शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
4
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
5
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
7
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
8
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
9
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
10
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
11
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
12
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
13
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
14
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
15
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
16
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
17
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
18
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
19
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
20
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...

पोंभूर्णा तालुक्यातील वाढत्या बेरोजगारीमुळे युवापिढी नैराश्येत

By admin | Updated: January 11, 2015 22:50 IST

पदवी, पदविका व महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून हजारो तरुण-तरुणी बाहेर पडतात. नंतर नोकरी शोधण्यात आलेले अपयश व बेरोजगारीमुळे युवापिढी नैराश्येच्या खाईत लोटला जात असल्याचे

पोंभूर्णा : पदवी, पदविका व महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून हजारो तरुण-तरुणी बाहेर पडतात. नंतर नोकरी शोधण्यात आलेले अपयश व बेरोजगारीमुळे युवापिढी नैराश्येच्या खाईत लोटला जात असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे. सर्व युवक-युवती आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगारासाठी मनात सुप्त इच्छा बाळगून असतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हवी तशी नोकरी मिळेल, अशी सर्वांनाच आशा असते. परंतु तसे घडत नाही.कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खासगी ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला आणि त्यानंतर मुलाखत दिली तर तुम्हाळा कळवू, असे संबंधित उमेदवाराला सांगण्यात येते. पुढे त्याला काहीच कळविले जात नाही. नोकरीच्या शोधात अशी कितीतरी वर्षे निघून जातात. पण नोकरी मात्र मिळत नाही. तसेच पाहिजे तसा व्यवसायही करता येत नाही. त्यामुळे तरुणांच्या नशिबी नैराश्य आले आहे. आजुबाजूला नजर टाकली तर ज्यांचेजवळ पैसा आहे किंवा ज्यांची ओळख वरपर्यंत आहे, अशानाच सध्या नोकरीची संधी मिळत आहे.सरकारी कार्यालय, शिक्षण संस्था पैशावरच चालतात. जे युवक परिश्रम घेऊन शिक्षण घेतात. ते पैशाअभावी नोकरीपासून दूर आहेत. यातून तरुण पिढीचे मन नैराश्याने ग्रासले आहे. शेवटी परिस्थितीच त्यांची तशी बनली आहे.या युवा पिढीवर पुढे देशाचे भवितव्य अवलंबून आहे, पण ही युवापिढी नैराश्येच्या खोल गर्तेत ढकलल्या गेली तर देशाचे काय होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शिक्षणासाठी वारेमाप खर्च करावा लागतो तर दुसरीकडे मात्र शिक्षण झाल्यावरही चप्पल झिजवावे लागते. परिश्रम करूनही आपल्या शिक्षणाचा उपयोग होत नसेल शिक्षण घेऊन काय उपयोग, असा प्रश्नही बेरोजगारांना सतावत आहे. (वार्ताहर)