शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

बसअभावी विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:07 IST

तोरगाव (खुर्द), तोरगाव (बु,) कोलारी, देऊळगाव येथील ४० विद्यार्थिनी ब्रह्मपुरी येथे शिक्षणासाठी येतात. परंतु मानव विकास मिशन योजने अंतर्गत बस उपलब्ध नसल्याने त्यांच्यासाठी एसटी जणू पांढरा हत्ती ठरला. आर्थिक परिस्थिती नसतानाही त्यांना दररोज स्वखर्चाने ब्रह्मपुरीत यावे लागत आहे. वेळेवर बस मिळाली नाही तर तासिका वाया जाते.

ठळक मुद्देपालकांमध्ये नाराजी : मानव विकास योजनेची अंमलबजावणी करा

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : तोरगाव (खुर्द), तोरगाव (बु,) कोलारी, देऊळगाव येथील ४० विद्यार्थिनी ब्रह्मपुरी येथे शिक्षणासाठी येतात. परंतु मानव विकास मिशन योजने अंतर्गत बस उपलब्ध नसल्याने त्यांच्यासाठी एसटी जणू पांढरा हत्ती ठरला. आर्थिक परिस्थिती नसतानाही त्यांना दररोज स्वखर्चाने ब्रह्मपुरीत यावे लागत आहे. वेळेवर बस मिळाली नाही तर तासिका वाया जाते.१ जुलैपासून शाळा, महाविद्यालये सुरू झाली. तेव्हापासून तोरगाव (खुर्द), तोरगाव (बु,) कोलारी, देऊळगाव येथील विद्यार्थिनींची बसअभावी गैरसोय होत आहे. मुली साक्षर व्हाव्या, त्यांच्यातील शिक्षणाचे प्रमाण वाढावे, यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जात आहे. मुलींना प्रोत्साहन म्हणून अनेक योजनांची घोषणा झाली. गावापासून तालुक्याच्या ठिकाणी व परगावी शिकणाऱ्या मुलींना घरापासून शाळेमध्ये जाण्यासाठी अडचण होऊ नये, यासाठी शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत संबंधित गावांपर्यंत बस पाठविण्याची योजना आहे. मात्र ४० विद्यार्थिनी योजनेपासून वंचित असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य ममता कुंभारे यांनी दिली.अशी आहे योजनामागास तालुक्यात स्त्री साक्षरतेचे प्रमाण वाढविणे आणि दारिद्रयरेषेखालील कुटुंबांची आर्थिक उन्नती करणे, हा मानव विकास संकल्पनेचा उद्देश आहे. या निकषानुसारच तालुक्याची निवड करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना १२ वीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी गाव ते शाळेपर्यंत मोफत बससेवा पुरविण्याची जबाबदारी राज्य परिवहन महामंडळाची आहे. वाहन खरेदीसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला.