शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

तीळगुड खा आणि गोड बोला, जग जिंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:04 IST

दिवसेंदिवस शालेय विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहे. यातून बालगुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. मात्र विद्यार्थ्यांनी मकरसंक्रांतीनिमित्त व्यसनापासून दूर जाण्याचा प्रयत्न करुन गोड बोलण्याचा संकल्प करावा. त्यातून आपले आयुष्य सुंदर होण्यास निश्चितच मदत होईल. मकरसंक्रात हा सण आपल्या मनातील राग, मत्सर, द्वेश टाळून आपल्या नातेसंबंधात गोडवा निर्माण करण्याचा आहे.

ठळक मुद्देमकरसंक्रांतीनिमित्त ठाणेदार ढाले यांचा संदेश

दिवसेंदिवस शालेय विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहे. यातून बालगुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. मात्र विद्यार्थ्यांनी मकरसंक्रांतीनिमित्त व्यसनापासून दूर जाण्याचा प्रयत्न करुन गोड बोलण्याचा संकल्प करावा. त्यातून आपले आयुष्य सुंदर होण्यास निश्चितच मदत होईल. मकरसंक्रात हा सण आपल्या मनातील राग, मत्सर, द्वेश टाळून आपल्या नातेसंबंधात गोडवा निर्माण करण्याचा आहे. राग हा क्षणिक असतो. मात्र त्यामुळे नातेसंबंध दुरावत असतात. याशिवाय समाजातील नकारात्मक भावना वाढीस लागते. बहुतेकदा गुन्हे घडण्याचे कारणसुद्धा राग अनावर होणे हेच असते. त्यामुळे गोड बोलून नातेसंबंध टिकवा, असे विचार पडोली पोलीस स्टेशनच्या ठाणेदार वैशाली ढाले यांनी मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. मकरसंक्रातीला महिला हळदीकुंकूवाचे कार्यक्रम करीत असतात. महिलांनी स्वत:ला दुबळे समजू नये, स्वत:च्या रक्षणाची जबाबदारी स्वत: पेलण्यासाठी स्वत:च पुढाकार घ्यावा. कुटुंबातील महत्वाचा दुवा स्त्री असते. त्यामुळे स्त्रीयांनीच धैर्याने व खंबीरपणे प्रत्येक संकटाला सामोरे गेले पाहिजे, यातून कुटुंबाचे व पर्यायाने समाजाचेही हित आहे. यात महिला नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वास ठाणेदार ढाले यांनी व्यक्त केला.मानव हा समाजात २ाहणारा प्राणी आहे. संवाद ही मानवाची गरज आहे. त्यासाठीच मानवाने गोड बोलून जग जिकंण्याचा प्रयत्न करावा. यातून माणसेही आपणाशी जोडली जातात. त्यामुळे मनुष्यांनी आनंददायी जीवनासाठी गोड आणि गुड बोलण्याचा निर्धार करावा, असेही वैशाली ढाले म्हणाल्या.