शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

अवकाळी पावसामुळे दाणादाण

By admin | Updated: January 3, 2015 22:58 IST

जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे कापूस, धान, तुरीचे काही प्रमाणात नुकसान झाले असून रबी पिकांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले

चंद्रपूर : जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे कापूस, धान, तुरीचे काही प्रमाणात नुकसान झाले असून रबी पिकांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांची चांगलीच फजीती होत आहे.हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकरी जोमाने कामाला लागले. मात्र सुरुवातीला पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर दुबार पेरणी केली. मात्र पिकांची अपेक्षीत वाढ झाली नाही. पावसाळ्यामध्ये अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना पाहिजे तसे उत्पन्न घेता आले नाही. तर सिंचनक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाही जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्याने सिंचन करताना अनेक अडचणी येत आहे. खरीप हातातून गेल्यानंतर रब्बीकडे शेतकऱ्यांची आशा होती. मात्र पाहिजे तसा पाऊस पडला नसल्याने रब्बी पिकांचेही नियोजन कोलमडले. कृषी विभागाने रब्बीसाठी २ हजार ११० हेक्टर क्षेत्र निर्धारित केले असताना केवळ ६९२ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्षात पेरणी करण्यात आली. मात्र तीही जेमतेमच आहे. त्यातच आता अकाली पावसाने शेतकऱ्याना चांगलेच झोडपून काढले आहे. सध्या शेतामध्ये कापूस, धान, तूर, मिरची, हरभरा, उळीद, मुंग, भाजीपाला आहे. यामध्ये कापूस आणि कापणी केलेल्या धानाचे मोठ्या प्र्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी तूरीलाही फटका बसला आहे. मिरची तोड व्हायची असल्याने या पिकाला फटका बसला नसला तरी उत्पादनात घट येणार आहे.काही कोरडवाहू मातीच्या जमिनीमध्ये कापूस निघत आहे. मात्र अवकाळी आलेल्या पावसामुळे कापसाची प्रत घसरली आहे. कापसाला काळे डाग पडले आहे. तर काही ठिकाणी झाडावरून कापूस लोंबकळत असल्याने तो वेचणार तरी कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यातच भाव नसल्याने घडाईपेक्षा मळाई जास्त अशी अवस्था कापूस उत्पादकांची झाली आहे.विशेष म्हणजे, सिंचन असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस आहे. या कापसाचे पूर्णत: नुकसान झाले. तर दुसरीकडे मातीची जमिन आणि सध्या बोंड असलेल्या झाडांना पाणी मिळाल्यामुळे कापसाच्या वजनात वाढ होईल, असेही बोलल्या जात आहे.मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा, गोंडपिपरी, सावली आदी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले आहे. सध्या काही शेतकऱ्यांचे धान निघाले आहे. तर काहींनी शेतामध्ये धान कापून ढिग लावून ठेवले आहे. या ढिगाला पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. अनेकांच्या शेतातील धान ओले झाले आहे. अत्यल्प पावसामुळे कोरडवाहू रब्बी पिकांच्या पेरणीत यावर्षी झपाट्याने घट झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनीच गहू, हरभऱ्याचे पेरणी केली. त्यामुळे पावसाचा या पिकांना काही प्रमाणात फायदा होऊ शकतो, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. (नगर प्रतिनिधी)