शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

निधीअभावी रखडली रोहयोची कुशल कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2017 00:39 IST

बेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली.

कामे प्रलंबित : जिल्ह्यासाठी अडीच कोटींची गरज परिमल डोहणे चंद्रपूरचंद्रपूर : बेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. त्यानूसार नरेगातर्फे कुशल व अकुशल अशा दोन प्रकारची कामे करण्यात येतात. मात्र शासनाकडे कुशल निधी उपलब्ध नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील वैयक्तिक लाभाची अनेक कामे प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे, संपूर्ण राज्यभरातच २ नव्हेंबरपासून कुशल कामे बंद आहेत. ही कामे सुरु करण्यासाठी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यासाठी दोन कोटी ४३ लाख रुपये कुशल निधीची गरज आहे.दुष्काळातील मनुष्यबळ हाताळणीची एक उपाययोजना म्हणून महाराष्ट्रात रोजगार हमी योजना सुरु करण्यात आली. त्यामध्ये तेंडुलकर समितीने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील एकुण २७७ लाख गरीब ग्रामीण लोकांना रोजगार देण्याचा मुख्य उद्देश ठेऊन रोजगार हमी योजनेला सुरुवात करण्यात आली. त्यानुसार मागेल त्याला रोजगार या ाधारे जाबकार्डधारकांना रोहयोची कामे देण्यात येतात. ज्यावेळी मजुरांकडून कामाची मागणी केली जाते. त्यावेळी साधारणत: रोहयोची कामे सुरु केली जातात. जर मजुरांंना रोजगार उपलब्ध झाला नाही तर मजुरांना रोजगार भत्ता द्यावा लागतो. मात्र यावर्षी जशी कामाची मागणी झाली, तसेच कामे देण्यात आली.नरेगातर्फे ६० टक्के अकुशल कामे केली जातात. तर ४० टक्के ही कुशल कामे केली जात असतात. त्यामध्ये कुशल कामामध्ये वैयक्तिक लाभाची कामे अधिक प्रमाणात केली जातात. त्यामध्ये शौचालय, नाळे कंपोष्ट टाके, शौषखड्डे, सिंचन विहिरी, रस्ता बांधकाम, गुरांचा गोठा आदी कामे केली जातात. सन २०१६- २०१७ या वर्षात अनेक ग्रामपंचायतींनी ही कामे कुशल निधीद्वारे केली. मात्र निधीअभावी साहित्य खरेदीवर परिणाम पडला. त्यामुळे ही कामे अर्धवट राहिली. त्यामुळे यावर्षीच्या नवीन कामावर याचा विपरित परिणाम पडत आहे. कुशल निधीअभावी वैयक्तिक कामांवर परिणाम झालेला आहे. सदर कुशल निधीच्या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे व शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. लवकर निधीची पूर्तता करण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले आहे.-संजय बोदले,उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक, चंद्रपूर