शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

पोंभूर्णा तालुक्यातील वाढत्या बेरोजगारीमुळे युवापिढी नैराश्येत

By admin | Updated: January 11, 2015 22:50 IST

पदवी, पदविका व महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून हजारो तरुण-तरुणी बाहेर पडतात. नंतर नोकरी शोधण्यात आलेले अपयश व बेरोजगारीमुळे युवापिढी नैराश्येच्या खाईत लोटला जात असल्याचे

पोंभूर्णा : पदवी, पदविका व महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून हजारो तरुण-तरुणी बाहेर पडतात. नंतर नोकरी शोधण्यात आलेले अपयश व बेरोजगारीमुळे युवापिढी नैराश्येच्या खाईत लोटला जात असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे. सर्व युवक-युवती आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगारासाठी मनात सुप्त इच्छा बाळगून असतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हवी तशी नोकरी मिळेल, अशी सर्वांनाच आशा असते. परंतु तसे घडत नाही.कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खासगी ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला आणि त्यानंतर मुलाखत दिली तर तुम्हाळा कळवू, असे संबंधित उमेदवाराला सांगण्यात येते. पुढे त्याला काहीच कळविले जात नाही. नोकरीच्या शोधात अशी कितीतरी वर्षे निघून जातात. पण नोकरी मात्र मिळत नाही. तसेच पाहिजे तसा व्यवसायही करता येत नाही. त्यामुळे तरुणांच्या नशिबी नैराश्य आले आहे. आजुबाजूला नजर टाकली तर ज्यांचेजवळ पैसा आहे किंवा ज्यांची ओळख वरपर्यंत आहे, अशानाच सध्या नोकरीची संधी मिळत आहे.सरकारी कार्यालय, शिक्षण संस्था पैशावरच चालतात. जे युवक परिश्रम घेऊन शिक्षण घेतात. ते पैशाअभावी नोकरीपासून दूर आहेत. यातून तरुण पिढीचे मन नैराश्याने ग्रासले आहे. शेवटी परिस्थितीच त्यांची तशी बनली आहे.या युवा पिढीवर पुढे देशाचे भवितव्य अवलंबून आहे, पण ही युवापिढी नैराश्येच्या खोल गर्तेत ढकलल्या गेली तर देशाचे काय होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शिक्षणासाठी वारेमाप खर्च करावा लागतो तर दुसरीकडे मात्र शिक्षण झाल्यावरही चप्पल झिजवावे लागते. परिश्रम करूनही आपल्या शिक्षणाचा उपयोग होत नसेल शिक्षण घेऊन काय उपयोग, असा प्रश्नही बेरोजगारांना सतावत आहे. (वार्ताहर)