शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

विद्यार्थ्यांच्या गावात शिक्षण आपल्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:23 IST

रमाबाई आंबेडकर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम उदय गडकरी सावली : कोरोना महामारीने संपूर्ण जग थांबले असताना ग्रामीण विद्यार्थी ज्ञानार्जनात मागे ...

रमाबाई आंबेडकर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

उदय गडकरी

सावली : कोरोना महामारीने संपूर्ण जग थांबले असताना ग्रामीण विद्यार्थी ज्ञानार्जनात मागे राहू नये, या उदात्त हेतूने सावली येथील रमाबाई आंबेडकर विद्यालयाच्या अध्यापकांनी विद्यालयाचे विद्यार्थी असलेल्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन ‘शिक्षण आपल्या दारी’ उपक्रम सुरू केला आहे.

या स्तुत्य उपक्रमाचे सर्व पालकांनी स्वागत केले आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीने सर्वत्र लाॅकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनावर होत असल्याने विद्यार्थ्यांचे पालक व अध्यापक ही चिंताग्रस्त झाले. त्या अनुषंगाने रमाबाई आंबेडकर विद्यालय सावलीच्या अध्यापकांनी एकमुखी निर्णय घेऊन ज्या गावांमध्ये विद्यालयाचे विद्यार्थी आहेत, त्या गावात जाऊन विद्यार्थ्यांना शिकविण्याचा उपक्रम हाती घेतला. मोखाळा, कढोली, हरांबा, साखरी, लोंढोली, उसेगाव, सिंदोळा, भट्टीजांब, मालपीरंजी, भारपायली यासारख्या ठिकाणी जाऊन आठ दहा विद्यार्थ्यांना एकत्र करून ज्ञानार्जनाचे कार्य ५ जुलैपासून सुरु केले. मागील वर्षी विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न या ‘शिक्षण आपल्या दारी’ उपक्रमाने सुरू आहे.

बॉक्स

ऑनलाईन शिक्षणापासून विद्यार्थी होते वंचित

ऑनलाईन वर्ग सुरू करण्याच्या सूचना सर्व विद्यालयांना दिल्या असल्या तरी ग्रामीण भागातील तसेच गरीब विद्यार्थी या सुविधेपासून वंचित होते. त्यामुळे ते शैक्षणिक प्रवाहातून मागे राहिले. या बाबींचा गंभीरपणे विचार करून रमाबाई आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. एल. शेंडे यांनी सह अध्यापकांना प्रवृत्त केले. स्वयंप्रेरणेने चालवीत असलेल्या या उपक्रमामुळे मागील दीड वर्षांपासून शैक्षणिक प्रवाहापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना निश्चितच प्रवाहात आणता येईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

कोट

श्रीमंत पालकांनी आपल्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून त्यांचे शैक्षणिक वातावरण कायम ठेवले. मात्र गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय दिसत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे केवळ वेतन भोगी न राहता समाजाचे आम्ही काही देणे लागतो म्हणून आमच्या विद्यालयाने ‘शिक्षण आपल्या दारी’ हा उपक्रम स्वयंप्रेरणेने राबविण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाला पालक व विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

-चंदा रायपुरे (गेडाम) अध्यापक रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली.