शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

महाआॅनलाईनच्या कारभारामुळे संगणक परिचालकांवर उपासमारीची पाळी

By admin | Updated: October 16, 2015 01:29 IST

महाआॅनलाईनच्या कारभारामुळे गेल्या पाच महिन्यांपासून संगणक परिचालकांचे मानधन थकीत असून त्यामुळे परिचालकांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे.

पाच महिन्यांपासून मानधन थकित : पैशाअभावी जगायचे तरी कसे?प्रकाश काळे  गोवरीमहाआॅनलाईनच्या कारभारामुळे गेल्या पाच महिन्यांपासून संगणक परिचालकांचे मानधन थकीत असून त्यामुळे परिचालकांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे. पंचायत राजसंस्थेचे बळकटीकरण करून कामामध्ये सुसत्रता व पारदर्शकता आणण्याच्या हेतूने केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत ई-पि.आर.आय. हा उद्देश प्रकल्प सर्व राज्यामध्ये राबविण्यात आला. त्याअंतर्गत राज्यामध्ये संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) ही संकल्पना प्रत्यक्ष सुरू करण्यात आली. ई-पंचायत हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यासाठी महाआॅनलाईन या कंपनीला सदर कामाचे कंत्राट देण्यात आले.ग्रामपंचायतस्तरावर संगणक परिचालकांची नियुक्ती करून त्यांच्या मार्फत रेकॉर्ड स्कॅन, ग्रामपंचायतीच्या नोंदी, दाखले देणे व इतर ग्रामपंचायतीची महत्त्वाची कामे संगणक परिचालकाकडून करवून घेतल्या जात आहेत. मात्र त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून मानधन दिले नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी ओढवली आहे. तालुकास्तरावरील संगणक परिचालक संघटना यावर एक शब्दही बोलायला तयार नाही. महाआॅनलाईनचे जबाबदार अधिकारी याबाबत मौन बाळगून असल्याने संगणक चालकांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. संगणक आॅपरेटर चालकांचे मानधन काढण्यासाठी जिल्हापरिषदेला कामाचे बिल सादर करणे आवश्यक असते. मात्र महाआॅनलाईनकडून ते बिल सादर का केले जात नाही आणि केले असेल तर संगणक परिचालकांचे मानधन थकवून का ठेवण्यात आले आहे, असा प्रश्न संगणक परिचालकाकडून उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)