शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

मरणासन्न रूग्ण सोडले बेवारस !

By admin | Updated: December 18, 2014 00:47 IST

ज्यांना रक्ताच्या नात्यांनी धुत्कारले, सख्यासोबत्यांनीही वाळीत टाकले अशा बेवारस वृद्धांच्या जीवनातील काळोख पुन्हा आयुष्याच्या ...

गोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूर ज्यांना रक्ताच्या नात्यांनी धुत्कारले, सख्यासोबत्यांनीही वाळीत टाकले अशा बेवारस वृद्धांच्या जीवनातील काळोख पुन्हा आयुष्याच्या संध्याकाळीही गडदल्याची दुर्दैवी प्रचिती चंद्रपुरात घडली आहे. बेवारस जगणाऱ्या आजारी वृद्धांना सामाजिक कार्यकर्त्यांनी रूग्णालयात दाखल केले असले तरी, उपचारानंतर दुरूस्त झाल्याचा शेरा देऊन पुन्हा त्यांची रवानगी बाहेर केली जाते. अशा तीन वृद्धांना गेल्या चार दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रूग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यातील एका महिलेचा बुधवारी सकाळी बेवारसपणे मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तर अन्य दोघे आजारी रूग्ण मरणासन्न अवस्थेत महाकाली मंदीर परिसरात अखेरची घटका मोजत आहेत.मृत पावलेल्या महिलेचे नाव कळू शकलेले नाही. तिचा एक पाय तुटलेला होता. सुमारे ६५ वर्षे वयाच्या या महिलेला गेल्या आठवड्यात कुणीतरी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले होते. तिच्यावर उपचार केल्यावरही ती बरी झाली नाही. तरीही तिला डिस्चार्ज देण्यात आला.भाऊराव नामक एका ६५ वर्षीय इसमाला अय्युब कच्छी नामक सामाजिक कार्यकर्त्याने याच रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तो त्यांना आजारी अवस्थेत आढळला होता. या सोबतच गंगाधर असे नाव सांगणाऱ्या ७० वर्षीय वृद्धालाही अशाच प्रकारे कुणाच्यातरी माध्यमातून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यातील गंगाधर आणि भाऊराव हे वॉर्ड क्रमांक चार मध्ये तर अज्ञात महिला वॉर्ड क्रमांक पाच मध्ये उपचार घेत होती. तशी नोंदही रूग्णालयात आहे. मात्र या तिघांचीही प्रकृती सुधारण्यापूर्वीच त्यांना चार दिवसांपूर्वी महाकाली मंदीर परिसरात रूग्णालयाच्या व्यवस्थापनाने आणून सोडले. परिसरातील नागरिकांच्या माहितीनुसार महिलेला आॅटोने तर गंगाधर आणि भाऊराव यांना रूग्णवाहिकेने आणून सोडण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कडाक्याच्या थंडीत या तिघांनीही रात्र घालविली. परिसरातील दुकानदारांनी त्यांना खायला दिले होते. कुण्यातरी कणवाळू व्यक्तीने ब्लँकेट्स दिले होते. मात्र यातील महिलेचा बुधवारी पहाटे झोपेतच मृत्यू झाल्याचे सकाळी आढळून आले.या प्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सायंकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन झाले असले तरी, अद्यापही कुणी ओळख पटविणारे पुढे आलेले नाही. गंगाधर आणि भाऊराव आजारी अवस्थेत मंदीर परिसरातच विश्रांती घेत आहेत. ‘लोकमत’ने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र आजारपणामुळे त्यांना धड बोलताही येत नव्हते. भाऊराव पठाणपुरा येथील तर गंगाधार वरोरा नाका परिसरात राहणारा असल्याचीच माहिती मिळू शकली. या संदर्भात जिल्हा सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुरंबिकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.