शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

रेती वाहतुकीमुळे रस्त्याचे वाजले तीन-तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:12 IST

तालुक्यातील अऱ्हेर-नवरगाव येथील वैनगंगा नदीपात्रातील रेती घाटातून सुमारे तीनशे हायवा ट्रक व ७० ट्रॅक्टरने रेतीची दिवस-रात्र उचल सुरू आहे. हे ट्रक व ट्रॅक्टर रेती भरून गावातून शिवारात जाणाऱ्या तसेच अऱ्हेर-नवरगाव-कुर्झा रस्त्यावरून जात असल्यामुळे या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देजीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास : अपघाताचे प्रमाणही वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुक्यातील अऱ्हेर-नवरगाव येथील वैनगंगा नदीपात्रातील रेती घाटातून सुमारे तीनशे हायवा ट्रक व ७० ट्रॅक्टरने रेतीची दिवस-रात्र उचल सुरू आहे. हे ट्रक व ट्रॅक्टर रेती भरून गावातून शिवारात जाणाऱ्या तसेच अऱ्हेर-नवरगाव-कुर्झा रस्त्यावरून जात असल्यामुळे या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.या रस्त्यांवरून साधे पायी चालणेसुद्धा दुरापास्त झाले आहे. तसेच सायकल चालविणेसुद्धा कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे आतापर्यंत गावकऱ्यांनी दोन-तीनदा रेतीची वाहतूक करणाºया वाहनाना अडवून आधी रस्ता दुरुस्त करा आणि नंतरच रेतीची वाहतूक करा, अशी भूमिका घेतली होती. परंतु रितसर कायदेशीर मार्गाने गावकऱ्यांनी मागणी न केल्यामुळे कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना करण्यात आली नाही.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून रस्त्याची ऐसीतैशी झाली आहे. अऱ्हेर नवरगाव, ही गावे वैनगंगा नदी किनाऱ्यावर वसलेले आहे. या गावांची लोकसंख्या दहा हजारहून अधिक आहे. अऱ्हेर नवरगाव येथील वैनगंगा नदीपत्राच्या रेतीघाटावरून तीनशे ट्रक व ७० ट्रॅक्टरने दिवसरात्र मोठया प्रमाणात रेतीचा उपसा सुरू असल्याने अºर्हर नवरगाव रेतीघाट ते ब्रम्हपुरी या मार्गाचे तीन तेरा वाजले आहेत.गावालगच्या मुख्य रस्त्यावर पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असलेली विकास विद्यालय शाळा आहे. या शाळेत आजूबाजूच्या गावातील विध्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात. परंतु येथील रोडच्या गंभीर अवस्थेने व रेतीघाटातील रेती वाहतुकीने बºयाच दुर्घटना झालेल्या असूनसुद्धा विध्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेचा प्रवास करावा लागतो. या परिसरातील नागरिक पूर्णत: शेती या व्यवसायावर अवलंबून असून येथे मोठया प्रमाणावर भाजीपाला पिकविला जातो. आणि तो भाजीपाला विकण्यासाठी व पोटाची खडगी भरण्यासाठी ब्रह्मपुरीच्या बाजारपेठेत न्यावे लागते. तसेच ब्रम्हपुरी हे शिक्षणाचे माहेरघर असून परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षणाकरिता ब्रह्मपुरीला ये-जा करत असतात. परंतु प्रवासादरम्यान त्यांना अडचणींचा सामना लागत आहे.पुलांचीही दुरवस्थाब्रम्हपुरी ते अऱ्हेर नवरगाव या मार्गावर असलेल्या नाल्यांवरील दोन पूल अतिशय दयनीय अवस्थेत असून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याचे नाकारता येत नाही. अशा स्थितीत त्यावरून वाहतूक करणे हे जीवघेणे झालेले असल्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने सदर पुलाची आणि रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.