शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

धुळीने अर्धे ब्रह्मपुरीकर त्रस्त

By admin | Updated: May 11, 2015 01:12 IST

कोट तलावाच्या सौंदर्यीकरणाला ‘लोकमत’च्या दणक्याने वेग आला आहे.

ब्रह्मपुरी : कोट तलावाच्या सौंदर्यीकरणाला ‘लोकमत’च्या दणक्याने वेग आला आहे. तलावातील उपसा केलेली माती १ किमी अंतरावर काहाली रोडवर महसूलच्या जमिनीवर खड्यात फेकण्याचे काम सुरू आहे. परंतु, माती फेकण्याचे काम खुल्या टिप्परद्वारे केले जात असल्याने माती डांबरीरस्त्यावर पडत आहे. त्यामुळे धुळीने शहर ग्रासले असून अर्ध्या ब्रह्मपुरीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चार कोटी पन्नास लाख रूपये खर्च करून तलाव सौंदर्यीकरण करण्याचे काम थंडबस्त्यात होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. या वृत्ताने प्रशासनाला जाग आली आणि दखल घ्यावी लागली. लगेच गाळ उपसा करण्यासाठी कंत्राटदाराला अधिक निधी मंजूर केल्याने कामाला गती मिळाली. तलावामधील खराब गाळ उपसा करण्यासाठी टिप्पर व जेसीपी लावून उपसा केल्या जात आहे. परंतु, ज्या टिप्परने हा गाठ उपसा करून दूरवर फेकला जात आहे, त्या दरम्यान डांबरीरस्त्यावर डांबराच्या ऐवजी मोठ्या प्रमाणात माती पडली आहे. मातीचे थर एकावर एक बसून वाहन गेल्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. त्यामुळे सौंदर्यीकरण तलावाचे जरी होत असले तरी टिळकनगर, वाल्मीकनगर, विद्यानगर, महाविद्यालय परिसर, गांधीनगर, शारदा कॉलनी येथील नागरिकांचे आरोग्य धुळीमुळे धोक्यात आले आहे. संबंधित कंत्राटदार मातीची उचल ज्या टिप्परने करीत आहे, ते टिप्परचा मागील भाग खुले आहेत. त्यामुळे टिप्परमधून माती रस्त्यावर पडत असून कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत आहे. (प्रतिनिधी)कंत्राटदाराचे दुर्लक्षमुख्य कंत्राटदाराने तलावाचे काम अनेकांवर सोडून दिल्याने कामात योग्यता दिसून येत नाही. हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा असून तलाव सौंदर्यीकरणाच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल होत असल्याचे बोलले जात आहे.