शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
4
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
7
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
8
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
9
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
10
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
11
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
12
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
13
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
15
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
16
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
17
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
18
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
19
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
20
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना

हागणदारीमुक्तीला वाढीव कुटुंबांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:48 IST

राज्य सरकारने १०० टक्के शौचालय बांधून पुर्ण झाल्याचा दावा एक आठवड्यापूर्वी केला होता. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी स्वच्छता भारत मिशनतर्फे प्रभावी अंमलबजावणी केल्याचे जाहीर केले होते.

ठळक मुद्देअन्य योजनेतून बांधणार शौचालये : २२ हजार कुटुंबांना शौचालयाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य सरकारने १०० टक्के शौचालय बांधून पुर्ण झाल्याचा दावा एक आठवड्यापूर्वी केला होता. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी स्वच्छता भारत मिशनतर्फे प्रभावी अंमलबजावणी केल्याचे जाहीर केले होते. मात्र जिल्ह्यामध्ये तब्बल २२ हजार वाढीव कुटुंबीयांपर्यंत अद्याप शौचालयाची योजनाच पोहचली नाही. या कुटुंबीयांना आता स्वच्छ भारत मिशनऐवजी मनरेगा व अन्य योजनेतून शौचालय बांधून देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.जिल्ह्यातील १५ पंचायत समितीमध्ये २०१२ ला पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये तीन लाख ३० हजार कुटुंबीयांची नोंदणी पूर्ण झाली. यात सर्वेक्षणानुसार त्यावेळी जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार ५६६ कुटुंबीयांनी शौचालय बांधल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान संबंधित यंत्रणेमार्फत गाव पातळीवर सर्वेक्षणाचा वेग वाढवून नव्याने माहिती हाती घेण्याचे काम सुरू केले. त्यातून एक लाख ४४ हजार ५२९ कुटुंबीयांकडे शौचालयाची योजना पोहचली नाही. ही माहिती पुढे आली.२०१४ मध्ये निर्मल स्वच्छता अभियान योजनेचे नामांतर करून स्वच्छता भारत मिशन या नावाने सरकारने वैयक्तिक शौचालय बांधण्याचे जिल्हानिहाय उद्दिष्ट दिले होते. या उद्दिष्टानुसार जिल्हा परिषद व संबंधित यंत्रणेकडून तीन लाख ३ हजार ९५ व्यक्तिक शौचालय बांधण्याचे लक्ष्य देण्यात आले. जिल्हा परिषदेने संबंधित यंत्रणेला गतिमान करून मार्च २०१८मध्ये हे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण केले. बेसलाईन नंतर मार्च २०१८ अखेर साध्य केलेले हे उद्दिष्ट लक्षवेधी असले तरी वाढीव २२ हजार कुटुंबीयांना वैयक्तिक शौचालयाचा लाभ पोहोचविण्यासाठी जि.प. प्रशासनाची दमछाक झाली. याबाबत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, जिल्ह्याचे उद्दीष्ट्य पूर्ण झाले असून वाढीव कुटुंब शिल्लक आहे.यंत्रणेची उदासीनतापायाभूत सर्वेक्षणानंतर वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणा गावकऱ्यांना या योजनेचे महत्त्व पटवून देण्यास कमी पडली, असा आरोप काही ग्रामपंचायतींनी केला आहे. ही योजना गावखेड्यात पोहोचविण्यासाठी संबंधित कर्मचाºयांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन पाठपुरावा केला असता तर वाढीव कुटुंबांनादेखील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय योजनेचा लाभ घेता आला असता, असा दावाही त्यांनी केला आहे. वाढीव कुटुंबांना नव्या योजनेतून शौचालय बांधून देण्याचे नियोजन सरकारने केले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला हा सरकारचा दावा कसा मान्य करायचा, असा प्रश्नही सरपंचांनी विचारला आहे.तीन पंचायत समित्यांची आघाडीवैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी ब्रम्हपुरी, चिमूर आणि वरोरा तालुक्याने आघाडी घेतली. चिमूर (३०९१९), ब्रम्हपुरी (२९७६७), वरोरा (२७६९६) शौचालय बांधून उद्दिष्ट पूर्ण केले. चंद्रपूर पंचायत समितीने २५ हजार ८६१ शौचालय बांधली. ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ग्रामसभेच्या जागरूकतेमुळे या योजनेला यश मिळाले.