होते. त्यानंतर रामकृष्ण चिरकुटा सहारे हे अध्यक्ष झाले तर आता मोरेश्वर कुकसू ठिकरे या मंडळाचे अध्यक्ष आहेत.खरे तर सावरगावची ओळख राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील गाव म्हणून आहे. पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील राजकारणाची चर्चा संपूर्ण तालुक्यात केली जात असते. निवडणूक कोणतीही असो, निवडणूक आली की ‘दोन धु्रवावर दोघे आपण’ अशी या गावाची विभागणी होऊन जाते. सावरगावची ग्रामसभा तर अनेकदा वादाचा विषय होत असते. अनेकदा हे वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचत असतात. तसेच तंटामुक्तीच्या माध्यमातून अनेक वाद मिटविले जाते. राजकीयदृष्ट्या सावरगावची अशी पार्श्वभूमी असली तरी गणपती उत्सवाच्या वेळी मात्र संपूर्ण सावरगाव एक होवून जाते. संपूर्ण गावाचा उत्सव होवून जातो. राजकीय मतभेद कितीही असोत, पण यावेळी मतभेदाना मुळीच थारा नसतो. गणेशोत्सवातील दहा दिवस एकोप्याचे वातावरण राहते. कोण कोणत्या पक्षाचा, याचा विचारही नसतो. शेवटचे दोन दिवस तर गावात स्वयंस्फूर्तीने बंद पाळला जातो. या दोन दिवसात कोणीही कामावर किंवा शेतावर जात नाही. शेवटच्या दिवशी गावात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. केवळ गावकरीच नाही तर आजुबाजुच्या परिसरातील नागरिकही या महाप्रसादाचा लाभ घेत असतात.सावरगावचे हे गणेश मंडळ केवळ उत्सवापुरतेच मर्यादित नाही. या मंडळाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे गावात करण्यात आली आहेत. या मंडळाच्या मिळकतीतून गावात श्री गुरुदेव मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. एका स्वयंपाकगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. १० हजार लोकसंख्येच्या स्वयंपाकासाठी पुरतील एवढी भांडीकुंडी खरेदी करण्यात आली आहेत. आणि नुकतेच चार लाख रुपये किमतीचे एक प्रशस्त घरही विकत घेण्यात आले आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने एक स्वयंपूर्ण गाव या मंडळाने निर्माण केले