शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

आठ नगरपंचायती स्थापणार :

By admin | Updated: May 7, 2014 01:55 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील आठ नव्या नगर पंचायतींच्या स्थापनेसाठी

तालुकास्तरावरील ग्रामपंचायतींना मिळणार दर्जा नव्या नगरपंचायतीसाठी अधिसूचनेच्या हालचाली

गोपालकृष्ण मांडवकर ल्ल चंद्रपूर जिल्ह्यातील आठ नव्या नगर पंचायतींच्या स्थापनेसाठी शासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नगर विकास विभाग मंत्रलायाने आक्षेपही मागविले आहेत. यामुळे येत्या काही दिवसात जिल्ह्यातील आठ तालुका स्तरावरील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये होण्याच्या शक्यतेला मूर्त रूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात नगर विकास मंत्रालयातून निघालेली ही प्रारूप अधिसूचना १ मार्च २०१४ या तारखेची आहे. या अधिसूचनेनंतर पाच दिवसांनीच म्हणजेच ६ मार्चला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली. त्यामुळे हा विषय थंड बस्त्यात पडला होता. निवडणुकीच्या निकालानंतर या प्रारूप अधिसूचनेची अंमलबजावणी होणार असे दिसत आहे. चिमूर येथील एका शासकीय समारंभासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले असता त्यांच्यासमोर नागरिकांनी चिमूर जिल्हा निर्मीतीची मागणी केली होती.

त्यावर त्यांनी आपल्या भाषणातून चिमूरला नगर पंचायत स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी मंत्रिमंडळाचा ठरावही झाला होता. त्यात चिमूरसह अन्य शहरांचाही समावेश करण्यात आला होता. त्यानुसार नगर विकास विभागाने ही आधिसूचना काढली आहे. या प्रारूप अधिसूचनेनुसार, ज्या तालुका स्तरावर नगर पालिका नाहीत, त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीचे रूपांरत नगर पंचायत असे केले जाणार आहे. त्यासाठी सीमांकन, ग्रामपंचायतींचे स्थानिक क्षेत्र, नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र यांचा समावेश आहे. महाराष्टÑ नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्यागिक नगरी अधिनियमाच्या कलम ३४१ (क) चे पोटकलम (१), (१क) आणि (२) या नुसार अधिसूचना काढण्याच्या प्रस्तावावर आक्षेप मागविण्यात आले आहेत. हे आक्षेप ३० दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयात मागविण्यात आले होते. मात्र प्रारूप अधिसूचना निघाल्यावर आचारसंहीता लागल्याने हा विषय थांबला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती आहे. स्थापन केल्या जाणार्‍या नगर पंचायतीचे क्षेत्र दर्शविणारा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित तहसील कार्यालयांमध्ये नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. शहर तालुका मुख्यालयाचे असले तरी कमी लोकसंख्येमुळे अशा ठिकाणी ग्रामपंचायतीच अस्तित्वात आहेत. नगर पालिका स्थापन करण्यासाठी लोकसंख्येचा निकष महत्वाचा मानला जातो. मात्र, या गावांसाठी तो अडचणीचा होता.

परंतु नगरविकास मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याने तालुकास्तरावरील नागरिकांची नाराजी दूर होणार आहे. नगरपालिका निर्मितीमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणींवर हा नवा पर्याय मानला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी) येथे होणार नगरपंचायती ४ज्या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगर पालिका अस्तित्वात नाहीत, त्या ठिकाणी नगर पंचायती स्थापन्याचे सरकारचे धोरण आहे. याचा विचार करता, जिल्ह्यातील आठ तालुका मुख्यालयी नगर पालिका नाहीत. अर्थात चिमूर, कोरपना, जीवती, सिंदेवाही, गोंडपिपरी, सावली, पोंभुर्णा आणि नागभीड या ठिकाणी नगर पंचायतींची स्थापना होण्याचे संकेत आहेत. या ठिकाणी नगर पंचायती स्थापन झाल्यास विकासाला वाव मिळणार आहे.