शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

निष्काळजीपणामुळे नागरिक नळ योजनेपासून वंचित

By admin | Updated: September 8, 2016 00:42 IST

सिंदेवाही तालुक्यातील गट ग्रामपंचायत उमरवाही येथे २०१० मध्ये नळ योजना मंजूर झाली.

पाच वर्षांपासून काम बंद: पत्रकार परिषदेत ग्रामस्थांची कारवाईची मागणीनवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील गट ग्रामपंचायत उमरवाही येथे २०१० मध्ये नळ योजना मंजूर झाली. काम सुरु झाले. मात्र पाच-सहा वर्षापासून टाकीचे बांधकाम रखडले असून पाणी पुरवठा समिती याला जबाबदार असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत उमरवाहीवासीयांनी केला आहे.नवरगाव येथे नुकतीच पत्रकार परिषद आयोजित केली होती. २०१० मध्ये आदिवासी उपाय योजनेअंतर्गत उमरवाही उटी या गावासाठी पाण्याची टाकी व नळ योजना मंजूर झाली. त्यासाठी शासनाकडून सदर बांधकामासाठी ३३ लाख ९९ हजार २४३ रुपयांचा निधी मंजूर झाला. पाणी पुरवठा समितीच्या माध्यमातून निविदा काढून बांधकामाला सुरुवात झाली. काही काम करुन संबंधित कंत्राटदाराने काम बंद केले. त्यानंतर पुन्हा दोन कंत्राटदाराच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली. मात्र दोन वर्षात सदर काम पूर्ण करायचे असताना आज पाच ते सहा वर्षाचा कालावधी लोटला तरी काम पूर्ण झाले नाही. उमरवाही या आदिवासीबहूल गावाला नळाच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे.संपूर्ण कामावर देखरेख ठेवण्यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत पाणी पुरवठा समिती असून समितीचे अध्यक्ष अरुण बोरकर आणि सचिव वंदना पी. मसराम आहेत. काम अपूर्ण असल्याने त्यांची कारणे गावकऱ्यांनी वेळोवेळी विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळू शकले नाही. तसेच सदर कामावर आतापर्यंत किती खर्च करण्यात आला, याचीही माहिती मिळू शकली नाही.वास्तविक पाहता पाणी पुरवठा समितीचा कार्यकाळ हा साधारण तीन वर्षाचा असताना मागील सहा वर्षापासून एकच अध्यक्ष आहे. अध्यक्ष हे कोणत्याही खर्चासाठी ग्रामपंचायतीची मान्यता न घेताच स्वमर्जीने खर्च करीत असून स्वत:च तो खर्च मंजूर करुन घेतात. मागील पाच- सहा वर्षापासून या समितीचे संपूर्ण रेकार्ड हे अध्यक्षांच्या घरी असून याबद्दल कोणतीही माहिती ग्रामपंचायतीला पर्यायाने गावकऱ्यांना नाही. या कामाची जमाखर्चाची माहिती २०१२ मध्ये अशोक विश्वनाथ बोरकर यांनी माहितीच्या अधिकारामध्ये मागितली. त्यावर ग्रामसेवकांनी याबाबत कोणतेही रोकार्ड ग्रामपंचायतीला उपलब्ध नसल्याची माहिती लेखी स्वरूपात दिली आहे. म्हणजेच आजतागायत संपूर्ण रेकार्ड हे अध्यक्षांच्या घरी आहे. अध्यक्ष ग्रामपंचायतीच्या मिटींगमध्ये किंवा ग्रामसभेमध्ये येऊन माहिती द्यायला तयार नसल्याचा आरोपही गावकऱ्यांनी यावेळी केला.अध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून शेवटी गावकऱ्यांनी २० आॅगस्ट २०१६ पाणी पुरवठा या विषयावर विशेष ग्रामसभा घेतली. यामध्येही अध्यक्षांनी उपस्थित राहून हिशोब सादर न केल्यामुळे तसेच सदर खात्याचे व्यवहार करताना अगोदर ग्रामसभा घेण्याचे बंधनकारक असताना कार्यक्रम रजिस्टरमध्ये जमाखर्चास ग्रामसभेची मंजुरी घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिव यांनी गावकऱ्यांची दिशाभूल केली असून समितीच्या दुर्लक्षामुळे नळ योजनेचे काम स्थगित आहे. सदर ग्रामसभेमध्ये नळ योजनेची वरिष्ठाकडून योग्य चौकशी करुन दोषी असलेल्या पदाधिकाऱ्यांवर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्याबाबतचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.याबाबतच्या तक्रारी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रकल्प अधिकारी कार्यालय चंद्रपूर, जिल्हाधिकारी, आदिवासी मंत्री, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कल्पना बोरकर, उपअभियंता पाणी पुरवठा विभाग पं.स. सिंदेवाही, संवर्ग विकास अधिकारी पं.स. सिंदेवाही यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य भास्कर पेंदाम, सिताराम मेश्राम, रवी मसराम, दिगांबर कळाम, अशोक मसराम, उद्धव बोरकर, राजू मसराम, अशोक बोरकर, धर्मदास उईके व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)