शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आठ टक्के वृद्धांना अल्झामर्स डिमेंशियाचा धोका

By admin | Updated: September 21, 2016 00:48 IST

दिवसेंदिवस अल्झामर्स डिमेंशिया या रोगाचे प्रमाण वाढत आहे. जगातील जवळपास दोन कोटी लोकांना अल्झामर्स डिमेनशिया रोगाने बाधित आहेत.

परिमल डोहणे चंद्रपूर दिवसेंदिवस अल्झामर्स डिमेंशिया या रोगाचे प्रमाण वाढत आहे. जगातील जवळपास दोन कोटी लोकांना अल्झामर्स डिमेनशिया रोगाने बाधित आहेत. तर भारतात ४० लाख लोकांना हा आजार झाला आहे. वाढत्या धकाधकीच्या जीवनात विविध आजारांनी थैमान घातले आहे. यात असाध्य रोगही आहेत. या विविध आजारांपासून सुटका करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रयत्न सुरु असले तरी, रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ चिंतेचा विषय आहे. बदलत्या जीवनशैलीच्या परिणामामुळे अल्झामर्स डिमेनशिया या आजाराच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. चुकीचा आहार, वेळी-अवेळी होणारे जेवन, मद्यपान, धुम्रपान, गुटखा पदार्थांच्या सेवनामुळेही अल्झामर्स डिमेनशियाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे.अल्झामर्स डिमेनशिया हा आजार वयोवृद्ध नागरिकांना होत असतो. साधारणत: हा आजार ६५ वर्षांवरील लोकांना होतो. डिमेंशिया या रोगात साधारणत: ७० ते ८० टक्के रुग्ण अल्झामर्स डिमेनशियाने ग्रस्त असतात. संभवत: ६५ ते ७० या वयोगटातील आठ टक्के वृद्धांना हा आजार होण्याची शक्यता असते. डिमेंशिया या आजारात आपल्या स्मृतीचा व आकलन क्षमताचा हळूहळूृ ऱ्हास होतो. स्मरणशक्ती कमी होते. , नातलगांची नावे विसरणे, बोलण्यासाठी शब्द न सुचणे, रस्ता लक्षात न राहणे, पैशाचा हिशोब न जमणे, बहूतेक गोष्टी लक्षात न राहणे, दैनंदीन जिवनातील स्वत:ची कामे विसरणे, चित्र विचित्र आकृत्या दिसणे अशाप्रकारची लक्षणे या आजारामधील रुग्णांमध्ये दिसून येतात. हा आजार पूर्णत: बरा होत नसला तरीही, या आजारावर नियंत्रण ठेवता येते. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार उपचार करणे गरजेचे असते. तसेच नेहमी वाचन करणे, पझल, कोडे सोडविणे, बुद्धीबळ, वाद्य वाजविणे, नृत्य करणे तसेच बौद्धिक खेळ खेळणे याद्वारे आपण या रोगांवर नियंत्रण करु शकतो.दिवसेंदिवस या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. हा आजार पूर्णत: बरा होत नसला तरीही, या आजारावर नियंत्रण ठेवता येते. त्यासाठी सकस आहार घेणे, नियमीत व्यायम करणे व डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार उपचार करणे गरजेचे असते. तसेच नेहमी वाचन करणे, पझल, कोळे सोडविणे, बुद्धीबळ खेळणे, वाद्य वाजविणे, नृत्य करणे तसेच बौद्धीक खेळ खेळणे याद्वारे आपण या रोगांवर नियंत्रण करु शकतो.डॉ.विवेक बांबोडे, चंद्रपूर.