शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

पावसाअभावी धानाचे उत्पादन घटणार

By admin | Updated: November 16, 2014 22:48 IST

यंदा अत्यल्प पाऊस पडला. याचा मोठा फटका धानपिकाला बसला आहे. यंदा पाण्याअभावी ४० टक्क्यांच्या आत उत्पादन होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली जात आहे.

चंद्रपूर : यंदा अत्यल्प पाऊस पडला. याचा मोठा फटका धानपिकाला बसला आहे. यंदा पाण्याअभावी ४० टक्क्यांच्या आत उत्पादन होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली जात आहे.मूल, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी आणि चिमूर परिसरात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यावर्षी आॅगस्ट महिन्यापर्यंत पावसाने दडी मारली होती. परिणामी रोवणीची कामे खोळंबली. त्यानंतर रोवणीच्या कामास शेतकऱ्यांनी सुरवात केली. सप्टेंबर महिन्यापासून मोठा पाऊस न झाल्याने भाताची शेती संकटात सापडली आहे. सावली, मूल आणि पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना आसोलामेंंढा तलावाचे पाणी मिळत होते. यावर्षी नहराच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यातच संपूर्ण कालव्यास भेगा पडल्या आहेत. अधिकारी नहराच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने आसोलामेंढा तलावाचे पाणी शेतीला न मिळता वाहून जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळणे अशक्य झाले आहे. हरणघाट उपसा जलसिंचन योजनेचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी दोन महिन्यांपुर्वी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पाणी मिळत नसल्याने धानपिके वाळू लागली आहेत. हरणघाट उपसा सिंचन योजनेचे पाणी दिघोरीपर्यंत सोडल्यास भाताची शेती हाती येऊ शकते. या गंभीर प्रश्नाकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पाणी सोडण्याच्या सूचना द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी सिंचाई विभागाकडे केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)