शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

उपचाराअभावी रेणुकाचे आयुष्य काळवंडले

By admin | Updated: February 8, 2015 23:33 IST

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील तेरा वर्षाच्या मुलीचे कंबरेपासून खालील शरीर लुळे पडले. मात्र आर्थिक अडचणीमुळे ती उपचार घेऊ शकत नसल्याने तिच्यावर शाळा सोडण्याची पाळी आली आहे.

नवरगाव: सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील तेरा वर्षाच्या मुलीचे कंबरेपासून खालील शरीर लुळे पडले. मात्र आर्थिक अडचणीमुळे ती उपचार घेऊ शकत नसल्याने तिच्यावर शाळा सोडण्याची पाळी आली आहे. यामुळे तिचे आयुष्यही धोक्यात आले आहे.रत्नापूर निवासी विश्वेश्वर शेंडे हे मजुरीचे काम करुन कुटुंबाचा उदर्निवाह चालवितात. स्वत:ची शेती नाही. केवळ मिळेल त्या कामावर मजुरी करुन दोघेही पती-पत्नी मुलाबाळांना अशाही परिस्थितीत शिक्षण देत आहेत. आई अशिक्षित तर वडीलही जेमतेम दुसरा- तिसरा वर्ग शिकलेले. आपण शिकलो नाही, याची खंत बाळगून मुलांना शिक्षण देत आहेत. रेणुका ही १३ वर्षाची असून भारत विद्यालय नवरगाव येथे आठव्या वर्गात शिकते. दुसरी मुलगी पाचव्या वर्गात तर लहान मुलगा तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे.हे सर्व सुरळीत सुरु असताना मोठी मुलगी रेणुका हीचे शरीर कंबरेपासून अचानक लुळे पडले. त्यामुळे स्वत:च्या पायावर ती उभीच राहू शकत नाही. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. हातावर आणायचे व पाणावर खायचे. अशाही परिस्थितीत नातेवाईकांकडून ३५-४० हजार रुपये उसनवारी करुन चंद्रपूर आणि गडचिरोली येथे उपचार केला. पैसा खर्च झाला. परंतु फायदा काहीच नाही. पुन्हा पैसा कुठुन उभा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतरही न खचता रेणुकाच्या वडीलांनी परिसरातील नागरिकांना समस्या सांगून थोडेबहूत पैसे गोळा केले. भारत विद्यालय नवरगाव येथील शिक्षकांनी चार हजार रुपयांचा निधी गोळा केला व दिला. याच पैशातून रेणुकाला उपचारासाठी लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर या ठिकाणी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंततर आॅपरेशनचा सल्ला दिला. ६०-७० हजार रुपये खर्च येणार. परंतु आॅपरेशन केल्यानंतर ती दुरूस्त होईलच, असा विश्वास देऊ शकत नाही, असे डॉक्टरांनी सांगताच आई- वडील घाबरले. एवढा पैसा कुठून उभा करायचा, हा प्रश्नही आहेच. दुरुस्तीची शाश्वती नाही. त्यामुळे पुन्हा इतरत्र न नेता रेणुकाला घरी आणण्यात आले आहे. तिची प्रकृती दिवसेंदिवस खालवत आहे. रक्तामध्ये काहीतरी फरक पडल्याने तिच्या शरीरावर फुळ्या येत असून जखमाही होत आहे. मात्र इतरत्र नेऊन उपचार करण्यासाठी आई-वडील आर्थिक अडचणीमुळे हतबल झाले आहेत. उपचाराअभावी तिच्यावर शाळा सोडण्याची वेळ आली आहे. चार महिन्यांपासून ती शाळेत गेलेली नाही.सामाजिक संस्थानी, राजकीय व्यक्तींनी, दानशूर व्यक्तींनी आर्थिक पुढाकार घेतल्यास चांगल्या दवाखान्यामध्ये उपचार केल्यास रेणुकाचा जीवनदान मिळू शकते. (वार्ताहर)