शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

लाॅकडाऊनमुळे रोजी गेली, रोटी देणार शिवभोजन थाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:27 IST

चंद्रपूर : कोरोना संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. अशा वेळी संसर्ग रोखण्यासाठी ...

चंद्रपूर : कोरोना संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. अशा वेळी संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक संचारबंदी लागू केली आहे. मागील वर्षी लाॅकडाऊन केल्यानंतर नागरिकांचे बेहाल झाले होते. अनेकांवर उपाशी राहण्याची वेळ आली होती. मात्र, शिवभोजन थाळीमुळे आधार मिळाला. आता यावेळीही लाभार्थ्यांना मोफत शिवभोजन देण्यात येणार आहे. त्यामुळे रोजी गेली, तरीही रोटी मिळणार आहे.

कोरोना रुग्ण दरदिवशी वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. या अंतर्गत विविध अटी लावल्या आहे. अशावेळी अनेकांचा रोजगार जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे तर बेहाल होणार आहे. त्यामुळे त्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने शिवभोजन योजनेंतर्गत केंद्रातून आता मोफत थाळी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोजगार गेला, तरीही पुढील एक महिना गरजूंना शिवभोजनचा आधार मिळणार आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत २३ शिवभोजन केंद्रातून २ हजार ५०० थाळींचे वितरण केल्या जाणार आहे. यामध्ये चंद्रपूर शहरातून सहा केंद्रातून तर उर्वरित केंद्र तालुकास्तरावर आहे. या माध्यमातून गरजूंना पोट भरणे शक्य होणार आहे.

बाॅक्स

जिल्ह्यातील शिवभोजन थाळी

२३

दररोज किती जण घेतात लाभ

२५००

१.राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय कुठेच काही सुरू राहणार नाही. त्यामुळे गरिबांना जगण्यासाठी आता शिवभोजनच आधार ठरणार आहे. पूर्वी १० रुपयांना मिळणारी थाळी कोरोना संकटामुळे ५ रुपयांत दिली जात होती. आता तर सर्वांसाठी मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

२.जिल्ह्यात २३ केंद्राच्या माध्यमातून २ हजार ५०० शिवभोजन थाळीचे वितरण केल्या जाते. यामध्ये चंद्रपूरात सहा केंद्र आहे. या माध्यमातून शिवभोजन थाळीचे गरजूंना वितरण करण्यात येणार आहे.

कोट

थाळीचा लाभ घेणारे

कोट

राज्य सरकारने मागील वर्षभरापासून शिवभोजन थाळी सुरू केली आहे. यामुळे गरजूंना खूप मोठी मदत झाली आहे. पाच रुपयांमध्ये जेवण मिळत होते. आता कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन केल्या जाणार आहे. त्यामुळे गरिबांचा विचार करून शासनाने मोफत थाळी देण्याचे जाहीर केल्यामुळे अडचणीच्या काळात मदत होईल.

-मोहन केळझरकर, चंद्रपूर

कोट

कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. मागील वर्षी अनेकांची मोठी फजिती झाली होती. या वर्षी तिच अवस्था आहे. शासनाने गरिबांचा विचार करून शिवभोजन पाच रुपयांत देण्यास सुरुवात केली होती. आता तर मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे गरजूंना लाभ होईल. मात्र, लाभ देतानाही अति आवश्यक असलेल्यांनाच देणे गरजेचे आहे.

- राकेश यादव