शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

वाढत्या प्रदूषणामुळे जनजीवन धोक्यात

By admin | Updated: July 3, 2017 01:01 IST

तालुक्यात वाढत्या प्रदूषणामुळे मानवाचे जनजीवन विस्कळीत झाले असून वेळीच याची दखल न घेतल्यास

राजुरा तालुका : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : तालुक्यात वाढत्या प्रदूषणामुळे मानवाचे जनजीवन विस्कळीत झाले असून वेळीच याची दखल न घेतल्यास या भागातील नागरिकांचे जीवन धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तुघलकी कारभारामुळे राजुरा तालुक्यात प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांच्याकडे राजुरा आणि कोरपना तालुक्यामधील केवळ सहा उद्योगांची नोंद आहे. कारखान्यातून होणारे प्रदूषण कमी करण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांच्याकडे योग्य नियमावली नाही. कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजार होवून आयुष्यमान कमी होत आहे. लहान मुलांना विविध आजाराची लागण होत आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करण्यास दुर्लक्ष करीत आहे. यामुळे कंपन्याचे प्रदूषण वाढतच आहे. वेकोलिच्या खाणींमुळे शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट होत आहे. कोळशाच्या धुरामुळे सल्फर डॉयआॅक्साईड, नायट्रोजन आॅक्साईट, कार्बन डॉयआॅक्साईड, मोनो आॅक्साईड यांच्यामुळे श्वसनाचे आजार वाढत आहेत. आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये ५० टक्के रुग्ण श्वसनाचे आढळले आहे. धुरामुळे खोकला, दमा असे आजार होत असून प्रदूषणामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. कोळसा जाळण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून निरी आणि आयआयटी यांच्या सर्वेमध्ये प्रदूषण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.