शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

अवकाळी पावसामुळे गहू, हरबरा पिकांचे नुकसान

By admin | Updated: March 4, 2015 01:33 IST

रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने कोरपना तालुक्यातील रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकरी हतबल : मिरची पिकालाही फटका, नुकसान भरपाईची मागणीनांदाफाटा : रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने कोरपना तालुक्यातील रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात कापणीसाठी आलेला गहू पिकाचे नुकसान झाल्याचे दिसत नसले तरी फळधारणा होत असलेला गहू पाण्याने जमीनीवर झोपला आहे. तर हरभरा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे रबी हंगामाची आशा धरुन असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अवकाळी पावसाने निराश केले. कोरपना तालुक्यात अनेकांनी गहू पिकाची लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांनी गव्हाची कापणी करुन शेतातच ढिग करून ठेवले मात्र तेही भिजले आहे. आवारपूर, नांदा, बिबी, पिंपळगाव, हिरापूर आदी गाव शिवारातील उभे गहू पीक जमीनीवर पडल्याने पीक भुईसपाट झाल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे गेल्या वर्षीच्या नुकसानीची भरपाई, खरीपात बसलेला फटका आणि आता रबीतही पिकाची अवस्था बेकार असल्याने शेतकरी हवादिल झाला आहे. गहू पिकाचा उत्पादन खर्च १ एकरसाठी साधारणत: सात ते आठ हजार रुपये आहे. यातच १५०० ते १८०० रुपयापेक्षा अधिक भाव या पिकाला मिळत नाही. त्यामुळे शेतात कष्ट करुन हाती मात्र काहीच येत नसल्याचे शेतकरी सांगतात. यालाच पर्याय म्हणून शेतकरी हरभरा पिकाची लागवड केली आहे. मात्र पावसाने येणारे फुलोर गळला तर कुठे घाटे जमिनीवर पडल्याचेही चित्र दिसून येत आहे. कापूस पीक हातून गेल्यानंतर रबी पिकाच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढून तर कुणी उसणवारी पैसे मागून शेती साहित्याची खरेदी केली. परंतु निसर्गाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतातून उत्पादन निघाल्यानंतर बाजारात पिकाचे भाव कमालीचे घसरतात. हीच परिस्थिी ‘अच्छे दिन’ म्हणणाऱ्या शासनाच्या काळातही कायम असल्याच्या प्रतिक्रिया आता शेतकऱ्यांमधून उमटत आहे. अनेक गावात शेती नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश संबंधीत अधिकारी व कार्यालयांना दिले आहे. मात्र अधिकारी कार्यालयात बसूनच पाहणी करीत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मद्दतीपासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंडपावसाने पडलेला गहू पुन्हा फळधारणेस सक्षम राहत नाही. तो भुईसपाट होतो. त्यामुळे पुन्हा उत्पादन घेता येण्याची शक्यता नाही. शेतकऱ्यांनी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करीत गहू पिकाची पेरणी केली. परंतु, उत्पादन घरी येण्याआधीच पीक नष्ट झाले आहे. पावसामुळे तालुक्यातील पिकांचे फार मोठे नुकसान झालेले नाही. पिकांची पाहणी करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील कृषी सेवकाला पाहणीसाठी पाढवून नुकसान आढळून आल्यास मदतीसाठी पाठपुरावा करणार. -पी. यू. चिमलवार तालुका कृषी अधिकारी, कोरपना