शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

रेती वाहतुकीमुळे रस्त्याचे वाजले तीन-तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:12 IST

तालुक्यातील अऱ्हेर-नवरगाव येथील वैनगंगा नदीपात्रातील रेती घाटातून सुमारे तीनशे हायवा ट्रक व ७० ट्रॅक्टरने रेतीची दिवस-रात्र उचल सुरू आहे. हे ट्रक व ट्रॅक्टर रेती भरून गावातून शिवारात जाणाऱ्या तसेच अऱ्हेर-नवरगाव-कुर्झा रस्त्यावरून जात असल्यामुळे या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देजीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास : अपघाताचे प्रमाणही वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुक्यातील अऱ्हेर-नवरगाव येथील वैनगंगा नदीपात्रातील रेती घाटातून सुमारे तीनशे हायवा ट्रक व ७० ट्रॅक्टरने रेतीची दिवस-रात्र उचल सुरू आहे. हे ट्रक व ट्रॅक्टर रेती भरून गावातून शिवारात जाणाऱ्या तसेच अऱ्हेर-नवरगाव-कुर्झा रस्त्यावरून जात असल्यामुळे या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.या रस्त्यांवरून साधे पायी चालणेसुद्धा दुरापास्त झाले आहे. तसेच सायकल चालविणेसुद्धा कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे आतापर्यंत गावकऱ्यांनी दोन-तीनदा रेतीची वाहतूक करणाºया वाहनाना अडवून आधी रस्ता दुरुस्त करा आणि नंतरच रेतीची वाहतूक करा, अशी भूमिका घेतली होती. परंतु रितसर कायदेशीर मार्गाने गावकऱ्यांनी मागणी न केल्यामुळे कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना करण्यात आली नाही.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून रस्त्याची ऐसीतैशी झाली आहे. अऱ्हेर नवरगाव, ही गावे वैनगंगा नदी किनाऱ्यावर वसलेले आहे. या गावांची लोकसंख्या दहा हजारहून अधिक आहे. अऱ्हेर नवरगाव येथील वैनगंगा नदीपत्राच्या रेतीघाटावरून तीनशे ट्रक व ७० ट्रॅक्टरने दिवसरात्र मोठया प्रमाणात रेतीचा उपसा सुरू असल्याने अºर्हर नवरगाव रेतीघाट ते ब्रम्हपुरी या मार्गाचे तीन तेरा वाजले आहेत.गावालगच्या मुख्य रस्त्यावर पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असलेली विकास विद्यालय शाळा आहे. या शाळेत आजूबाजूच्या गावातील विध्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात. परंतु येथील रोडच्या गंभीर अवस्थेने व रेतीघाटातील रेती वाहतुकीने बºयाच दुर्घटना झालेल्या असूनसुद्धा विध्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेचा प्रवास करावा लागतो. या परिसरातील नागरिक पूर्णत: शेती या व्यवसायावर अवलंबून असून येथे मोठया प्रमाणावर भाजीपाला पिकविला जातो. आणि तो भाजीपाला विकण्यासाठी व पोटाची खडगी भरण्यासाठी ब्रह्मपुरीच्या बाजारपेठेत न्यावे लागते. तसेच ब्रम्हपुरी हे शिक्षणाचे माहेरघर असून परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षणाकरिता ब्रह्मपुरीला ये-जा करत असतात. परंतु प्रवासादरम्यान त्यांना अडचणींचा सामना लागत आहे.पुलांचीही दुरवस्थाब्रम्हपुरी ते अऱ्हेर नवरगाव या मार्गावर असलेल्या नाल्यांवरील दोन पूल अतिशय दयनीय अवस्थेत असून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याचे नाकारता येत नाही. अशा स्थितीत त्यावरून वाहतूक करणे हे जीवघेणे झालेले असल्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने सदर पुलाची आणि रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.