शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पावसाअभावी धानाचे उत्पादन घटणार

By admin | Updated: November 16, 2014 22:48 IST

यंदा अत्यल्प पाऊस पडला. याचा मोठा फटका धानपिकाला बसला आहे. यंदा पाण्याअभावी ४० टक्क्यांच्या आत उत्पादन होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली जात आहे.

चंद्रपूर : यंदा अत्यल्प पाऊस पडला. याचा मोठा फटका धानपिकाला बसला आहे. यंदा पाण्याअभावी ४० टक्क्यांच्या आत उत्पादन होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली जात आहे.मूल, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी आणि चिमूर परिसरात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यावर्षी आॅगस्ट महिन्यापर्यंत पावसाने दडी मारली होती. परिणामी रोवणीची कामे खोळंबली. त्यानंतर रोवणीच्या कामास शेतकऱ्यांनी सुरवात केली. सप्टेंबर महिन्यापासून मोठा पाऊस न झाल्याने भाताची शेती संकटात सापडली आहे. सावली, मूल आणि पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना आसोलामेंंढा तलावाचे पाणी मिळत होते. यावर्षी नहराच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यातच संपूर्ण कालव्यास भेगा पडल्या आहेत. अधिकारी नहराच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने आसोलामेंढा तलावाचे पाणी शेतीला न मिळता वाहून जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळणे अशक्य झाले आहे. हरणघाट उपसा जलसिंचन योजनेचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी दोन महिन्यांपुर्वी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पाणी मिळत नसल्याने धानपिके वाळू लागली आहेत. हरणघाट उपसा सिंचन योजनेचे पाणी दिघोरीपर्यंत सोडल्यास भाताची शेती हाती येऊ शकते. या गंभीर प्रश्नाकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पाणी सोडण्याच्या सूचना द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी सिंचाई विभागाकडे केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)