शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परंपरागत व्यवसायाला ग्रहण

By admin | Updated: April 10, 2015 00:53 IST

थंड पाण्याच्या माध्यमातून कित्येकांचा आत्मा शांत करणारा कुंभार समाज शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आजही उपेक्षित जीवन जगत आहे.

गुंजेवाही : थंड पाण्याच्या माध्यमातून कित्येकांचा आत्मा शांत करणारा कुंभार समाज शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आजही उपेक्षित जीवन जगत आहे. त्यांचा परंपरागत व्यवसाय लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.उन्हाळ्यात जिवाची लाही लाही होत असताना माठातील शितल जल अमृताप्रमाणे असते. गरिबांचा फ्रिज म्हणून पहिली पसंती माठाला असते. परंतु माठ घडविणारा समाज आजही उपेक्षितांचे जीवन जगत आहे. उन्हाळ्यात थंडगार पाणी मिळावे म्हणून कुंभार समाज माठ तयार करतो. माठ घडविण्यासाठी कुंभाराला गरम भट्टीचे व शासन तथा समाज व्यवस्थेचे चटके सहन करावे लागत आहे. गुंजेवाही व परिसरात जिथे त्यांचे वास्तव्य आहेत, तिथे कुंभार मोहल्ला अशी स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. बारा बलुतेदारांपैकी एक असा हा समाज. परंपरा जोपासत पूर्वजापासून चालत असलेला आपला व्यवसाय पुढे चालवित आहे. मात्र अलिकडे त्यांची ही कला शासनाच्या उदासीनतेत सापडली आहे. अ‍ॅल्युमिनियम, स्टील, पितळ आणि प्लॅस्टीकच्या अनेक वस्तु बाजारात उपलब्ध असल्याने मातीची काही गृहोपयोगी भांडी नामशेष झाली आहेत. परंतु थंड पाण्यासाठी असलेला माठ आजही गरिबांचा फ्रिज म्हणून वापरात आहे.शेतकऱ्यांना शेतात पिकविणे माहीत आहे. परंतु विकणे माहीत नाही. त्याचप्रमाणे कुंभार समाजाला फक्त माठ बनविणे माहीत आहे. परंतु त्याहून मोठ्या आर्थिक लाभाचा मार्ग अवगत नाही. या माठ व्यवसायात इतर जाती समुहाचे विक्रेते तयार झाले आहेत. कुंभार समाजात शिक्षणाचा प्रसार अत्यल्प असल्याने संपूर्ण कुटुंब याच व्यवसायावर अवलंबून आहे. दिवसभर कामामुळे आपल्या मुलांकडे लक्ष देता येत नाही. मार्गदर्शनाचा अभाव व आईवडीलांची कसरत पाहून मुले शिक्षणापासून वंचित राहून व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न करीत आहेत. या व्यवसायात इंधनासाठी लागणारे लाकडे व माती हेच साहित्य महत्त्वाचे असले तरी वन कायद्यामुळे तेही आज दुर्मिळ झाले आहेत. जीवन जगण्यासाठी समाजाकडे दुसरा व्यवसाय नाही. समाज बांधव शेती करतात. अनेकजण मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे थंड पाण्याच्या माध्यमातून कित्येकांचा आत्मा शांत करणारा कुंभार समाज आजही उपेक्षीत जीवन जगत आहे. (वार्ताहर)