शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

बाबासाहेब रमार्इंच्या त्यागामुळे घडले

By admin | Updated: May 29, 2016 01:08 IST

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष वंचित समाज घटकांना न्याय देण्यासाठी होता. त्यांनी अखंड भारताच्या निर्मितीसाठी संविधान दिले.

भय्या खैरकर : विसापुरात पार पडला रमाई स्मृतिदिनबल्लारपूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष वंचित समाज घटकांना न्याय देण्यासाठी होता. त्यांनी अखंड भारताच्या निर्मितीसाठी संविधान दिले. त्यांच्या सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यात मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचे मोठे योगदान मिळाले. त्यांच्यातील आदर्श आजही समाजाला प्रेरणा देणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असताना मातोश्री रमाबार्इंनी ती जबाबदारी प्रामाणिकपणाने सांभाळली. परिणामी डॉ.आंबेडकरांना समाजाच्या उत्थानासाठी कार्य करता आले. आंबेडकर खऱ्या अर्थाने रमाईच्या त्यागामुळे घडले, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत भय्यासाहेब खैरकर यांनी विसापूर येथे केले.बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील मानव मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शुक्रवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ग्रामपंचायत प्रांगणात प्रबोधन कार्यक्रम पार पडला. यावेळी मातोश्री रमाई यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील योगदान या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विसापूर येथील सरपंच रिता जिलटे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भैयासाहेब खैरकर, चंद्रशेखर गेडाम, चंद्रकांत पावडे, सामाजिक कार्यकर्ता किरणकुमार पुणेकर, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सुरज गोहणे, गायक कलावंत कुणाल वराळे, अफसाना शेख, मुन्ना खोब्रागडे, ग्रामपंचायत सदस्य विजय वैद्य, भीमराव पाझारे, स्वाती चिकाटे, तुळशीराम गोरे, बुद्धिवान कांबळे यांची उपस्थिती होती.दरम्यान, औरंगाबाद येथील गायक कलावंत कुणाल वराळे, विकास पेरगुलवार, सतीश शेंडे यांच्या संचाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मातोश्री रमाई, तथागत बुद्ध यांच्या जीवनावर आधारित समधूर गीतांचा कार्यक्रम सादर केला. ‘मेरा भीम जबरदस्त है’, या गाण्याने प्रेक्षकांना थिरकायला लावले. प्रास्ताविक आयोजक भाऊराव तुभडे, संचालन अफसाना शेख यांनी तर आभार स्वाती चिकाटे यांनी मानले. यावेळी आकाश पाझारे, रमेश लिंगमपल्लीवार, गौतम वनकर, प्रशांत चिकाटे यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)