शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

अऱ्हेरनवरगाव मार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा

By admin | Updated: September 19, 2016 00:54 IST

तालुक्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेला अऱ्हेरनवरगाव- पिंपळगाव (भो.) हा मार्ग नेहमी पाण्याखाली असतो.

गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा : रस्ता दुरुस्तीची मागणीब्रह्मपुरी : तालुक्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेला अऱ्हेरनवरगाव- पिंपळगाव (भो.) हा मार्ग नेहमी पाण्याखाली असतो. त्यामुळे या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरुन मार्गक्रमण करणाऱ्यास प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.दोन विधानसभा क्षेत्रात विभागलेला अऱ्हेरनवरगाव ब्रह्मपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण ठिकाण आहे. या गावातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना शिक्षण, खरेदी, शासकीय कामे, भाजीपाला विक्रीसाठी अऱ्हेरनवरगाव या मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे सायकल, दुचाकी व चारचाकी वाहने या मार्गावरुन जात असतात. परंतु, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ेखड्डे पडलेले आहेत. परिणामी मार्गावर नेहमी पाणी साचले असते. यामुळे हा मार्ग जलमार्ग असल्याचे चित्र नेहमीच दिसून येते. या जलमार्गातून मुक्ती केव्हा मिळणार, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.सदर रस्त्यावरील ८०० मीटर लांबीच्या रस्त्याचे सिमेंटीकरण झालेले आहे.मात्र उर्वरित रस्त्याची दैनावस्था झाली आहे. रत्यावर लहान मोठ्या अशे अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्डयात नेहमी पाणी साचले असते. परिणामी या मार्गावर अनेकांचे अपघात घडले आहेत. त्यामुळे या रस्त्याचेसुद्धा सिमेंटीकरण होणे करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.यासंबधी जनप्रतीनिधीनासुद्धा कल्पना देण्यात आली. मात्र तेसुद्धा दुर्लक्ष करीत आहेत.जर रस्त्याची दुरुस्ती अथवा सिमेंटीकरण झाले नाही, तर गावकऱ्याकडून आंदोलन करण्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकातून अऱ्हेरनवरगाववासीयांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी )