शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

३० वर्षांच्या तालुक्याला विकासाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:28 IST

उदय गडकरी सावली : १५ ऑगस्टला सावली तालुका तिसाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. मात्र आजही हा तालुका विकासाच्या दृष्टीने ...

उदय गडकरी

सावली : १५ ऑगस्टला सावली तालुका तिसाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. मात्र आजही हा तालुका विकासाच्या दृष्टीने उपेक्षितच आहे. विकासाचे ग्रहण कधी सुटणार, हा प्रश्न तालुकावासीयांना पडला आहे.

२० वर्षांच्या अथक संघर्षानंतर १५ ऑगस्ट १९९२ ला तालुक्याची निर्मिती झाली. स्व. वामनराव गड्डमवार यांच्या प्रयत्नातून तत्कालीन मुख्यमंत्री स्व. सुधाकर नाईक यांनी तालुका निर्मितीची घोषणा केली. त्यासाठी पत्रव्यवहार आणि तालुका निर्मितीसाठी युवकांना संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक स्व. नी. ज. गडकरी यांनी पार पाडली. त्यांच्याच २० वर्षांच्या अथक संघर्षाचे फलित म्हणून सावली तालुका उदयास आला. तालुका झाला, पण विकासाचे काय? हा अनुत्तरितच असणारा प्रश्न. तालुका निर्मितीपासून सुमारे २० वर्षेपर्यंत या तालुक्याला दोन आमदार व दोन खासदार लाभले. परंतु त्यांना या तालुक्याचा सर्वांगीण विकास साधता आला नाही. ही सल सावलीकरांच्या मनात कायम आहे.

या तालुक्यासाठी मंजूर झालेली अनेक शासकीय कार्यालये सुरुवातीच्या २० वर्षांत इतरत्र पळविण्यात आली. क्रीडांगण, आठवडी बाजार, शासकीय इमारती, रोजगार निर्मिती, अशा अनेक बाबींची या तालुक्याला वानवा आहे. हे विकासाचे ग्रहण सोडविण्यासाठी कुणी पुढे धजावेल का?

बॉक्स

इंग्रज राजवटीत आसोलामेंढाची निर्मिती

२००९ ला परिसीमन आयोगाने सावली विधानसभा क्षेत्र गोठवून नवीन बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अस्तित्वात आणले. त्यातही सावलीकरांवर अन्याय करण्यात आला. स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी गाव म्हणून १९५२ मध्ये सावली गावाला विधानसभा क्षेत्राचा दर्जा देण्यात आला. शिवाय इंग्रज राजवटीत १८९१ सालात जिल्ह्यातील सर्वांत मोठा असलेल्या आसोला मेंढा तलावाच्या निर्मितीसोबतच सावली येथे निरीक्षण गृह व कार्यालयाची स्थापना केली. या सर्व ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या जोरावर सावली तालुक्‍याचा कायापालट होणे अपेक्षित होते. २० वर्षांतील तालुका निर्मितीच्या संघर्षानंतरही ३० वर्षांपासून विकासासाठी संघर्षच करावा लागेल काय, हा प्रश्न आपसूकच उभा ठाकतो.