शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

आठ तालुके दुष्काळसदृश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:50 IST

अनेकश्वर मेश्राम । लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ११४२.०९ मिमी इतके ...

ठळक मुद्देकमी पर्जन्यमानाचा परिणाम : रबी हंगामालाही फटका

अनेकश्वर मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ११४२.०९ मिमी इतके आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्याअखेर १०८६.७२ मिमी पावसाची नोंद झाली. चंद्रपूर, गोंडपिपरी, पोंभुर्णा, चिमूर, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड व राजुरा तालुक्यात सरासरीच्या तुलनेत यावर्षी कमी पर्जन्यमान झाले. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. याचा विपरित परिणाम जिल्ह्यातील आठ तालुक्याच्या रब्बी हंगामावरदेखील होण्याची शक्यता तर्वविली जात आहे.जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान पडणाऱ्या पावसावर शेतकऱ्यांचा खरीप व रब्बी हंगाम अवलंबून आहे. जिल्ह्यातील कृषीक्षेत्र कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांना निसर्गाच्या जलचक्रावर उत्पादन घ्यावे लागते. शेतातील उत्पादनावर बळीराजाला वर्षभराच्या उद्रनिर्वाहाची तजवीज करावी लागते, चिमूर, सिंदेवाही, मूल, नागभीड, ब्रह्मपुरी, सावली, पोंभुर्णा या तालुक्याला भाताचे आगार म्हणून ओळखले जाते. उच्च प्रतिच्या धानामुळे येथील तांदळाची निर्यात अन्य जिल्ह्यात केली जाते. मात्र यावर्षी गोंडपिपरी, पोंभुर्णा, चिमूर, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड या भात उत्पादक पट्ट्यात पावसाने दगा दिला. परिणामी भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली साली असून शेतकरी आर्थिक संकटात अडकला जात आहे.यावर्षी पावसाने बल्लारपूर, मूल, वरोरा, भद्रावती, कोरपना व जिवती तालुक्यात सरासरी ओलांडली. यामुळे काही प्रमाणात खरीप हंगामाला संजीवनी मिळाली. मात्र पावसाच्या खंडामुळे कापूस पिकांवर विपरित परिणाम झाला. कापसावर बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे कापसाचे उत्पादन घटण्याच्या मार्गावर आले आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.