शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

उपचाराअभावी रेणुकाचे आयुष्य काळवंडले

By admin | Updated: February 8, 2015 23:33 IST

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील तेरा वर्षाच्या मुलीचे कंबरेपासून खालील शरीर लुळे पडले. मात्र आर्थिक अडचणीमुळे ती उपचार घेऊ शकत नसल्याने तिच्यावर शाळा सोडण्याची पाळी आली आहे.

नवरगाव: सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील तेरा वर्षाच्या मुलीचे कंबरेपासून खालील शरीर लुळे पडले. मात्र आर्थिक अडचणीमुळे ती उपचार घेऊ शकत नसल्याने तिच्यावर शाळा सोडण्याची पाळी आली आहे. यामुळे तिचे आयुष्यही धोक्यात आले आहे.रत्नापूर निवासी विश्वेश्वर शेंडे हे मजुरीचे काम करुन कुटुंबाचा उदर्निवाह चालवितात. स्वत:ची शेती नाही. केवळ मिळेल त्या कामावर मजुरी करुन दोघेही पती-पत्नी मुलाबाळांना अशाही परिस्थितीत शिक्षण देत आहेत. आई अशिक्षित तर वडीलही जेमतेम दुसरा- तिसरा वर्ग शिकलेले. आपण शिकलो नाही, याची खंत बाळगून मुलांना शिक्षण देत आहेत. रेणुका ही १३ वर्षाची असून भारत विद्यालय नवरगाव येथे आठव्या वर्गात शिकते. दुसरी मुलगी पाचव्या वर्गात तर लहान मुलगा तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे.हे सर्व सुरळीत सुरु असताना मोठी मुलगी रेणुका हीचे शरीर कंबरेपासून अचानक लुळे पडले. त्यामुळे स्वत:च्या पायावर ती उभीच राहू शकत नाही. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. हातावर आणायचे व पाणावर खायचे. अशाही परिस्थितीत नातेवाईकांकडून ३५-४० हजार रुपये उसनवारी करुन चंद्रपूर आणि गडचिरोली येथे उपचार केला. पैसा खर्च झाला. परंतु फायदा काहीच नाही. पुन्हा पैसा कुठुन उभा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतरही न खचता रेणुकाच्या वडीलांनी परिसरातील नागरिकांना समस्या सांगून थोडेबहूत पैसे गोळा केले. भारत विद्यालय नवरगाव येथील शिक्षकांनी चार हजार रुपयांचा निधी गोळा केला व दिला. याच पैशातून रेणुकाला उपचारासाठी लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर या ठिकाणी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंततर आॅपरेशनचा सल्ला दिला. ६०-७० हजार रुपये खर्च येणार. परंतु आॅपरेशन केल्यानंतर ती दुरूस्त होईलच, असा विश्वास देऊ शकत नाही, असे डॉक्टरांनी सांगताच आई- वडील घाबरले. एवढा पैसा कुठून उभा करायचा, हा प्रश्नही आहेच. दुरुस्तीची शाश्वती नाही. त्यामुळे पुन्हा इतरत्र न नेता रेणुकाला घरी आणण्यात आले आहे. तिची प्रकृती दिवसेंदिवस खालवत आहे. रक्तामध्ये काहीतरी फरक पडल्याने तिच्या शरीरावर फुळ्या येत असून जखमाही होत आहे. मात्र इतरत्र नेऊन उपचार करण्यासाठी आई-वडील आर्थिक अडचणीमुळे हतबल झाले आहेत. उपचाराअभावी तिच्यावर शाळा सोडण्याची वेळ आली आहे. चार महिन्यांपासून ती शाळेत गेलेली नाही.सामाजिक संस्थानी, राजकीय व्यक्तींनी, दानशूर व्यक्तींनी आर्थिक पुढाकार घेतल्यास चांगल्या दवाखान्यामध्ये उपचार केल्यास रेणुकाचा जीवनदान मिळू शकते. (वार्ताहर)