शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे गावांमध्ये दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:22 IST

जिल्ह्यात मानव व वन्यजीवांचा वाढता संघर्ष ही एक मोठी समस्या बनू पाहत आहे. वाघ, बिबट, रानडुकरांची वाढती संख्या मानवाच्या जीवावर उठली आहे. जिल्हा वाघासाठी प्रसिद्ध आहे. पट्टेदार वाघ, बिबट यांची संख्या लक्षवेधी आहे.

ठळक मुद्देमानव व वन्यजीव संघर्ष : प्रभावी उपाययोजनेची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मानव व वन्यजीवांचा वाढता संघर्ष ही एक मोठी समस्या बनू पाहत आहे. वाघ, बिबट, रानडुकरांची वाढती संख्या मानवाच्या जीवावर उठली आहे. जिल्हा वाघासाठी प्रसिद्ध आहे. पट्टेदार वाघ, बिबट यांची संख्या लक्षवेधी आहे. परंतु, जंगल परिसरात येणाऱ्या सिंदेवाही, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये हिंस्र पशूंकडून मानवावर हल्ले करण्याच्या घटना सतत वाढत आहेत.वाघांचे अस्तित्व टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासनस्तरावरून केले जात आहे. मात्र वन्यप्राण्यांचे हल्ले कमी झाले नाहीत. यात अनेकांचे बळी गेले आहेत. रानडुकरांच्या हल्ल्याच्या घटनाही कमी नाहीत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे वाघांचे माहेरघर समजले जाते. तेथील वाघांचे दर्शन घेण्यासाठी देशासह विदेशी पर्यटक आतूर असतात. त्यांच्या दर्शनाशिवाय ताडोब्याची सफर पूर्णत्वास येत नाही. ताडोबा परिसरातील वाघ आता गावालगतच्या वनपरिक्षेत्रात संचार करीत आहेत. वाघ व अन्य हिंस्र पशू मनुष्यप्राण्यांच्या जिवावर उठत असल्याने गावकरी दहशतीत आहेत. गाव परिसर असो अथवा शेत शिवार वाघाच्या अस्तित्वामुळे मानवाच्या जीवाची जोखीम निर्माण झाली आहे. शेतीच्या हंगामावेळी वाघ, बिबट व अन्य वन्यप्राण्यांचा वापर वाढत आहे. त्यामुळे शेती करणे शेतकऱ्यांना अवघड होत चालले आहे. सध्या खरीप हंगामाची कामे सुरू झाली आहेत. पण, वनव्याप्त परिसरातील शेती करताना पावलोपावली धोका पत्करावा लागत आहे.वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून रोख रक्कम दिली जाते. ही मदत अत्यावश्यक असली तरी समस्येवर ठोस उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, वरोरा, चिमूर, सिंदेवाही तालुक्यातील गाव परिसरात बिबट्या, वाघ व इतर वन्यप्राण्यांनी धूडगूस घातला आहे. वाघाच्या हल्ल्यात मानवासह जनावरांचा फडशा पडत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मानव व वन्यप्राणी संघर्षावर ठोस उपाययोजना केल्यास हा संघर्ष संपष्टात येऊ शकतो. त्याकरिता वनव्यवस्थापनात लोकसहभाग वाढविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Tigerवाघ