शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

चुकीच्या औषध फवारणीने धान पीक झाले उद्ध्वस्त

By admin | Updated: November 4, 2015 00:49 IST

कीटकनाशकाऐवजी तणनाशक औषधांची फवारणी केल्याने चार एकरवरील संपूर्ण धान पीक उद्ध्वस्त झाले.

बोरगाव येथील घटना : पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धडपडचंद्रजित गव्हारे आक्सापूरकीटकनाशकाऐवजी तणनाशक औषधांची फवारणी केल्याने चार एकरवरील संपूर्ण धान पीक उद्ध्वस्त झाले. हा प्रकार गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथे घडला.कर्ज नापिकीने होत असलेल्या बळीराजाच्या आत्महत्येचे सत्र अद्यापही सुरू आहे. विदर्भ, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने घडत आहे. अशातच बोरगाव येथील वंदेश फुलझेले या शेतकऱ्याने चुकून धान पिकावर कीटकनाशकाऐवजी तणनाशक औषध फवारले आणि घात झाला. स्वत: चुकीने चार एकर शेतातील पिक हातून जाण्याचे दिसताच त्याच्याही मनात आत्महत्येचा विचार घोंगावू लागला. मात्र या संकटात पत्नीने साथ दिली. ‘रडायचं नाही लढायचं....!’ असच जणू ती त्याला म्हणाली. चुका माणसाच्या हातून होतात व त्या दुरुस्तही करता येतात, असे सांगत ती त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. पत्नीच्या दिलेल्या या हिमतीने त्यालाही मोठे बळ मिळाले. नव्या दमाने आपली चूक दूरुस्त करण्यासाठी आता दोघांनीही मिळून कंबर कसली आहे. आत्महत्या करण्याचा विचार मनात आणणाऱ्या बळीराजासाठी उमेदाची नवी प्रेरणा देणारा हा प्रकार गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथे समोर आला आहे.गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथील वंदेश दादाजी फुलझेले यांची वढोली मार्गावर चार एकर शेती आहे. त्या शेतात तो धानाचे पीक घेतो. यावर्षी सुरुवातीला पाऊसच नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिरा रोवणी केली. सामान्य परिस्थिती व सततचा दुष्काळ असतानादेखील वंदेशने कर्ज काढून चार एकर शेतात धानाची रोवणी केली. काही दिवसांत हिरवेगार धानपिक डौलात उभे होते. धानावर फवारणीची वेळ आली. वंदेशने आपल्या शेतातील धान पिकावर फवारणी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी शेत बघितल्यानंतर त्याला धक्काच बसला. कारण हिरवेगार धानपिक पूर्णत: पिवळे पडले होत. धानाचे रोप पूर्णत: खराब झाल्याचे त्याच्या लक्षात आले. असे का झाले, याचा शोध घेतला असता धानावर मारण्याच्या फवारणीच्या औषधीऐवजी तणनाशक पॅरागार्ड औषधीची त्याने फवारणी केली होती. आपल्या हाताने नकळत झालेल्या चुकीने तो धास्तावून गेला. जे पिक वाढविण्यासाठी गेले दोन महिने सतत मेहनत घेतले ते आपल्या चूकीने काही क्षणातच नष्ट होण्याच्या मार्गावर आल्याने वंदेशच्या पायाखालची जमीन सरकली. तो कमालीचा निराश झाला.कर्ज काढून रोवणी केली. परिश्रमातून शेती फुलविली. मात्र त्याच्या एका चुकीने सारे शेत डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाले. त्याच्या जीवाची घालमेल सुरू झाले. आत्महत्येचा विचार डोक्यात घोंगावू लागला. मात्र या परिस्थितीत वंदेशला त्याच्या पत्नीने सावरले. त्याला त्या मानसिकतेतून तिने बाहेर काढले. धानावर तणनाशकाची फवारणी झाल्याने पुन्हा धानाला जिवंत अवस्थेत आणणे कठीण आहे. मात्र तरीही कृषी सहायक व गावातील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार हे पती-पत्नी पिकाला वाचवण्यासाठी जीवाचा आटापीटा करीत आहे. विविध उपाययोजना केल्या जात आहेत. एका लहानशा चुकीने वंदेशच्या मोठ्या परिश्रमावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.