शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

रेती वाहतुकीमुळे रस्त्याचे वाजले तीन-तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:12 IST

तालुक्यातील अऱ्हेर-नवरगाव येथील वैनगंगा नदीपात्रातील रेती घाटातून सुमारे तीनशे हायवा ट्रक व ७० ट्रॅक्टरने रेतीची दिवस-रात्र उचल सुरू आहे. हे ट्रक व ट्रॅक्टर रेती भरून गावातून शिवारात जाणाऱ्या तसेच अऱ्हेर-नवरगाव-कुर्झा रस्त्यावरून जात असल्यामुळे या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देजीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास : अपघाताचे प्रमाणही वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुक्यातील अऱ्हेर-नवरगाव येथील वैनगंगा नदीपात्रातील रेती घाटातून सुमारे तीनशे हायवा ट्रक व ७० ट्रॅक्टरने रेतीची दिवस-रात्र उचल सुरू आहे. हे ट्रक व ट्रॅक्टर रेती भरून गावातून शिवारात जाणाऱ्या तसेच अऱ्हेर-नवरगाव-कुर्झा रस्त्यावरून जात असल्यामुळे या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.या रस्त्यांवरून साधे पायी चालणेसुद्धा दुरापास्त झाले आहे. तसेच सायकल चालविणेसुद्धा कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे आतापर्यंत गावकऱ्यांनी दोन-तीनदा रेतीची वाहतूक करणाºया वाहनाना अडवून आधी रस्ता दुरुस्त करा आणि नंतरच रेतीची वाहतूक करा, अशी भूमिका घेतली होती. परंतु रितसर कायदेशीर मार्गाने गावकऱ्यांनी मागणी न केल्यामुळे कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना करण्यात आली नाही.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून रस्त्याची ऐसीतैशी झाली आहे. अऱ्हेर नवरगाव, ही गावे वैनगंगा नदी किनाऱ्यावर वसलेले आहे. या गावांची लोकसंख्या दहा हजारहून अधिक आहे. अऱ्हेर नवरगाव येथील वैनगंगा नदीपत्राच्या रेतीघाटावरून तीनशे ट्रक व ७० ट्रॅक्टरने दिवसरात्र मोठया प्रमाणात रेतीचा उपसा सुरू असल्याने अºर्हर नवरगाव रेतीघाट ते ब्रम्हपुरी या मार्गाचे तीन तेरा वाजले आहेत.गावालगच्या मुख्य रस्त्यावर पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असलेली विकास विद्यालय शाळा आहे. या शाळेत आजूबाजूच्या गावातील विध्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात. परंतु येथील रोडच्या गंभीर अवस्थेने व रेतीघाटातील रेती वाहतुकीने बºयाच दुर्घटना झालेल्या असूनसुद्धा विध्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेचा प्रवास करावा लागतो. या परिसरातील नागरिक पूर्णत: शेती या व्यवसायावर अवलंबून असून येथे मोठया प्रमाणावर भाजीपाला पिकविला जातो. आणि तो भाजीपाला विकण्यासाठी व पोटाची खडगी भरण्यासाठी ब्रह्मपुरीच्या बाजारपेठेत न्यावे लागते. तसेच ब्रम्हपुरी हे शिक्षणाचे माहेरघर असून परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षणाकरिता ब्रह्मपुरीला ये-जा करत असतात. परंतु प्रवासादरम्यान त्यांना अडचणींचा सामना लागत आहे.पुलांचीही दुरवस्थाब्रम्हपुरी ते अऱ्हेर नवरगाव या मार्गावर असलेल्या नाल्यांवरील दोन पूल अतिशय दयनीय अवस्थेत असून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याचे नाकारता येत नाही. अशा स्थितीत त्यावरून वाहतूक करणे हे जीवघेणे झालेले असल्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने सदर पुलाची आणि रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.