शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
3
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
4
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
5
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
6
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
7
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
8
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
9
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
10
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
11
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
12
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
13
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
14
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
15
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
16
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
17
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
18
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
19
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
20
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?

हागणदारीमुक्तीला वाढीव कुटुंबांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:48 IST

राज्य सरकारने १०० टक्के शौचालय बांधून पुर्ण झाल्याचा दावा एक आठवड्यापूर्वी केला होता. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी स्वच्छता भारत मिशनतर्फे प्रभावी अंमलबजावणी केल्याचे जाहीर केले होते.

ठळक मुद्देअन्य योजनेतून बांधणार शौचालये : २२ हजार कुटुंबांना शौचालयाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य सरकारने १०० टक्के शौचालय बांधून पुर्ण झाल्याचा दावा एक आठवड्यापूर्वी केला होता. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी स्वच्छता भारत मिशनतर्फे प्रभावी अंमलबजावणी केल्याचे जाहीर केले होते. मात्र जिल्ह्यामध्ये तब्बल २२ हजार वाढीव कुटुंबीयांपर्यंत अद्याप शौचालयाची योजनाच पोहचली नाही. या कुटुंबीयांना आता स्वच्छ भारत मिशनऐवजी मनरेगा व अन्य योजनेतून शौचालय बांधून देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.जिल्ह्यातील १५ पंचायत समितीमध्ये २०१२ ला पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये तीन लाख ३० हजार कुटुंबीयांची नोंदणी पूर्ण झाली. यात सर्वेक्षणानुसार त्यावेळी जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार ५६६ कुटुंबीयांनी शौचालय बांधल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान संबंधित यंत्रणेमार्फत गाव पातळीवर सर्वेक्षणाचा वेग वाढवून नव्याने माहिती हाती घेण्याचे काम सुरू केले. त्यातून एक लाख ४४ हजार ५२९ कुटुंबीयांकडे शौचालयाची योजना पोहचली नाही. ही माहिती पुढे आली.२०१४ मध्ये निर्मल स्वच्छता अभियान योजनेचे नामांतर करून स्वच्छता भारत मिशन या नावाने सरकारने वैयक्तिक शौचालय बांधण्याचे जिल्हानिहाय उद्दिष्ट दिले होते. या उद्दिष्टानुसार जिल्हा परिषद व संबंधित यंत्रणेकडून तीन लाख ३ हजार ९५ व्यक्तिक शौचालय बांधण्याचे लक्ष्य देण्यात आले. जिल्हा परिषदेने संबंधित यंत्रणेला गतिमान करून मार्च २०१८मध्ये हे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण केले. बेसलाईन नंतर मार्च २०१८ अखेर साध्य केलेले हे उद्दिष्ट लक्षवेधी असले तरी वाढीव २२ हजार कुटुंबीयांना वैयक्तिक शौचालयाचा लाभ पोहोचविण्यासाठी जि.प. प्रशासनाची दमछाक झाली. याबाबत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, जिल्ह्याचे उद्दीष्ट्य पूर्ण झाले असून वाढीव कुटुंब शिल्लक आहे.यंत्रणेची उदासीनतापायाभूत सर्वेक्षणानंतर वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणा गावकऱ्यांना या योजनेचे महत्त्व पटवून देण्यास कमी पडली, असा आरोप काही ग्रामपंचायतींनी केला आहे. ही योजना गावखेड्यात पोहोचविण्यासाठी संबंधित कर्मचाºयांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन पाठपुरावा केला असता तर वाढीव कुटुंबांनादेखील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय योजनेचा लाभ घेता आला असता, असा दावाही त्यांनी केला आहे. वाढीव कुटुंबांना नव्या योजनेतून शौचालय बांधून देण्याचे नियोजन सरकारने केले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला हा सरकारचा दावा कसा मान्य करायचा, असा प्रश्नही सरपंचांनी विचारला आहे.तीन पंचायत समित्यांची आघाडीवैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी ब्रम्हपुरी, चिमूर आणि वरोरा तालुक्याने आघाडी घेतली. चिमूर (३०९१९), ब्रम्हपुरी (२९७६७), वरोरा (२७६९६) शौचालय बांधून उद्दिष्ट पूर्ण केले. चंद्रपूर पंचायत समितीने २५ हजार ८६१ शौचालय बांधली. ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ग्रामसभेच्या जागरूकतेमुळे या योजनेला यश मिळाले.