शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

आठ कोटी ९७ लाख ७४ हजार वीज बिल थकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST

मंगल जीवने बल्लारपूर : कोरोना महामारीच्या काळात आर्थिक मंदीमुळे तालुक्यातील १२ हजार ९७४ वीज ग्राहकांकडे महावितरण कंपनीचे आठ कोटी ...

मंगल जीवने

बल्लारपूर : कोरोना महामारीच्या काळात आर्थिक मंदीमुळे तालुक्यातील १२ हजार ९७४ वीज ग्राहकांकडे महावितरण कंपनीचे आठ कोटी ९७ लाख ७४ हजार रुपये थकित आहेत. वसुलीसाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी कंबर कसली असून शहरात व प्रत्येक गावात वसुलीसाठी वीज कर्मचारी व जनमित्र यांच्या सहाय्याने घरोघरी जनसंपर्क सुरू आहे.

बल्लारपूर तालुक्यात २७ हजार वीज ग्राहक आहेत. यामध्ये १७ हजार ५०० शहरात आहेत. तर ९ हजार ५०० ग्रामीण क्षेत्रात वीज ग्राहक आहे. वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी शहरात बालाजी वॉर्ड, कारवा मार्ग व वस्ती विभागात तसेच कोठारी व विसापूर असे पाच विभागीय कार्यालय आहे. महावितरण कार्यालयाची तालुक्याची वीज ग्राहकांकडून एका महिन्याची वसुली सव्वाचार कोटींची आहे. परंतु कोरोना महामारीच्या संकटात तालुक्यातील १२ हजार ९७४ वीज ग्राहकांनी ८ कोटी ९७ लाख ७४ हजार रुपये वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत आली आहे.

बिल न भरणारे घरगुती १० हजार ३२७ वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ४ कोटी २७ लाख, एक हजार २१२ व्यापार व्यवसाय करणाऱ्यांकडे ७७ लाख ४२ हजार, ११८ लघुउद्योग ग्राहकांकडे ८७ लाख ५० हजार, १००७ कृषी ग्राहकांकडे ४८ लाख ७७ हजार, तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीकडे १ कोटी ७६ लाख, ग्रामीण विभागातील विसापूर व नांदगाव पोडे व इतर गावातील पाणीपुरवठा विभागाकडे ९ लाख ६६ हजार, सरकारी कार्यालय ९ लाख ३१ हजार व इतर १३ वीज ग्राहकांकडे १ लाख १६ हजार थकबाकी आहे.

लॉकडाऊन काळात महावितरणचे वीज ग्राहकांना सहकार्य लाभले आहे. या काळात महावितरणने वीज खंडित न करता पूर्णकाळ विद्युत पुरवठा केला. याशिवाय ३ ते ४ हजार वीजग्राहकांनी महावितरणला मीटर रीडिंग पाठवले तर ७ हजारपेक्षा जास्त ग्राहक ऑनलाइन वीज बिलाचा भरणा करू लागले आहे.

कोट

महावितरण आर्थिक तोट्यात आली असल्यामुळे आता थकबाकी वसुली मोहीम सुरू असून ग्राहकांनी वीज भरणा करून वीज जोड कपातीची कारवाई टाळावी.

- प्रवीण तुराणकर,उपकार्यकारी अभियंता, महावितरण,बल्लारपूर.

बॉक्स

वीज खंडित करू नये

बल्लारपूर शहरातील कोणत्याही नागरिकांची पूर्व सूचना दिल्याशिवाय वीज खंडित करू नये, विना अटीशिवाय हप्त्यांमध्ये वीज बिल स्वीकारावे, वीज खंडित करण्याचा आदेश त्वरित परत घ्यावा, या संदर्भाचे निवेदन महावितरणला देण्यात आले आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे रवीकुमार पुप्पलवार यांनी सांगितले.

बॉक्स

बिलात कपात करावी

कोरोना महामारीमुळे लोकांचे काम धंदे ठप्प झाले आहे. या काळात सरकारने आश्वासन दिले होते की,३० टक्के वीज बिल कमी करणार. बिल कमी न करता उलट व्याज लावणे सुरू आहे व कनेक्शन कापणे सुरू आहे ते बंद करावे, या आशयाचे निवेदन अमन पसंद कमिटीचे अध्यक्ष इस्माईल ढाकवाला यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.