शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

ई- ग्रामसॉफ्ट प्रणाली सुरु होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:33 IST

जिल्ह्यातील ८२७ पैकी ९० टक्के ग्रामपंचायतींमध्ये ‘ई-ग्रामसॉफ्ट’ प्रणाली इन्स्टाल करण्यात आली असून लवकरच दफ्तरविरहित कामकाज सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे‘पेपरलेस’ कडे वाटचाल : इन्स्टॉलचे काम अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ८२७ पैकी ९० टक्के ग्रामपंचायतींमध्ये ‘ई-ग्रामसॉफ्ट’ प्रणाली इन्स्टाल करण्यात आली असून लवकरच दफ्तरविरहित कामकाज सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने या नव्या प्रणालीची अनेक गावांमध्ये नुकतीच यशस्वी चाचणी पार पडली. उर्वरित काम पूर्ण झाल्यास मे महिन्यापासून ग्रामपंचायतीमध्ये सुमारे ३० प्रकारची विविध प्रमाणपत्रे नागरिकांना अल्प शुल्कात प्राप्त होणार आहेत.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार ‘पेपरलेस’ व्हावा, यासाठी ग्रामविकास विभागाने ई-ग्रामसॉफ्ट प्रणाली विकसित केली. या प्रणालीद्वारे हस्तलिखित कामकाजाला पूर्णत: फाटा दिला जाणार असून विविध प्रकारचे प्रमाणपत्र नागरिकांना सहजपणे प्राप्त होणार आहे. सध्या आॅफलाईन पद्धतीने ही प्रमाणपत्रे दिली जात आहेत. ग्रामपंचायतपासून ते मंत्रालयापर्यंत थेट संवाद राहावा. शिवाय, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासाठी ई-ग्रामसॉफ्ट प्रणाली सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. काही ग्रामपंचायतींमध्ये मूलभूतर् सुविधा नाहीत. मुख्य म्हणजे २४ तास वीज उपलब्ध नसल्याने ही प्रणाली कुचकामी ठरणार, अशी टीका लोकप्रतिनिधींनी केली होती. वीज व तांत्रिकी कर्मचाºयांची शासनाने व्यवस्था न करता ही आधुनिक प्रणाली ग्रामविकास विभागाच्या वतीने लादल्याने सरपंच, उपसरपंच व सदस्यांमध्ये नाराज झाले होते. मात्र जिल्हा परिषदच्या पंचायत विभागाने यासंदर्भात गावागावांत सातत्याने बैठका घेऊन ई- ग्रामसॉफ्ट प्रणालीचे महत्त्व समजावून सांगितले होते. त्यामुळे ८२७ ग्रामपंचायतींनी ही प्रणाली सुरू करण्यासाठी होकार दर्शविला. यासंदर्भात ठराव पारित करून जिल्हा परिषद पंचायत विभागाला सादर करण्यात आले. परिणामी, काही ग्रामपंचायतींनी स्वत:चे आर्थिक उत्पन्न लक्षात घेऊन स्वबळावर काही उपाययोजनाही केल्या. यातून ई-प्रणाली जलद गतीने इन्स्टॉल करण्याचा मार्ग मोकळा होत आहे. ९० टक्के ग्रामपंचायतीमध्ये काम पूर्ण झाले. अंतिम तपासणी होताच ग्रामपंचायतच्या सहकार्याने आॅफलाईन कामकाज बंद केले जाणार आहे. कोरपना, जिवती, राजुरा, गोंडपिपरी, मूल, सावली तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये ई- ग्रामसॉफ्ट प्रणाली अद्याप इन्स्टाल झाली नाही. परंतु, ग्रामपंचायतींनी सहमती दिली आहे. तांत्रिक विभागाच्या सल्ल्यानुसार ही कामे लवकरच होणार असून ३३ प्रकारची महत्त्वपूर्ण प्रमाणपत्रे नागरिकांना अत्यल्प शुल्कात प्राप्त करता येणार आहे.वीज देयकांचा घोळ संपवाअनेक ग्रामपंचायतींचे वीज बिल थकित असल्याने वीज बिल कंपनीने नोटीस बजावली. तुर्त कारवाई बंद आहे. मात्र, संकट केव्हाही निर्माण होऊ शकते. त्यामुळे ई-ग्रामसॉफ्ट प्रणाली सुरू करताना वीज बिलाचा प्रश्नही सोडविणे गरजेचे आहे. १४ व्या वित्त आयोगातून वीज बिल भरा, असा आदेश जिल्हा परिषदेने दिला. परंतु, काही ग्रामपंचायतींचा या आदेशाला विरोध आहे.ई- ग्रामसॉफ्ट प्रणालीचे फायदेग्रामपंचायतमध्ये ई- ग्रामसॉफ्ट प्रणाली सुरू झाल्यानंतर आॅफलाईन कारभार बंद करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना नाममात्र शुल्क देऊन विविध प्रकारचे प्रमाणपत्र प्राप्त करता येऊ शकते. मालमत्ता कर आकारणी, रहिवाशी प्रमाणपत्र, वीज जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र, शौचालय बांधकामासाठी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र बांधकामासाठी अनुमती, जन्म- मृत्यूची नोंद, शासकीय योजनांचा लाभ, अनुभवाचे प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, नोकरी व व्यवसायासाठी नाहरकत, वय, कुटुंब, नळ जोडणी, बेरोजगारीचे प्रमाणपत्र, मालमत्ता व जमीन फेरफारसंदर्भातील प्रमाणपत्रासाठी शुल्क भरुन ही सेवा प्रत्येक नागरिकाला प्राप्त करता येते. प्रणाली सुरू झाल्यानंतर शंभर टक्के कामकाज पेपरलेस पद्धतीने होणार आहे. सुरुवातीला नकार देणाºया ग्रामपंचायतीनी आता जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला सहकार्य करीत आहे.ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांना आधुनिक ई-ग्रामसॉफ्ट प्रणालीचे महत्त्व विविध कार्यशाळेतून पटवून देण्यात आले. त्यामुळे ९० टक्के ग्रामपंचायतींमध्ये १०० टक्के काम पूर्ण झाले. शिवाय, तांत्रिक अडचणी दूर केली जात आहेत. जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायतीमध्ये सुसंवाद वाढविण्यासाठी या प्रणालीचा मोठा फायदा होणार आहे.- ओमप्रकाश यादव, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत), जि.प. चंद्रपूर

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत