शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पर्यावरणदिनी वृक्षांची कत्तल

By admin | Updated: June 6, 2016 01:52 IST

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाकडून दोन कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध

चंद्रपूर : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाकडून दोन कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध सामाजिक संघटनांकडून या दिवशी वृक्षारोपण केले जाते. मात्र येथील आदर्श सोसायटीत पर्यावरण दिवशी चक्क वृक्षांची कत्तल करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.चंद्रपूर जिल्ह्याचे प्रदूषण देशपातळीवर पोहचले आहे. जिल्ह्यात औद्योगिक क्रांती होत असली तरी जल, वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वृक्षांचे जिल्ह्यात रोपण होणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तर यावर्षी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तब्बल दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकजण या दिवशी वृक्षारोपण करून सामाजिक दायित्वाचा परिचय देतात. मात्र आज सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना बापटनगरातील आदर्श सोसायटीमधील एका गृहस्थाने केवळ झाडाच्या फांद्या त्यांच्या अंगणात येतात म्हणून झाडांची कत्तल करून टाकली. त्यांच्या घराच्या सुरक्षा भिंतीपलिकडे २२ वर्षांचे एक लिंबाचे झाड आणि एक बदामाचे झाड आहे. आज सकाळी त्यांनी झाडाला दोर बांधून झाडाची कत्तल करणे सुरू केले. परिसरातील नागरिकांना एवढे जुने आणि चांगले वृक्ष कापताना पाहून बरे वाटले नाही. त्यांनी संबंधित गृहस्थाला याबाबत विचारणा केली असता झाडाच्या फांद्या त्यांच्या अंगणात येतात, असे कारण त्या गृहस्थांकडून सांगण्यात आले. दोन्ही झाडे अगदी बुंध्यापासून कापण्यात आले आहे. शहरातील कोणतेही झाड तोडण्यासाठी महानगरपालिकेकडून रितसर परवानगी घ्यावी लागते. मात्र अशी कोणतीही परवानगी हे वृक्ष तोडताना घेण्यात आली नसल्याचे समजते. याबाबत महानगरपालिकेचे संबंधित झोनचे प्रमुख नामदेव राऊत यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. (शहर प्रतिनिधी)