शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या आनंदात महागाईचे विरजण

By admin | Updated: November 9, 2015 04:58 IST

जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे तोंडाचे पाणी पळाले आहे. सणासुदीच्या

चंद्रपूर : जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे तोंडाचे पाणी पळाले आहे. सणासुदीच्या दिवसात घराघरात होणाऱ्या पक्वान्नात यंदा महागाईमुळे कडवटपणा आलेला आहे. गोडधोड पदार्थ तर सोडाच साधे वरणही २०० रुपये तूर दाळ झाल्यापासून जेवणातून बाद झाले आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत भरमसाठ वाढ होत असल्याने जीवन कसे जगावे, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाला आहे.४० टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली कसेबसे जीवन जगत आहे. पाच टक्के जनता दिवसातून एक वेळ जेवण करीत आपल्या संसाराचा रहाटगाडा हाकत आहेत. सामान्य माणसांचे कंबरडे मोडावे अशी महागाई गगनाला जाऊन भिडलेली आहे. माणसाला आज जगावे की मरावे, असा प्रश्न पडला आहे. साखर, तेल, डाळ, भाजीपाला, तांदूळ, गहू तसेच जीवनावश्यक वस्तूंचे भाव सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे झालेले आहे. आधीच बेरोजगारीचे सावट असताना जीवनापयोगी वस्तुंचे भाव सामान्यमाणसाला परवडण्यासारखे नाही. ग्रामीण भागातून कामासाठी शहरात आलेल्या कुटूंबाची वाताहत कशी होत असेल, शहरात भाड्याने राहून मुलांचे शिक्षण, आरोग्य, त्यांना लागणारी वस्त्रे आदी गोष्टींची पूर्तता करता करता कुटूंबप्रमुखाची नाकी नऊ येते. आजचे शिक्षणही महाग झालेले आहे. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांनीच शिकावे अशी व्यवस्थाच राज्य कारभार करणाऱ्यांनी केली. खासगीकरणाच्या गोंड्स नावाखाली देश अप्रत्यक्षपणे विकला जात आहे. परदेशी कंपण्यांचे आर्थिक धोरणच बदलवून टाकले आहे. या आचरणामुळे सर्वसामान्य जनता हतबल झाली आहे. दवाखाना आहे तर डॉक्टर नाही, डॉक्टर आहे तर औषध नाही. औषध आहे तर किंमती परवडण्यासारख्या नाहीत. औषधांच्या किंमतीवर नियंत्रण नाही. भेसळयुक्त औषधी बाजारात खुलेआम विकली जात आहे.दिवाळी हा दीप उत्सवाचा सण. मात्र घरात मातीच्या तेलाचा दिवा जळत राहील, अशी परिस्थिती नाही. महागाईने गोरगरिबांना आसवे दिलीत. आज ग्रामीण भागात रॉकेलचे परवानाधारक काळाबाजार करून चार पट नफा कमवितात. पण राशन कार्डधारकांना रॉकेल दिले जात नाही. विजेचाही प्रश्न तोच, ग्रामीण भागात एकदा वीज गेली की, १५-१५ दिवस येत नाही. मात्र वीज बिल अव्वाच्या सव्वा काढून वसूल केले जात आहे. सरकार स्थापन झाल्याझाल्याच पेट्रोल, डिझेल, साखर, तेल, डाळ, भाजीपाला आदी महत्त्वाच्या वस्तु महाग झाल्या. महागाईच्या भस्मासुरामुळे एक लिटर तेल व एक किलो डाळ घेणारा एका पावावर आला. मोलमजुरी करणारा माणूस काम मिळाले नाही तर उपाशी, त्याची बायको पोरंही उपाशीच! कामाला निघालेला माणूस घरी बायको पोरं उपाशी राहू नये म्हणून वाटेल ती कामे करतो. परंतु तुटपूंज्या पैशात घरसंसार कसा चालवावा, हा प्रश्न महागाईमुळे असतो. विविध सणाला घरी गोडधोड करावे आणि पोराबाळामध्ये आनंदाने रमावे असेही आता राहिलेले नाही. सणांची मजाच आता महागाईने हिरावून घेतली आहे. आता सणांची श्रृंखला चालू झाली असून येणारे प्रत्येक सण गृहिणीला व सामान्य जनतेला मात्र यंदा कडू वाटू लागली आहे. या महागाईवर शासकीय यंत्रणेचे नियंत्रण राहिलेले नाही. लोकप्रतिनिधी व शासन कुंभकर्णी झोपेत आहेत. प्रत्येक जीवनावश्यक वस्तुंचे भाव पुन्हा वाढेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे सरकारकडून सतत वाढत असलेली महागाई आटोक्यात आणण्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे, असे असले तरी हा दावा फोल ठरत असून दिवसेंदिवस वस्तूंचे दर वाढतच आहे. या महागाईला सामोरे जाताना अनेक सर्वसामान्य कुटुंबात कलह निर्माण होत आहे. हा महागाईचा भस्मासूर पुन्हा सर्वसामान्य जनतेच्या मानगुटीवर बसून रक्त पिणार असेच दिसून येत आहे. या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना करण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)वरण जेवणातून बाद४तुरीच्या डाळीचे भाव कधी नव्हे एवढे यंदा कडाडले आहे. तब्बल २०० रुपये किलोप्रमाणे ही डाळ विकली जात आहे. सर्वसामान्य व मोलमजुरी करणाऱ्यांना दररोजच्या जेवणात तूर डाळीचे वरण करणे अवाक्याबाहेर होत आहे. त्यामुळे अनेकांच्या जेवणातून वरण बाद झाल्याचे दिसून येत आहे. तूर डाळ जेवणातला महत्त्वपूर्ण आहार आहे. त्यामुळे मुलाबाळांच्या पोषण आहाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, तूर डाळीसोबतच मसूर, मूग, उडीद व चणा डाळीचे भावही गगनाला भिडले आहेत.खरीप हंगामाचाही फटकाचंद्रपूर जिल्ह्यात जवळजवळ ६० टक्के जनता शेतीवर निर्भर आहे. शेतपीक चांगले झाले. शेती चांगली पिकली तर शेतकऱ्यांचे सर्व सण आनंदात जातात. यावेळी मात्र अत्यल्प पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. सिंचनाअभावी शेतपिकांवर परिणाम झाला. त्यामुळे उत्पादनात घट आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी तर यावर्षी अंधकारमयच झालेली आहे.