शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भांडणामुळे बसवाहक पडल्या बेशुद्ध !

By admin | Updated: January 22, 2017 00:44 IST

एसटी महामंडळाने शहर बससेवा बंद करीत त्याचे ग्रामीण बससेवेत रुपांतर केले आहे. यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे.

चंद्रपुरातील घटना : शहर बससेवा बंद केल्याने हाणामारीची पाळीचंद्रपूर : एसटी महामंडळाने शहर बससेवा बंद करीत त्याचे ग्रामीण बससेवेत रुपांतर केले आहे. यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. यासोबतच शहरात बस थांबत नसल्याने बसवाहक आणि प्रवाशांमधील भांडणाचे प्रमाणही वाढले आहे. अशाच एका भांडणातून महिला वाहकाला दवाखान्यात भरती करावे लागले. हा प्रकार आज शनिवारी येथील बागला चौकात सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडला. पुष्पा भानारकर असे सदर महिला वाहकाचे नाव आहे.यापूर्वी चंद्रपुरात शहर बससेवा सुरू होती. त्यामुळे अनेक नागरिक या बससेवेचा लाभ घेत शहरातील विविध ठिकाणी बसने ये-जा करीत होते. मात्र मागील महिन्यापासून एसटी महामंडळाने शहर बससेवा बंद करून त्याचेच रुपांतर ग्रामीण बससेवेत केले. मात्र ही बस शहरात ठराविक एक-दोन ठिकाणी थांबते. इतर ठिकाणी ही बस थांबत नसल्याने प्रवाशी व बसवाहकांमध्ये अनेकदा कडाक्याचे भांडण होत आहे. पुष्पा भानारकर या बसवाहक आज सकाळ पाळीत दुर्गापूर ते राजुरा बसफेरीसाठी (बस क्रमांक एमएच ३४ एन ९४२७) निघाल्या. ही बस सकाळी ११ वाजताच्या सुमारास लालपेठ पोलीस चौकीजवळ येताच बसमधील दोन महिला प्रवाशांसोबत बस थांबविण्यावरून वाहक भानारकर यांच्यासोबत वाद झाला. तिथून अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत त्यांचा वाद सुरूच होता. त्यानंतर हा वाद विकोपाला जाऊन एकमेकांना शिवीगाळ करण्यापर्यंत प्रकरण आले. त्यानंतर अचानक वाहक भानारकर यांची प्रकृती बिघडली. त्यांचा रक्तदाब अचानक वाढला. त्यामुळे सदर प्रवाशांना उतरवून बस बागला चौकात थांबविण्यात आली. भानारकर या बागला चौकीत गेल्या आणि तिथेच बेशुद्ध होऊन खाली पडल्या. विशेष म्हणजे, हा प्रकार सुरू असताना बसचालक वेगळ्याच चिंतेत होते. त्यांची बस एकदा बंद झाली की ती पुन्हा सुरू होत नाही, एवढी भंगार होती. त्यामुळे ते बसला बंद करू शकत नव्हते. नागरिकांनीच त्या मार्गावरून जाणाऱ्या एक रुग्णवाहिकेला थांबवून वाहक पुष्पा भानारकर यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. (शहर प्रतिनिधी) दीड तासानंतर पोहोचले महामंडळाचे अधिकारीहा प्रकार घडला तेव्हा बसचालक घटनास्थळावर होते. बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. वाहक बेशुद्ध झाल्यानंतर बसचालक तिकीट मशीन सांभाळू लागले. बसही बंद करू शकत नव्हते. अखेर नागरिकांनीच वाहक पुष्पा भानारकर यांना उचलून रुग्णवाहिकेत ठेवले. तिथून एसटी महामंडळाच्या कार्यालयात फोन करून ही माहिती देण्यात आली. रुग्णालयापासून एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर हे कार्यालय आहे. मात्र एसटी महामंडळ कार्यालयातून केवळ एकच कर्मचारी तेदेखील तब्बल दीड तासानंतर रुग्णालयात पोहचला. यावरून महामंडळ आपल्या कर्मचाऱ्यांप्रति किती संवेदनशील आहे, हे दिसून येते. त्रास वाढलाशहर बससेवेचे ग्रामीण बससेवेत रुपांतर केल्यामुळे वाहकांचा त्रास वाढला आहे. प्रवाशांसोबत दररोज भांडणे होत आहे. वाहक पुष्पा भानारकर यादेखील यामुळे त्रस्त होत्या, असे त्यांनीच सांगितले. त्यामुळे त्यांनी ही ड्युटी बदलवून देखील मागितली होती. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही.