शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

महाआॅनलाईनच्या कारभारामुळे संगणक परिचालकांवर उपासमारीची पाळी

By admin | Updated: October 16, 2015 01:29 IST

महाआॅनलाईनच्या कारभारामुळे गेल्या पाच महिन्यांपासून संगणक परिचालकांचे मानधन थकीत असून त्यामुळे परिचालकांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे.

पाच महिन्यांपासून मानधन थकित : पैशाअभावी जगायचे तरी कसे?प्रकाश काळे  गोवरीमहाआॅनलाईनच्या कारभारामुळे गेल्या पाच महिन्यांपासून संगणक परिचालकांचे मानधन थकीत असून त्यामुळे परिचालकांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे. पंचायत राजसंस्थेचे बळकटीकरण करून कामामध्ये सुसत्रता व पारदर्शकता आणण्याच्या हेतूने केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत ई-पि.आर.आय. हा उद्देश प्रकल्प सर्व राज्यामध्ये राबविण्यात आला. त्याअंतर्गत राज्यामध्ये संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) ही संकल्पना प्रत्यक्ष सुरू करण्यात आली. ई-पंचायत हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यासाठी महाआॅनलाईन या कंपनीला सदर कामाचे कंत्राट देण्यात आले.ग्रामपंचायतस्तरावर संगणक परिचालकांची नियुक्ती करून त्यांच्या मार्फत रेकॉर्ड स्कॅन, ग्रामपंचायतीच्या नोंदी, दाखले देणे व इतर ग्रामपंचायतीची महत्त्वाची कामे संगणक परिचालकाकडून करवून घेतल्या जात आहेत. मात्र त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून मानधन दिले नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी ओढवली आहे. तालुकास्तरावरील संगणक परिचालक संघटना यावर एक शब्दही बोलायला तयार नाही. महाआॅनलाईनचे जबाबदार अधिकारी याबाबत मौन बाळगून असल्याने संगणक चालकांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. संगणक आॅपरेटर चालकांचे मानधन काढण्यासाठी जिल्हापरिषदेला कामाचे बिल सादर करणे आवश्यक असते. मात्र महाआॅनलाईनकडून ते बिल सादर का केले जात नाही आणि केले असेल तर संगणक परिचालकांचे मानधन थकवून का ठेवण्यात आले आहे, असा प्रश्न संगणक परिचालकाकडून उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)