शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

अनियमित बसफेरीमुळे शिक्षणाचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 23:02 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या मूल डेपोतून गोंडपिपरीमार्गे सकाळच्या सुमारास सोडली जाणारी बस नियोजित वेळेवर सोडली जात नसल्याने नांदगाव, गोवर्धनपासून गोंडपिपरीला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनींची मोठी अडचण होत आहे. नियोजित वेळेपेक्षा बऱ्याच उशिराने बस येत असल्याने विद्यार्थिनींच्या अनेक तासिका बुडत असून मूल डेपो व्यवस्थापनाच्या अनागोंदी कारभाराचा त्यांना फटका बसत आहे. त्यामुळे पालकवर्गांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देडेपो व्यवस्थापनाचा अनागोंदी कारभार : मानव विकास योजनेपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या मूल डेपोतून गोंडपिपरीमार्गे सकाळच्या सुमारास सोडली जाणारी बस नियोजित वेळेवर सोडली जात नसल्याने नांदगाव, गोवर्धनपासून गोंडपिपरीला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनींची मोठी अडचण होत आहे. नियोजित वेळेपेक्षा बऱ्याच उशिराने बस येत असल्याने विद्यार्थिनींच्या अनेक तासिका बुडत असून मूल डेपो व्यवस्थापनाच्या अनागोंदी कारभाराचा त्यांना फटका बसत आहे. त्यामुळे पालकवर्गांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.मूल तालुक्याअंतर्गत येणाऱ्या नांदगाव, गोवर्धन आणि गोंडपिपरी तालुक्यातील घोसरीपासून दिघोरी, कवठी, घाटकूळ, भिमणी, नवेगाव मोरे आदी गावातील अनेक मुले-मुली गोंडपिपरी येथील स्व. लक्ष्मणराव जगन्नाथजी कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालय व इतर महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांना कॉलेजमध्ये जाण्यासाठी सकाळची बसफेरी मूल डेपोतून गोंडपिपरीसाठी सोडली जाते. पूर्वी ही बस नियोजित वेळी मूलवरून सोडली जायची. त्यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन ती ७ ते ७.२० वाजेपर्यंत गोंडपिपरीला पोहोचायची. त्यामुळे या सर्व गावाहून गोंडपिपरीला शिक्षणासाठी जाणाºया मुलींना सोईचे व्हायचे. सर्व तासिका त्यांना मिळायच्या. परंतु, चालू शैक्षणिक सत्रात ही बसफेरी नियोजित वेळेवर सोडली जात नसल्याने गोंडपिपरीला पोहोचायला विद्यार्थ्यांना कधी ८ वाजता तर कधी खूप उशीर होत आहे. परिणामी विद्यार्थिनींना महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत नसून रोजच तासिका बुडत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत महाविद्यालय प्रशासनाकडून मूल डेपो व्यवस्थापनाला निवेदन देऊन सदर बस सकाळी लवकर सोडण्याची मागणी करण्यात आली. परंतु, डेपो व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थिनींची ही अडचण पाहता डेपो व्यवस्थापनाने सकाळची बसफेरी किमान ७.२० वाजतापर्यंत गोंडपिपरीला पोहोचेल, या बेताने मूलवरून सोडावी, अशी मागणी विद्यार्थिनी व पालकांनी केली आहे.विद्यार्थिनींना सुविधांचा लाभ द्यावासावित्रीच्या लेकींना शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी शासनाने मानव विकास मिशनअंतर्गत इयत्ता १२ वीपर्यंत मुलींना शिक्षणाच्या ठिकाणी ये-जा करण्याकरिता मोफत बससेवेचा लाभ सुरू केला आहे. परंतु, मूल-गोंडपिपरी मार्गावर धावणाºया बसफेऱ्यांमधून या सेवेचा लाभ विद्यार्थिनींना दिला जात नसल्याच्याही अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींना शिक्षण घेणे अवघड होत असून वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन शासनाच्या धोरणानुसार इयत्ता १२ वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींना या सुविधेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.