शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पानठेला चालकाच्या आत्महत्येमुळे दारुसमर्थक रस्त्यावर

By admin | Updated: March 26, 2015 00:50 IST

येथील सिस्टर कॉलनी परिसरातील नितेश पंढरी आमटे (३५) या युवकाने आत्महत्या केली. जिल्ह्यात दारूबंदी होणार असल्याने

चंद्रपूर : येथील सिस्टर कॉलनी परिसरातील नितेश पंढरी आमटे (३५) या युवकाने आत्महत्या केली. जिल्ह्यात दारूबंदी होणार असल्याने आर्थिक नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप करीत दारुसमर्थकांसह दारुविक्रेत्यांनी आंदोलन उभारण्याचा प्रयत्न केला. नितेशच्या मृतदेहासह हे आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांच्या समयसुचकतेमुळे परिस्थिती निवळली.येथील सिस्टर कॉलनी परिसरातील रहिवासी असलेला नितेश आमटे याचा दुर्गापूर परिसरातील एका बारजवळ पानठेला आहे. पानठेल्याच्या बळावरच तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मात्र एप्रिलपासून जिल्ह्यात दारुबंदीहोणार असल्याने तो अस्वस्थ होता. या नैराश्यापोटीच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप दारूविक्रेत्यांनी केला आहे. बुधवारी नितेशने घरी गळफास लावून आत्त्महत्या केली. या घटनेची माहिती जिल्हाभर वाऱ्यासारखी पसरली. निलेशच्या आत्महत्येमागे केवळ दारुबंदी हेच कारण आहे, असे समजून दारुविक्रेते, समर्थक तसेच कामगार नेत्या अ‍ॅड. हर्षलकुमार चिपळूनकर यांनी शासनाने दारुदुकानात काम करणाऱ्यांचे पुनर्वसन करावे, मृतकाला आर्थिक मदत द्यावी, दारुबंदी निर्णयाबाबत पुनर्विचार करावा आदी मागण्याकरित मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात अडवून ठेवला. त्यानंतर मोठ्या संख्येने दारु दुकानदार, समर्थक जमा झाले. (नगर प्रतिनिधी)आधी पुनर्वसन, नंतर करा दारुबंदीदरम्यान या घटनेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, आधी कामगारांचे पुनर्वसन करा त्यानंतर दारूबंदी करा, अशी मागणी करण्यात आली. जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारुबंदी होणार आहे. यामुळे या व्यवसायावर आधारिक अन्य व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. या दुकानामध्ये काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अर्धेअधिक वय झाल्यानंतर त्यांना कुठेही काम मिळणार नाही, त्यामुळे शासनाने प्रथम कामगारांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी करण्यात आली.