शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

नव्या आदेशामुळे आचारसंहितेतून दिलासा

By admin | Updated: October 21, 2016 01:04 IST

राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी दिलेल्या सूचनेप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली होती.

आचारसंहिता केवळ निवडणूक क्षेत्रातच: आयोगाचे नव्याने आदेशचंद्रपूर : राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी दिलेल्या सूचनेप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली होती. मात्र १९ आॅक्टोंबर रोजी नव्याने आलेल्या आदेशानुसार आता आचारसंहितेचा प्रभाव केवळ निवडणूक क्षेत्रापुरताच मर्यादित राहणार आहे. या नव्या आदेशामुळे पुढारी आणि अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नव्या निर्देशानुसार ज्या नगर परिषद क्षेत्रात निवडणूक आहे, त्याच क्षेत्रात आचारसंहिता लागू राहणार आहे. त्या परिसरातील क्षेत्रात आचारसंहिता लागू राहणार नाही. परंतु नगर परिषद क्षेत्राच्या बाहेर काम करताना शेजारच्या नगर परिषद क्षेत्रातील मतदारावर कोणताही प्रभाव पडणार नाही, असे कोणतेही कृत्य करण्यात येऊ नये, असे निर्देशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. नगर परिषद क्षेत्राच्या बाहेर लागून असलेल्या ग्रामीण भागात सरकारला नवीन रस्ते, जलयुक्त शिवार, पाणी पुरवठा योजना इत्यादी कामे करता येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.जिल्ह्यातील चार नगरपरिषदांसह एक नवनिर्मीत नगर पंचायतीसाठी निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. इतर निवडणूकांप्रमाणेच या निवडणूकीतही आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी गुरूवारी झालेल्या बैठकीत दिल्या. यंत्रणांनी आचारसंहिताभंगची घटना कुठे घडणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अतिरीक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अशोक सिरसे, उपजिल्हाधिकारी अजय रामटेके, उपजिल्हाधिकारी विकास हरखंडे, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक हेमराजसिंग राजपुत, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.राजूरा, मूल, बल्लारपूर व वरोरा या चार नगरपरिषदेची व नवनिर्मिती नगर पंचायत सिंदेवाहीची निवडणूक जाहीर झाली असून २७ नोव्हेंबरला मतदान, तर २८ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. संबंधित नगरपरिषद क्षेत्रात १७ आॅक्टोंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने आचारसंहितेचे पालन योग्यपणे व्हावे, यासाठी ही बैठक घेण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)