शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

पोंभूर्णा तालुक्यातील वाढत्या बेरोजगारीमुळे युवापिढी नैराश्येत

By admin | Updated: January 11, 2015 22:50 IST

पदवी, पदविका व महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून हजारो तरुण-तरुणी बाहेर पडतात. नंतर नोकरी शोधण्यात आलेले अपयश व बेरोजगारीमुळे युवापिढी नैराश्येच्या खाईत लोटला जात असल्याचे

पोंभूर्णा : पदवी, पदविका व महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून हजारो तरुण-तरुणी बाहेर पडतात. नंतर नोकरी शोधण्यात आलेले अपयश व बेरोजगारीमुळे युवापिढी नैराश्येच्या खाईत लोटला जात असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे. सर्व युवक-युवती आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगारासाठी मनात सुप्त इच्छा बाळगून असतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हवी तशी नोकरी मिळेल, अशी सर्वांनाच आशा असते. परंतु तसे घडत नाही.कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खासगी ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला आणि त्यानंतर मुलाखत दिली तर तुम्हाळा कळवू, असे संबंधित उमेदवाराला सांगण्यात येते. पुढे त्याला काहीच कळविले जात नाही. नोकरीच्या शोधात अशी कितीतरी वर्षे निघून जातात. पण नोकरी मात्र मिळत नाही. तसेच पाहिजे तसा व्यवसायही करता येत नाही. त्यामुळे तरुणांच्या नशिबी नैराश्य आले आहे. आजुबाजूला नजर टाकली तर ज्यांचेजवळ पैसा आहे किंवा ज्यांची ओळख वरपर्यंत आहे, अशानाच सध्या नोकरीची संधी मिळत आहे.सरकारी कार्यालय, शिक्षण संस्था पैशावरच चालतात. जे युवक परिश्रम घेऊन शिक्षण घेतात. ते पैशाअभावी नोकरीपासून दूर आहेत. यातून तरुण पिढीचे मन नैराश्याने ग्रासले आहे. शेवटी परिस्थितीच त्यांची तशी बनली आहे.या युवा पिढीवर पुढे देशाचे भवितव्य अवलंबून आहे, पण ही युवापिढी नैराश्येच्या खोल गर्तेत ढकलल्या गेली तर देशाचे काय होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शिक्षणासाठी वारेमाप खर्च करावा लागतो तर दुसरीकडे मात्र शिक्षण झाल्यावरही चप्पल झिजवावे लागते. परिश्रम करूनही आपल्या शिक्षणाचा उपयोग होत नसेल शिक्षण घेऊन काय उपयोग, असा प्रश्नही बेरोजगारांना सतावत आहे. (वार्ताहर)