शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीमुळे ३३ टक्के क्षेत्र पेरणीविनाच

By admin | Updated: July 29, 2016 00:49 IST

यावर्षीच्या कमी-अधिक पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. सुरूवातीला पाऊस न झाल्याने पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही.

अतिवृष्टीचा अनेकांना फटका : जिल्ह्यात केवळ २६ टक्के रोवणी चंद्रपूर : यावर्षीच्या कमी-अधिक पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. सुरूवातीला पाऊस न झाल्याने पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही. तर पेरणी केल्यानंतर अतिवृष्टी झाल्याने अनेकांचे पिके उद्धवस्त झालीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली असून २६ जुलैअखेर ३३ टक्के सर्वसाधारण क्षेत्र पेरणीविनाच असल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून प्राप्त झाला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे धडाक्यात सुरू केली. कापूस व धानाच्या ९० टक्के पेरण्या आटोपल्याचे कृषी विभागाने सांगितले होते. मात्र अनेक ठिकाणी सततच्या पावसामुळे पेरण्या थांबल्या होत्या. तर ज्यांनी पेरणी केली होती, त्यांची पिके वाहून गेली तर काहींची पिके बांधात पाणी भरून राहिल्याने सडून गेले. परिणामी अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. सध्या भातीच्या रोवणीची कामे सुरू असून सातापर्यंत २६ टक्के रोवणी झाली आहे. तर सोयाबीन ४६ टक्के व कापूस १४६ टक्के पेरणी झाली असल्याची माहिती कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे. जिल्ह्याच्या एकूण ४ लाख ३८ हजार २०२ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी आतापर्यंत २ लाख ९३ हजार ६६४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी) अनेक शेतकऱ्यांना फटका यापूर्वीच हवामान खात्याच्या अंदाजाला बळी पडत अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या करुन टाकल्या होत्या. राजुरा, बल्लारपूर, मूल, सिंदेवाही तालुक्यात असा प्रकार घडला. मात्र मृग नक्षत्र कोरडा गेल्याने शेतकऱ्यांच्या या पेरण्या व्यर्थ गेल्या. मात्र त्यानंतर सतत पाऊस झाल्याने त्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. यात शेतकऱ्यांना चांगलेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले. कापसाचा पेरा वाढला यंदा कृषी विभागाने चार लाख ६७ हजार ६८२ हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख ७७ हजार ६८ हेक्टरवर धानाची लागवड होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे होते. त्यापाठोपाठ कापूस एक लाख ३४ हजार ८२७ हेक्टर व सर्वात कमी सोयाबीन एक लाख १८ हजार हेक्टर, असे लागवड क्षेत्र आहे. असे असले तरी यंदा सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला. यात १४५ टक्के म्हणजे १ लाख ५५ हजार ६११ हेक्टरवर कापूस पिकाची पेरणी झाली आहे.