शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परंपरागत व्यवसायाला ग्रहण

By admin | Updated: April 10, 2015 00:53 IST

थंड पाण्याच्या माध्यमातून कित्येकांचा आत्मा शांत करणारा कुंभार समाज शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आजही उपेक्षित जीवन जगत आहे.

गुंजेवाही : थंड पाण्याच्या माध्यमातून कित्येकांचा आत्मा शांत करणारा कुंभार समाज शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आजही उपेक्षित जीवन जगत आहे. त्यांचा परंपरागत व्यवसाय लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.उन्हाळ्यात जिवाची लाही लाही होत असताना माठातील शितल जल अमृताप्रमाणे असते. गरिबांचा फ्रिज म्हणून पहिली पसंती माठाला असते. परंतु माठ घडविणारा समाज आजही उपेक्षितांचे जीवन जगत आहे. उन्हाळ्यात थंडगार पाणी मिळावे म्हणून कुंभार समाज माठ तयार करतो. माठ घडविण्यासाठी कुंभाराला गरम भट्टीचे व शासन तथा समाज व्यवस्थेचे चटके सहन करावे लागत आहे. गुंजेवाही व परिसरात जिथे त्यांचे वास्तव्य आहेत, तिथे कुंभार मोहल्ला अशी स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. बारा बलुतेदारांपैकी एक असा हा समाज. परंपरा जोपासत पूर्वजापासून चालत असलेला आपला व्यवसाय पुढे चालवित आहे. मात्र अलिकडे त्यांची ही कला शासनाच्या उदासीनतेत सापडली आहे. अ‍ॅल्युमिनियम, स्टील, पितळ आणि प्लॅस्टीकच्या अनेक वस्तु बाजारात उपलब्ध असल्याने मातीची काही गृहोपयोगी भांडी नामशेष झाली आहेत. परंतु थंड पाण्यासाठी असलेला माठ आजही गरिबांचा फ्रिज म्हणून वापरात आहे.शेतकऱ्यांना शेतात पिकविणे माहीत आहे. परंतु विकणे माहीत नाही. त्याचप्रमाणे कुंभार समाजाला फक्त माठ बनविणे माहीत आहे. परंतु त्याहून मोठ्या आर्थिक लाभाचा मार्ग अवगत नाही. या माठ व्यवसायात इतर जाती समुहाचे विक्रेते तयार झाले आहेत. कुंभार समाजात शिक्षणाचा प्रसार अत्यल्प असल्याने संपूर्ण कुटुंब याच व्यवसायावर अवलंबून आहे. दिवसभर कामामुळे आपल्या मुलांकडे लक्ष देता येत नाही. मार्गदर्शनाचा अभाव व आईवडीलांची कसरत पाहून मुले शिक्षणापासून वंचित राहून व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न करीत आहेत. या व्यवसायात इंधनासाठी लागणारे लाकडे व माती हेच साहित्य महत्त्वाचे असले तरी वन कायद्यामुळे तेही आज दुर्मिळ झाले आहेत. जीवन जगण्यासाठी समाजाकडे दुसरा व्यवसाय नाही. समाज बांधव शेती करतात. अनेकजण मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे थंड पाण्याच्या माध्यमातून कित्येकांचा आत्मा शांत करणारा कुंभार समाज आजही उपेक्षीत जीवन जगत आहे. (वार्ताहर)