शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

पावसामुळे कोरपना तालुक्यातील रस्ते उखडले

By admin | Updated: July 5, 2017 01:08 IST

विदर्भाच्या टोकावर आणि अत्यंत मागासलेला तालुका म्हणून कोरपना तालुक्याला ओळखले जाते.

दुरुस्ती करण्याची मागणी : वाहनचालकांची कसरतलोकमत न्यूज नेटवर्कआवारपूर : विदर्भाच्या टोकावर आणि अत्यंत मागासलेला तालुका म्हणून कोरपना तालुक्याला ओळखले जाते. तालुक्यातील अनेक रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरुन मार्गक्रमण करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील वनोजा-कळमना, विरुर आवारपूर, कवटाळा ते भोयेगाव हे मार्ग पहिल्या पावसानेच पूर्णपणे उखडले आहेत. वनोजा आणि कळमना हा मार्ग सतत चालू असतो. लोकांना वणी, कोरपना, वनसडी या बाजारपेठ पडतात. परंतु, या बाजारपेठेत जाण्यासाठी नागरिकांना वनोजा कळमाना या मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र हा मार्ग पूर्णपणे उखडलेला असल्याने आपला जीव मूठीत घेऊन प्रवास करावा लागतो. थोडासा जरी पाणी आली तर रस्तावरील सर्व खड्ड्यात पाणी साचते. त्यामुळे वाहन चालवताना वाहनचालकाला कसरत करावी लागते. तसेच विरूर ते आवाळपूर मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच या मार्गावरील डांबरीकरण पूर्णपणे उखळले आहे. पूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण केले असल्यामुळे अनेकजण या मार्गाचा वापर करायचे. मात्र प्रशासनाकडून रस्ते उखडल्यानंतर डागडूजी करण्यात आली नाही. त्यामुळे सदर मार्ग पूर्णपणे उखडला आहे. तसेच कवटाळा भोयेगाव या मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे पाणी आली ते साचून राहते त्यामुळे मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. या मार्गावरुन गडचांदूर, लखमापूर, तळोधी, कवठाळा, धूनकी, भोयगाव, कोरपना, वनसडी, नारंडा, अंतरगाव, कढोली, वनोज, कोडसी, नांदगाव, धानोरा, उपरवाही परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात येजा करतात. रसत्याच्या दुरवस्थेमुळे मागील वर्षी भोयगाव येथील शालेय विद्यार्थ्यांचा ओव्हरलोड कॅप्सूलमध्ये नाहक बळी गेला. तरीसुद्धा रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी रोष व्यक्त होत आहे.