शहरं
Join us  
Trending Stories
1
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
2
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
3
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
4
कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
5
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
6
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
7
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
8
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
9
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
10
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
11
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
12
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
13
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
14
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
15
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
16
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
17
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
18
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
20
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे

हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे गावांमध्ये दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:22 IST

जिल्ह्यात मानव व वन्यजीवांचा वाढता संघर्ष ही एक मोठी समस्या बनू पाहत आहे. वाघ, बिबट, रानडुकरांची वाढती संख्या मानवाच्या जीवावर उठली आहे. जिल्हा वाघासाठी प्रसिद्ध आहे. पट्टेदार वाघ, बिबट यांची संख्या लक्षवेधी आहे.

ठळक मुद्देमानव व वन्यजीव संघर्ष : प्रभावी उपाययोजनेची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मानव व वन्यजीवांचा वाढता संघर्ष ही एक मोठी समस्या बनू पाहत आहे. वाघ, बिबट, रानडुकरांची वाढती संख्या मानवाच्या जीवावर उठली आहे. जिल्हा वाघासाठी प्रसिद्ध आहे. पट्टेदार वाघ, बिबट यांची संख्या लक्षवेधी आहे. परंतु, जंगल परिसरात येणाऱ्या सिंदेवाही, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये हिंस्र पशूंकडून मानवावर हल्ले करण्याच्या घटना सतत वाढत आहेत.वाघांचे अस्तित्व टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासनस्तरावरून केले जात आहे. मात्र वन्यप्राण्यांचे हल्ले कमी झाले नाहीत. यात अनेकांचे बळी गेले आहेत. रानडुकरांच्या हल्ल्याच्या घटनाही कमी नाहीत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे वाघांचे माहेरघर समजले जाते. तेथील वाघांचे दर्शन घेण्यासाठी देशासह विदेशी पर्यटक आतूर असतात. त्यांच्या दर्शनाशिवाय ताडोब्याची सफर पूर्णत्वास येत नाही. ताडोबा परिसरातील वाघ आता गावालगतच्या वनपरिक्षेत्रात संचार करीत आहेत. वाघ व अन्य हिंस्र पशू मनुष्यप्राण्यांच्या जिवावर उठत असल्याने गावकरी दहशतीत आहेत. गाव परिसर असो अथवा शेत शिवार वाघाच्या अस्तित्वामुळे मानवाच्या जीवाची जोखीम निर्माण झाली आहे. शेतीच्या हंगामावेळी वाघ, बिबट व अन्य वन्यप्राण्यांचा वापर वाढत आहे. त्यामुळे शेती करणे शेतकऱ्यांना अवघड होत चालले आहे. सध्या खरीप हंगामाची कामे सुरू झाली आहेत. पण, वनव्याप्त परिसरातील शेती करताना पावलोपावली धोका पत्करावा लागत आहे.वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून रोख रक्कम दिली जाते. ही मदत अत्यावश्यक असली तरी समस्येवर ठोस उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, वरोरा, चिमूर, सिंदेवाही तालुक्यातील गाव परिसरात बिबट्या, वाघ व इतर वन्यप्राण्यांनी धूडगूस घातला आहे. वाघाच्या हल्ल्यात मानवासह जनावरांचा फडशा पडत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मानव व वन्यप्राणी संघर्षावर ठोस उपाययोजना केल्यास हा संघर्ष संपष्टात येऊ शकतो. त्याकरिता वनव्यवस्थापनात लोकसहभाग वाढविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Tigerवाघ