शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
6
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
8
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
9
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
10
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
11
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
12
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
13
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
14
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
15
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
16
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
17
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
18
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
19
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
20
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा

मरणासन्न रूग्ण सोडले बेवारस !

By admin | Updated: December 18, 2014 00:47 IST

ज्यांना रक्ताच्या नात्यांनी धुत्कारले, सख्यासोबत्यांनीही वाळीत टाकले अशा बेवारस वृद्धांच्या जीवनातील काळोख पुन्हा आयुष्याच्या ...

गोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूर ज्यांना रक्ताच्या नात्यांनी धुत्कारले, सख्यासोबत्यांनीही वाळीत टाकले अशा बेवारस वृद्धांच्या जीवनातील काळोख पुन्हा आयुष्याच्या संध्याकाळीही गडदल्याची दुर्दैवी प्रचिती चंद्रपुरात घडली आहे. बेवारस जगणाऱ्या आजारी वृद्धांना सामाजिक कार्यकर्त्यांनी रूग्णालयात दाखल केले असले तरी, उपचारानंतर दुरूस्त झाल्याचा शेरा देऊन पुन्हा त्यांची रवानगी बाहेर केली जाते. अशा तीन वृद्धांना गेल्या चार दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रूग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यातील एका महिलेचा बुधवारी सकाळी बेवारसपणे मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तर अन्य दोघे आजारी रूग्ण मरणासन्न अवस्थेत महाकाली मंदीर परिसरात अखेरची घटका मोजत आहेत.मृत पावलेल्या महिलेचे नाव कळू शकलेले नाही. तिचा एक पाय तुटलेला होता. सुमारे ६५ वर्षे वयाच्या या महिलेला गेल्या आठवड्यात कुणीतरी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले होते. तिच्यावर उपचार केल्यावरही ती बरी झाली नाही. तरीही तिला डिस्चार्ज देण्यात आला.भाऊराव नामक एका ६५ वर्षीय इसमाला अय्युब कच्छी नामक सामाजिक कार्यकर्त्याने याच रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तो त्यांना आजारी अवस्थेत आढळला होता. या सोबतच गंगाधर असे नाव सांगणाऱ्या ७० वर्षीय वृद्धालाही अशाच प्रकारे कुणाच्यातरी माध्यमातून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यातील गंगाधर आणि भाऊराव हे वॉर्ड क्रमांक चार मध्ये तर अज्ञात महिला वॉर्ड क्रमांक पाच मध्ये उपचार घेत होती. तशी नोंदही रूग्णालयात आहे. मात्र या तिघांचीही प्रकृती सुधारण्यापूर्वीच त्यांना चार दिवसांपूर्वी महाकाली मंदीर परिसरात रूग्णालयाच्या व्यवस्थापनाने आणून सोडले. परिसरातील नागरिकांच्या माहितीनुसार महिलेला आॅटोने तर गंगाधर आणि भाऊराव यांना रूग्णवाहिकेने आणून सोडण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कडाक्याच्या थंडीत या तिघांनीही रात्र घालविली. परिसरातील दुकानदारांनी त्यांना खायला दिले होते. कुण्यातरी कणवाळू व्यक्तीने ब्लँकेट्स दिले होते. मात्र यातील महिलेचा बुधवारी पहाटे झोपेतच मृत्यू झाल्याचे सकाळी आढळून आले.या प्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सायंकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन झाले असले तरी, अद्यापही कुणी ओळख पटविणारे पुढे आलेले नाही. गंगाधर आणि भाऊराव आजारी अवस्थेत मंदीर परिसरातच विश्रांती घेत आहेत. ‘लोकमत’ने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र आजारपणामुळे त्यांना धड बोलताही येत नव्हते. भाऊराव पठाणपुरा येथील तर गंगाधार वरोरा नाका परिसरात राहणारा असल्याचीच माहिती मिळू शकली. या संदर्भात जिल्हा सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुरंबिकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.