शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आठ तालुके दुष्काळसदृश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:50 IST

अनेकश्वर मेश्राम । लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ११४२.०९ मिमी इतके ...

ठळक मुद्देकमी पर्जन्यमानाचा परिणाम : रबी हंगामालाही फटका

अनेकश्वर मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ११४२.०९ मिमी इतके आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्याअखेर १०८६.७२ मिमी पावसाची नोंद झाली. चंद्रपूर, गोंडपिपरी, पोंभुर्णा, चिमूर, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड व राजुरा तालुक्यात सरासरीच्या तुलनेत यावर्षी कमी पर्जन्यमान झाले. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. याचा विपरित परिणाम जिल्ह्यातील आठ तालुक्याच्या रब्बी हंगामावरदेखील होण्याची शक्यता तर्वविली जात आहे.जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान पडणाऱ्या पावसावर शेतकऱ्यांचा खरीप व रब्बी हंगाम अवलंबून आहे. जिल्ह्यातील कृषीक्षेत्र कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांना निसर्गाच्या जलचक्रावर उत्पादन घ्यावे लागते. शेतातील उत्पादनावर बळीराजाला वर्षभराच्या उद्रनिर्वाहाची तजवीज करावी लागते, चिमूर, सिंदेवाही, मूल, नागभीड, ब्रह्मपुरी, सावली, पोंभुर्णा या तालुक्याला भाताचे आगार म्हणून ओळखले जाते. उच्च प्रतिच्या धानामुळे येथील तांदळाची निर्यात अन्य जिल्ह्यात केली जाते. मात्र यावर्षी गोंडपिपरी, पोंभुर्णा, चिमूर, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड या भात उत्पादक पट्ट्यात पावसाने दगा दिला. परिणामी भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली साली असून शेतकरी आर्थिक संकटात अडकला जात आहे.यावर्षी पावसाने बल्लारपूर, मूल, वरोरा, भद्रावती, कोरपना व जिवती तालुक्यात सरासरी ओलांडली. यामुळे काही प्रमाणात खरीप हंगामाला संजीवनी मिळाली. मात्र पावसाच्या खंडामुळे कापूस पिकांवर विपरित परिणाम झाला. कापसावर बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे कापसाचे उत्पादन घटण्याच्या मार्गावर आले आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.