शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

आठ टक्के वृद्धांना अल्झामर्स डिमेंशियाचा धोका

By admin | Updated: September 21, 2016 00:48 IST

दिवसेंदिवस अल्झामर्स डिमेंशिया या रोगाचे प्रमाण वाढत आहे. जगातील जवळपास दोन कोटी लोकांना अल्झामर्स डिमेनशिया रोगाने बाधित आहेत.

परिमल डोहणे चंद्रपूर दिवसेंदिवस अल्झामर्स डिमेंशिया या रोगाचे प्रमाण वाढत आहे. जगातील जवळपास दोन कोटी लोकांना अल्झामर्स डिमेनशिया रोगाने बाधित आहेत. तर भारतात ४० लाख लोकांना हा आजार झाला आहे. वाढत्या धकाधकीच्या जीवनात विविध आजारांनी थैमान घातले आहे. यात असाध्य रोगही आहेत. या विविध आजारांपासून सुटका करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रयत्न सुरु असले तरी, रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ चिंतेचा विषय आहे. बदलत्या जीवनशैलीच्या परिणामामुळे अल्झामर्स डिमेनशिया या आजाराच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. चुकीचा आहार, वेळी-अवेळी होणारे जेवन, मद्यपान, धुम्रपान, गुटखा पदार्थांच्या सेवनामुळेही अल्झामर्स डिमेनशियाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे.अल्झामर्स डिमेनशिया हा आजार वयोवृद्ध नागरिकांना होत असतो. साधारणत: हा आजार ६५ वर्षांवरील लोकांना होतो. डिमेंशिया या रोगात साधारणत: ७० ते ८० टक्के रुग्ण अल्झामर्स डिमेनशियाने ग्रस्त असतात. संभवत: ६५ ते ७० या वयोगटातील आठ टक्के वृद्धांना हा आजार होण्याची शक्यता असते. डिमेंशिया या आजारात आपल्या स्मृतीचा व आकलन क्षमताचा हळूहळूृ ऱ्हास होतो. स्मरणशक्ती कमी होते. , नातलगांची नावे विसरणे, बोलण्यासाठी शब्द न सुचणे, रस्ता लक्षात न राहणे, पैशाचा हिशोब न जमणे, बहूतेक गोष्टी लक्षात न राहणे, दैनंदीन जिवनातील स्वत:ची कामे विसरणे, चित्र विचित्र आकृत्या दिसणे अशाप्रकारची लक्षणे या आजारामधील रुग्णांमध्ये दिसून येतात. हा आजार पूर्णत: बरा होत नसला तरीही, या आजारावर नियंत्रण ठेवता येते. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार उपचार करणे गरजेचे असते. तसेच नेहमी वाचन करणे, पझल, कोडे सोडविणे, बुद्धीबळ, वाद्य वाजविणे, नृत्य करणे तसेच बौद्धिक खेळ खेळणे याद्वारे आपण या रोगांवर नियंत्रण करु शकतो.दिवसेंदिवस या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. हा आजार पूर्णत: बरा होत नसला तरीही, या आजारावर नियंत्रण ठेवता येते. त्यासाठी सकस आहार घेणे, नियमीत व्यायम करणे व डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार उपचार करणे गरजेचे असते. तसेच नेहमी वाचन करणे, पझल, कोळे सोडविणे, बुद्धीबळ खेळणे, वाद्य वाजविणे, नृत्य करणे तसेच बौद्धीक खेळ खेळणे याद्वारे आपण या रोगांवर नियंत्रण करु शकतो.डॉ.विवेक बांबोडे, चंद्रपूर.