शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
6
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
7
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
9
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
10
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
11
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
12
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
13
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
14
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
15
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
16
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
17
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
18
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
19
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
20
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

रिक्त पदांमुळे पोलिसांवर अतिरिक्त कामाचा भार

By admin | Updated: November 4, 2015 00:53 IST

जिल्हा सीमेवर वसलेला गोंडपिपरी तालुका हा नक्षलग्रस्त, आदीवासीबहुल तथा अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो.

वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी : नक्षलग्रस्त भागातील पोलीस ठाण्याची व्यथा गोंडपिपरी : जिल्हा सीमेवर वसलेला गोंडपिपरी तालुका हा नक्षलग्रस्त, आदीवासीबहुल तथा अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात तीन पोलीस ठाणे असून गोंडपिपरी येथे पोलीस ठाणे तर धाबा व लाठी येथे उपपोलीस ठाणे हे शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे काम करीत आहे. मात्र येथील पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.गोंडपिपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ६० हून अधिक खेडे गावांचा समावेश आहे. तालुका सीमा ही ३० किमी अंतरापर्यंत विस्तारित असल्याने तालुक्यातील भं.तळोधी येथे पोलीस चौकी स्थापण्यात आली. या चौकीअंतर्गत २० हून अधिक गावांच्या तक्रारी, समस्यांचे निराकरण केले जाते. तसेच गोंडपिपरी हद्दीत वढोली, करंजी, धामणपेठ, चेकपिपरी व गोंडपिपरी ही मोठी गावे व आसपासची किरकोळ गावे अशी अन्य ४० हून अधिक गावांचा समावेश आहे. या पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षकासह चार अन्य सहकारी अधिकारी व जवळपास ८० कर्मचारी असे पदे मंजूर असतानाही रिक्त पदांच्या ग्रहणामुळे आज एक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक असे दोन अधिकारी व अन्य २० कर्मचारी येथे कर्तव्य पार पाडत आहेत. या व्यक्तीरिक्त कर्मचारी टपाल, कोर्ट कामकाज, उपविभागीय अधिकारी कार्यालय व अन्य कामकाज निमित्ताने कर्मचारी बाहेर असतात.जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी होताच तालुक्याच्या सीमावर्ती भागातून काही परप्रांतीय दारू तस्करीचा गोरखधंदा चालवत आहेत. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस विभागाला हतबल झाल्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरीही येथे नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक प्रभाकर टिक्कस यांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम राबविणे सुरू केले आहे. परिसरातील जनसामान्य, लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील, सरपंच, तंमुस समित्या यांनी पोलिसांना अपेक्षित सहकार्य करून दारूबंदीच्या सक्त अंमलबजावणीस सहकार्य करण्याचे आवाहन ‘लोकमत’शी बोलताना केले आहे.तसेच जनसामान्यांच्या संरक्षणासाठी लढणारा पोलीस हा समाजाचा मित्र असून समाजातील वाईट वृत्ती विरोात पोलिसांना सहकार्य करून नागरिकांनी उपकृत करावे, असेही त्यांनी म्हटले. (वार्ताहर)