शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

फाईल्स अडकल्याने जि.प.चे अधिकारी, कर्मचारी त्रस्त

By admin | Updated: June 21, 2014 01:27 IST

ग्रामीण विकासाची धुरा असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये सध्या अधिकारी, कर्मचारी त्रस्त झाले आहे.

चंद्रपूर : ग्रामीण विकासाची धुरा असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये सध्या अधिकारी, कर्मचारी त्रस्त झाले आहे. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे फाईल्स पाठवूनही त्या १५ ते २० दिवपर्यंत वापस येत नाहीत. अनेकदा मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना वेटिंगवर राहावे लागते. विशेष म्हणजे, अनेकवेळा तर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचा स्वीय सहाय्यकच अडवून ठेवत असल्याची तक्रार आहे. मात्र यासंदर्भात बोलण्यास कुणीही तयार नाही.जिल्हा परिषदेमध्ये अनेक विभाग आहे. या विभागांतर्गत विविध कामांसाठी विभागप्रमुखांकडून मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे फाईल्स पाठविल्या जातात. या फाईल्स सामान्य प्रशासन विभागातून नंबर लिहून त्या सीईओंकडे पाठविण्यात येतात. मात्र अनेकदा त्या सीईओंकडे पोहचत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. या फाईल्स स्वीय सहाय्यकांकडेच काही दिवस पडून राहात असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कामांना विलंब होत असून वेळ वाया जात आहे. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचा स्वीय सहाय्यक अनेकवेळा अधिकारी, कर्मचाऱ्यांना कॅबीनच्या बाहेर अडवून ठेवत असल्याचेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. एखाद्यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी कामाच्या व्यस्ततेमुळे अधिकाऱ्यांना वेळ देवू शकत नाही. हे ठिक असले तरी, अनेकवेळा त्यांना केबीनच्या बाहेर तिष्ठत ठेवले जात असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याकडे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे.काही कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून एकाच टेबलवर असल्याने ते अधिकाऱ्यांचे काम ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे शासकीय नियमाप्रमाणे एक तर, त्यांची बदली करावी किंवा टेबल बदलवून द्यावा, अशी मागणी आहे. विशेष म्हणजे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक मागील अनेक दिवसांपासून एकाच टेबलवर असल्याने त्यांची वागणूक कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरत असल्याची ओरड आहे. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या संपत्तीचे विवरण जाहीर करून तसा फलक कार्यालयाबाहेर दर्शनी भागात लावला होता. भ्रष्टाचारमुक्त अधिकारी अशी ओळख निर्माण करणाऱ्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांचा वचक जिल्हा परिषदेतील अंतर्गत विभागाकडेही तेवढाच राहावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (नगर प्रतिनिधी)